शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
5
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
6
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
7
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
8
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
9
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
10
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
11
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
12
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
13
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
14
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
15
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
16
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
17
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
18
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
19
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
20
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?

अंशदायी पेन्शन हिस्सा पाच वर्षे जमा नाही

By admin | Updated: November 7, 2014 23:42 IST

चंद्रकांत अणावकर : राज्यातील ३५000 शिक्षकांना प्रशासन कारभाराचा फटका

कुडाळ : शासनाच्या परिभाषित अंशदायी पेन्शन योजनेतील शिक्षकांच्या खात्यावर दरवर्षी जमा करावयाच्या शासन हिस्सा रकमेची गेल्या पाच वर्षात एकदासुद्धा वार्षिक बजेटमध्ये तरतूद करून शिक्षण मंत्रालय प्रशासनाने वेळीच मंजुरी न घेतल्यामुळे संबंधित शिक्षकांच्या खात्यावर गेली पाच वर्षे शासन हिस्सा जमा झालेली नाही. बजेटमध्येच तरतूद नसल्याने मागील पाच वर्षातील रक्कम शासनाकडून पूर्वलक्षी प्रभावाने मिळणार की नाही, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.प्रशासनाच्या या गलथानपणाचा फटका महाराष्ट्रातील सुमारे ३५००० शिक्षकांना बसला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सल्लागार चंद्रकांत अणावकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे. केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ८०० शिक्षक या पेन्शन योजनेत सहभागी असून त्यांच्या खाती मागील पाच वर्षांची रक्कम जमा करण्यासाठी ६ कोटी ६८ लाख ४२ हजार रुपये शिक्षण संचालक, पुणे यांच्याकडून मिळालेले नाहीत. महाराष्ट्रातील ३५,००० शिक्षकांच्या खाती शासन हिस्सा रक्कम जमा करण्यासाठी सुमारे ३१५ कोटी रुपये शासनाकडून मिळाले पाहिजेत. याबाबत अधिक माहिती देण्यास वित्त विभागाचे अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. मात्र, शिक्षण संचालकांकडून शासन हिस्सा मिळाल्यानंतर ती संबंधितांच्या खात्यावर जमा करून हिशोब पत्रके दिली जातील, असे गेली दोन वर्षे सांगितले जात आहे. मात्र, शिक्षण संचालक कार्यालयात पाठपुरावा केल्यानंतर, १ नोव्हेंबर २००५ नंतर शासन आणि जिल्हा परिषद सेवेत दाखल झालेल्या कर्मचारी व शिक्षकांना ही नवीन परिभाषित अंशदान पेन्शन योजना लागू झाली. पूर्वी जिंल्हा परिषदमधील सर्व प्राथमिक शिक्षकांसहीत सर्व कर्मचाऱ्याचे वेतनासाठी खर्च पडणाऱ्या रकमेचे बजेट ग्रामविकास मंत्रालयातर्फे तयार करून त्याला मंजुरी घेतली जात असे. परंतु आता प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांवर खर्च पडणाऱ्या रकमेचे बजेट शालेय शिक्षण मंत्रालयात तयार केले जाते. परंतु शिक्षकांच्या पारिभाषित अंशदान पेन्शन योजनेसाठी शासन हिस्सा रकमेची बजेटमध्ये तरतूद शालेय शिक्षण मंत्रालयाने केलेलीच नाही. त्यामुळे शासनाकडून संबंधित जिल्हा परिषद शिक्षण विभागाला मिळू शकलेली नाही, अशी माहिती मिळाली. त्यामुळे पुणे येथे १६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राज्य कार्यकारिणीच्या सभेत या प्रश्नावर चर्चा करण्यात येणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)