शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कालव्याची दुरुस्ती करा अन्यथा ‘कोर्ट मार्शल’

By admin | Updated: February 12, 2015 00:39 IST

संदेश सावंत यांचा इशारा : पाटबंधारे अधिकाऱ्यांची झाडाझडती

कुडाळ : पावशी येथील उजव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी दोन वर्षांपूर्वी दोन कोटींचा निधी देऊनही उजव्या कालव्याची दुरुस्ती का झाली नाही, असा प्रश्न पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारत, येत्या ५ मार्चपर्यंत येथील कालव्याची दुरुस्ती करा, नाही तर तुमचे कोर्ट मार्शल करू, असा इशारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संदेश सावंत यांनी दिला. पावशी येथील उजवा कालवा नादुरुस्त असल्याने त्या कालव्यातून पाणी येत नव्हते. याबाबत येथील ग्रामस्थांनी तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांचे लक्ष वेधले होते. त्यावेळी राणे यांनी जिल्हा नियोजनमधून उजव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. पाटबंधारे विभागाने हा निधी गेल्या दोन वर्षात खर्चही केला. मात्र, अद्यापही या कालव्यातून शेतकऱ्यांना पाणी पुरवठा होत नाही. पाईप दुरुस्ती झालीच नाही. रविवारी कुडाळ येथे नारायण राणे काँगे्रेसच्या मेळाव्यासाठी आले असताना पावशी ग्रामस्थांनी त्यांना निवेदन दिले. निधी देऊनही पाणी पोहोचले नसल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी बुधवारी दुपारी ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेतल्या. ग्रामस्थांनी, उजव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी दोन कोटी रुपये खर्च झाला असतानाही शेतीपर्यंत पाणी पोहोचले नाही. पाईपलाईनसाठी आम्ही मोफत जमिनी दिल्या. आता आमच्याच पैशाने दुरुस्ती करायला येथील अधिकारी सांगत आहेत, असे सांगितले. पाणी नसल्याने आमच्या बागायतीतील झाडे मरून जात आहेत, पाईपलाईन पूर्ण नाही, ती साफ करण्यासाठी चेंबर नाही, अधिकारी सोसायटी स्थापन करायचा सल्ला देत आहेत, अधिकारी आणि ठेकेदारांनी काम व्यवस्थित केलेच नाही, अशा समस्या जिल्हा परिषद अध्यक्ष सावंत व उपाध्यक्ष रणजित देसाई यांच्यासमोर मांडल्या. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, सदस्य भारती चव्हाण, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर, पावशी सरपंच श्रीपाद तवटे, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सुनील भोगटे, रुपेश पावसकर, पावशी ग्रामपंचायतीचे सदस्य चिदानंद वाटवे तसेच दादा मयेकर, चंद्रकांत पावसकर, संतोष खोत, आनंद पावसकर, दादा पावसकर, चंद्रकांत वाटवे, बाबू शेलटे, विनायक मयेकर व अन्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)सावंत यांनी विचारला अधिकाऱ्यांना जाबयावेळी संदेश सावंत यांनी याबाबत खुलासा करण्यास सांगताच लघुपाट बंधारे विभागाचे अधिकारी म्हणाले, आम्ही काम केले. परंतु काही पाईपमध्ये झाडाची मूळे वाढत राहतात. त्यामुळे पाणी येत नाही, असा खुलासा केला. परंतु अधिकाऱ्यांना ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींच्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देता आली नसल्याने त्यांचे पितळ उघडे पडले. यावेळी सावंंत यांनी अनेक प्रश्न विचारून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. दोन कोटी रुपये खर्चूनही पाणी कसे आले नाही, याचा खुलासा द्या. तुमच्या कोटीच्या निधीचे आॅडिट करायला मला लावू नका, असा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. ५ मार्चपर्यंतची डेडलाईन येत्या ५ मार्चपर्यंत या कालव्याची दुरुस्ती करून पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. अन्यथा स्वत:च्या खिशातील किंवा ठेकेदाराकडून पुन्हा काम करून घ्या, असा सल्ला सावंत यांनी दिला. शेतकऱ्यांच्या हितासाठी नारायण राणे यांनी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यामुळे हे काम चांगले झालेच पाहिजे. याबाबत आम्ही जनतेबरोबरच राहू, असे संदेश सावंत यांनी सांगितले.