शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

corona in sindhudurg-दीपतेजातून भिरवंडे ग्रामस्थांचे श्री देव रामेश्वरचरणी साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 20:13 IST

कोरोना व्हायरसचा संपूर्ण नाश व्हावा तसेच जगाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या भिरवंडेवासीय व त्यांच्या नातेवाईकांचे आरोग्य उत्तम राहावे . यासाठी भिरवंडे येथील श्रीदेव रामेश्वर मंदिरात असंख्य दिवे प्रज्वलित करण्यात आले. या दीप तेजातून कोरोना व्हायरसपासून रक्षण करण्याची सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ देत असे साकडे श्री देव रामेश्वर चरणी घालण्यात आले.

ठळक मुद्देदीपतेजातून कोरोना विरुद्ध लढण्याची ऊर्जाभिरवंडे ग्रामस्थांचे श्री देव रामेश्वर चरणी साकडे

कणकवली : कोरोना व्हायरसचा संपूर्ण नाश व्हावा तसेच जगाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या भिरवंडेवासीय व त्यांच्या नातेवाईकांचे आरोग्य उत्तम राहावे . यासाठी भिरवंडे येथील श्रीदेव रामेश्वर मंदिरात असंख्य दिवे प्रज्वलित करण्यात आले. या दीप तेजातून कोरोना व्हायरसपासून रक्षण करण्याची सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ देत असे साकडे श्री देव रामेश्वर चरणी घालण्यात आले.सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष तथा भिरवंडे देवालय संचालक मंडळाचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या संकल्पनेतून हे दीप तेजोमय करण्यात आले होते . कोरोना व्हायरसचे संकट समोर उभे राहिले आहे . लॉक डाऊन तसेच संचारबंदी यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.

यापासून बचाव करण्यासाठी नानाविध उपायोजना राबविल्या जात आहेत . यातील महत्त्वाची उपायोजना म्हणजे प्रत्येक माणसाच्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि कोरोना व्हायरस विरुद्ध लढण्याची शक्ती ,मानसिकता निर्माण होणे आवश्यक आहे.केंद्र व राज्य शासनाकडून जाहीर करण्यात येत असलेल्या आदेशांचे पालन करण्याची मानसिकता प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होणे आवश्यक आहे. याच भावनेतून श्री देव रामेश्वर मंदिरात दीप तेजोमय करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. काही मोजक्याच मंडळींच्या उपस्थितीत बुधवारी सायंकाळी मंदिराचा सभामंडप दिव्यांनी उजळून निघाला .नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबईत अनेक कोकणवासीय वास्तव्याला आहेत. या सर्वांचे आरोग्य उत्तम राहावे . त्यांच्यामध्ये कोरोनाचा प्रतिकार करण्याची ऊर्जा निर्माण होउ दे , असे साकडे श्री देव रामेश्वर चरणी घालण्यात आले 

कोकणी माणूस हा मुळातच श्रद्धाळू आहे तो जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी गाव आणि गावची ग्रामदेवता यावर त्याचे नितांत श्रद्धा असते . याच श्रद्धेला उभारी मिळावी आणि कोरणा विरुद्धची लढाई जिंकण्याची मानसिकता मना मनामध्ये निर्माण होऊ दे. याच भावनेतून हे दीप तेजोमय करण्यात आले होते, असे सतीश सावंत व ग्रामस्थांनी सांगितले 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग