शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
3
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
4
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
5
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
6
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
7
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
8
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
9
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
10
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
11
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
12
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
13
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
14
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
15
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
16
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
17
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
18
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
19
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
20
५० रुपये प्रति तास या हिशोबाने भाड्याने मिळतायेत 'Friend'; केरळमधील अजब ट्रेंडनं वाढवलं टेन्शन

जिल्हा हागणदारीमुक्तीसाठी सहकार्य करा

By admin | Updated: February 12, 2016 23:38 IST

शेखर सिंह : स्वच्छ भारत अभियानांतर्गत नाधवडे, करुळला बैठक

वैभववाडी : स्वच्छ भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. त्यानुसार ३१ मार्चपूर्वी प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय असणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले. शौचालय उभारण्याच्या प्रक्रियेत प्रशासकीय अडचणी येत असतील तर माझ्याकडे तक्रार करा, असे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी आज नाधवडे व करुळ येथील बैठकीत नागरिकांना सांगितले.स्वच्छ भारत अभियानाच्या उद्दीष्टपूर्तीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी नाधवडे आणि करुळ ग्रामपंचायतीत बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, सभापती शुभांगी पवार, उपसभापती बंड्या मांजरेकर, गटविकास अधिकारी सदानंद पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी मिलिंद जाधव, जिल्हा परिषद सदस्या स्नेहलता चोरगे, पंचायत समिती सदस्य नासीर काझी, शोभा सुतार, माजी सभापती बाप्पी मांजरेकर, गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिणगारे, विस्तार अधिकारी हांडे, नाधवडे सरपंच दादा पावसकर, करुळ सरपंच रमेश सुतार, उपसरपंच भय्या कदम आदी उपस्थित होते.स्वच्छ भारत अभियानात जिल्ह्यातील १२ गावे पिछाडीवर असून, त्यापैकी ५ गावे ही वैभववाडी तालुक्यात आहेत. सन २०१२च्या सर्वेक्षणानुसार पात्र लाभार्थ्यांना शौचालयासाठी शासन १२ हजार रुपये अनुदान देत आहे. त्यामुळे नागरिकांनी या अनुदानाचा लाभ घेऊन अभियानाच्या १०० टक्के यशस्वीतेसाठी प्रशासनाला सहकार्य करावे. यामध्ये ग्रामसेवक किंवा कर्मचाऱ्यांकडून सहकार्य मिळत नसेल तर थेट माझ्याकडे तक्रार करा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी दोन्ही गावातील ग्रामस्थांना केले. (प्रतिनिधी)करुळ केगदवाडीवर कुटुंबांच्या तुलनेत शौचालयांची संख्या कमी आहे. याचे मुख्य कारण रस्त्याअभावी बांधकाम साहित्याची न परवडणारी वाहतूक हेच आहे. त्यामुळे शौचालयाच्या अनुदानाखेरीज विशेष बाब म्हणून वाहतूक खचार्साठी अतिरिक्त अनुदान देण्याचे आश्वासन दिले व शौचालय बांधून शंभर टक्के अभियानाला सहकार्य करण्याचे आवाहन शेखर सिंह यांनी केगदवाडीच्या रहिवाशांना केले.वीज, रस्ता व पाणी या मुलभूत सुविधांपासून पाच पिढ्या वंचित असलेल्या करुळ केगदवाडी या धनगर वस्तीवर जाऊन मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी तेथील रहिवाशांच्या समस्या ऐकल्या. यावेळी तेथील वयोवृद्धांनी मुलभूत सोयी सुविधांअभावी होत असलेल्या हालअपेष्टांचा पाढा वाचला. त्यावेळी मी तुमच्या भावनांचा आदर करतो. मात्र, तुम्हाला आत्ता कोणतेही आश्वासन देऊ शकणार नाही. परंतु, तुमच्या समस्यांचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करेन, असे सिंह यांनी केगदवाडीच्या रहिवाशांना सांगितले. करुळच्या केगदवाडी या धनगर वस्तीवर पोहोचणारे शेखर सिंह हे पहिले आयएएस अधिकारी ठरले.