शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवक अपात्रता अर्ज फेटाळला

By admin | Updated: January 10, 2017 22:33 IST

कणकवली नगरपंचायत : पारकर गटाला दिलासा; काँग्रेसला धक्का

कणकवली : कणकवली नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रज्ञा खोत, विद्यमान नगराध्यक्षा माधुरी गायकवाड, उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांच्यासह पाच नगरसेवकांच्या विरोधातील अपात्रतेचा अर्ज जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी फेटाळला आहे. त्यामुळे नगरपंचायतीतील पारकर गटाच्या नगरसेवकांना दिलासा मिळाला असला, तरी काँग्रेस पक्षाला एकप्रकारे हा धक्काच आहे. नगरसेविका सुविधा साटम यांनी काँग्रेसच्यावतीने हा अपात्रतेविषयीचा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केला होता.कणकवली नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक २०१३ मध्ये झाली होती. त्यावेळी नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव होते. त्यामुळे राष्ट्रीय काँग्रेसच्या अ‍ॅड. प्रज्ञा खोत यांची नगराध्यक्ष म्हणून, तर समीर नलावडे यांची उपनगराध्यक्ष म्हणून निवड झाली होती. त्यांचा अडीच वर्षांचा कालावधी संपल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या पदांच्या निवडीसाठी २९ सप्टेंबर २०१५ रोजी अधिसूचना जारी केली होती.यावेळी नगरपंचायतीतील समीर नलावडे गटाकडून नगराध्यक्षपदासाठी सुविधा साटम, तर उपनगराध्यक्षपदासाठी गणेश ऊर्फ बंडू हर्णे यांची नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती. तसेच काँग्रेसचे हे अधिकृत उमेदवार असल्याचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी जाहीर केले होते. काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांना त्यांना मतदान करण्याबाबत व्हीप बजावला होता. तर संदेश पारकर गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी माधुरी गायकवाड व उपनगराध्यक्ष पदासाठी कन्हैया पारकर यांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती. तसेच आपण गटनेता असल्याचे जाहीर करीत राधाकृष्ण ऊर्फ रूपेश नार्वेकर यांनी या दोघांना संबंधित पदांसाठी उमेदवारी दिल्याचे घोषित केले होते.त्यानंतर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेच्या तीन व भाजपच्या एका नगरसेवकाच्या मदतीने माधुरी गायकवाड व कन्हैया पारकर निवडून आले होते.त्यामुळे अ‍ॅड. प्रज्ञा खोत, रूपेश नार्वेकर, माधुरी गायकवाड, कन्हैया पारकर, सुमेधा अंधारी यांनी पक्षविरोधी कृत्य करीत बंडखोरी केली असल्याचे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते. राष्ट्रीय काँग्रेसचे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार सुविधा साटम आणि गणेश हर्णे यांच्याविरोधात पक्षादेश डावलून विरोधी मतदान केल्याचे सांगत नगरसेविका सुविधा साटम यांनी पारकर गटाच्या पाच नगरसेवकांना अपात्र ठरविण्यासाठी ४ नोव्हेंबर २०१५ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता.त्यामुळे त्या पाच नगरसेवकांना याबाबत खुलासा देण्यासाठी ९ नोव्हेंबर २०१५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस काढली होती. या अर्जाच्या सुनावणीदरम्यान ७ जून २०१६ रोजी अनिल भंडारी यांची बदली झाली. त्यानंतर जिल्हाधिकारी पदावर रुजू झालेल्या उदय चौधरी यांच्यासमोर या अर्जाची सुनावणी झाली. या अर्जाबाबत सव्वा वर्ष सुनावणी सुरू होती. अखेर तक्रारदार व ज्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर तसेच कागदपत्र पाहिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय दिला आहे.संदेश पारकर गटातर्फे अ‍ॅड. उमेश सावंत यांनी या तक्रार अर्जाबाबत युक्तिवाद केला. (प्रतिनिधी)