शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

महामार्गाच्या जमिनीचा मोबदला पाचपट

By admin | Updated: January 28, 2016 00:12 IST

चौपदरीकरण भूमिपूजन : गडकरी, फडणवीस उद्या रत्नागिरीत

रत्नागिरी : चौपदरीकरणामुळे होणाऱ्या विस्थापितांना रेडीरेकनरच्या दरापेक्षा ५ पट जमिनीचा मोबदला दिला जाणार आहे. वारस तपास केल्यानंतर प्रशासनाकडून जून - जुलैमध्ये हा मोबदला दिला जाईल, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी पत्रकार परिषदेत दिली. चौपदरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन २९ रोजी केले जाणार असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यासाठी उपस्थित राहणार आहेत.यावेळी सचिन वहाळकर, दत्तात्रय देसाई, नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, शहराध्यक्ष प्रशांत डिंगणकर, पंचायत समितीचे उपसभापती योगेश पाटील, तालुका सरचिटणीस उमेश कुळकर्णी व अन्य उपस्थित होते. माने पुढे म्हणाले, मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी ९0 टक्के भूसंपादन झाले आहे़ या पार्श्वभूमीवर चौपदरीकरणाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात येणार आहे़ २९ जानेवारीला सकाळी १० वाजता निवळी येथे पेट्रोलपंपासमोर केंद्रीय भूपृष्ठ, रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते चौपदरीकणाचा कोनशिला समारंभ होणार आहे. ६ टप्प्यांच्या उर्वरित कामाच्या निविदा फेब्रुवारीमध्ये निघणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. भूसंपादनाबाबत माने म्हणाले, ही किचकट प्रक्रिया १८ ते २० महिने सुरू आहे. सेक्शन ३ (अ)नुसार हरकती दावे व नोंदवले असून ३ (ब)नुसार राजपत्रात नोंद करून सरकारकडे जमिनींचा ताबा मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे. रायगड जिल्ह्यात काम प्रलंबित असल्याने ठेकेदारांना विश्वासात घेऊन काम सुरू झाले आहे. गेल्या दहा वर्षांत अपूर्ण राहिलेले काम आता पुढील दोन-तीन वर्षांत पूर्ण होईल, त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवळीमध्ये या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी १२ वाजता पुण्याकडे रवाना होणार आहेत. सकाळी ९.३० वाजता मार्गताम्हाने येथील कार्यक्रम आटोपून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी निवळी येथे पोहोचतील. त्यानंतर मंत्री गडकरी यांच्या उपस्थितीत रत्नागिरी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या नव्या जिंंदल इमारतीचे आणि रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयातील सावरकर संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. (शहर वार्ताहर)बाळ माने : महामार्ग होणार काँक्रीटचा...!२६ मे २०१४ रोजी केंद्रात भाजप सरकार आल्यानंतर गडकरी यांना रस्ते वाहतूक मंत्रीपद मिळाले. त्यामुळे कोकणच्या विकासाच्या आशा पल्लवीत झाल्या. इंदापूर ते झाराप हा ३६६ किलोमीटर्सचा महामार्ग सिमेंट काँक्रिटचा करण्यास गडकरी यांनी मंजुरी देऊन ६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी सांगितले. चौपदरीकरणाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री अनंत गीते, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, खासदार विनायक राऊत यांच्यासह जिल्ह्यातील आमदार उपस्थित राहणार आहेत.मंत्र्यांचीही मांदियाळी२९ ते ३१ जानेवारी या तीन दिवसांत पाच मंत्री रत्नागिरीत येणार आहेत़. ३० तारखेला केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक सरकारी योजनांचा आढावा घेणार आहेत. २९ला सिंधुदुर्ग व ३० रोजी रत्नागिरीचा आढावा घेतील. ३१ला स्वातंत्र्यवीर सावरकर संमेलनाच्या समारोपाला केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित राहणार आहेत.