शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

जिल्हा हागणदारीमुक्तीसाठी सहकार्य करा

By admin | Updated: February 12, 2016 23:38 IST

शेखर सिंह : स्वच्छ भारत अभियानांतर्गत नाधवडे, करुळला बैठक

वैभववाडी : स्वच्छ भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. त्यानुसार ३१ मार्चपूर्वी प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय असणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले. शौचालय उभारण्याच्या प्रक्रियेत प्रशासकीय अडचणी येत असतील तर माझ्याकडे तक्रार करा, असे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी आज नाधवडे व करुळ येथील बैठकीत नागरिकांना सांगितले.स्वच्छ भारत अभियानाच्या उद्दीष्टपूर्तीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी नाधवडे आणि करुळ ग्रामपंचायतीत बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, सभापती शुभांगी पवार, उपसभापती बंड्या मांजरेकर, गटविकास अधिकारी सदानंद पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी मिलिंद जाधव, जिल्हा परिषद सदस्या स्नेहलता चोरगे, पंचायत समिती सदस्य नासीर काझी, शोभा सुतार, माजी सभापती बाप्पी मांजरेकर, गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिणगारे, विस्तार अधिकारी हांडे, नाधवडे सरपंच दादा पावसकर, करुळ सरपंच रमेश सुतार, उपसरपंच भय्या कदम आदी उपस्थित होते.स्वच्छ भारत अभियानात जिल्ह्यातील १२ गावे पिछाडीवर असून, त्यापैकी ५ गावे ही वैभववाडी तालुक्यात आहेत. सन २०१२च्या सर्वेक्षणानुसार पात्र लाभार्थ्यांना शौचालयासाठी शासन १२ हजार रुपये अनुदान देत आहे. त्यामुळे नागरिकांनी या अनुदानाचा लाभ घेऊन अभियानाच्या १०० टक्के यशस्वीतेसाठी प्रशासनाला सहकार्य करावे. यामध्ये ग्रामसेवक किंवा कर्मचाऱ्यांकडून सहकार्य मिळत नसेल तर थेट माझ्याकडे तक्रार करा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी दोन्ही गावातील ग्रामस्थांना केले. (प्रतिनिधी)करुळ केगदवाडीवर कुटुंबांच्या तुलनेत शौचालयांची संख्या कमी आहे. याचे मुख्य कारण रस्त्याअभावी बांधकाम साहित्याची न परवडणारी वाहतूक हेच आहे. त्यामुळे शौचालयाच्या अनुदानाखेरीज विशेष बाब म्हणून वाहतूक खचार्साठी अतिरिक्त अनुदान देण्याचे आश्वासन दिले व शौचालय बांधून शंभर टक्के अभियानाला सहकार्य करण्याचे आवाहन शेखर सिंह यांनी केगदवाडीच्या रहिवाशांना केले.वीज, रस्ता व पाणी या मुलभूत सुविधांपासून पाच पिढ्या वंचित असलेल्या करुळ केगदवाडी या धनगर वस्तीवर जाऊन मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी तेथील रहिवाशांच्या समस्या ऐकल्या. यावेळी तेथील वयोवृद्धांनी मुलभूत सोयी सुविधांअभावी होत असलेल्या हालअपेष्टांचा पाढा वाचला. त्यावेळी मी तुमच्या भावनांचा आदर करतो. मात्र, तुम्हाला आत्ता कोणतेही आश्वासन देऊ शकणार नाही. परंतु, तुमच्या समस्यांचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करेन, असे सिंह यांनी केगदवाडीच्या रहिवाशांना सांगितले. करुळच्या केगदवाडी या धनगर वस्तीवर पोहोचणारे शेखर सिंह हे पहिले आयएएस अधिकारी ठरले.