शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

सिंधुदुर्गात संततधार सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2016 23:47 IST

बळिराजा सुखावला : गतवर्षीच्या तुलनेत ३0२७ मिलिमीटर जास्त पाऊस

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाची असणारी संततधार शनिवारीही सुरूच होती. यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज अजूनपर्यंत तरी खरा ठरला आहे. दरम्यान, गेले पाच दिवस सिंधुुदुर्गात पडलेल्या संततधार पावसाने नदी, नाले, ओहोळांना पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या चौवीस तासांत जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस कणकवली तालुक्यात पडला आहे. गेल्या महिन्याभरात जिल्ह्यात १२९१.३० च्या सरासरीने १०३२८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, गतवर्षी याच दिवसापर्यंत ९१२.६५ च्या सरासरीने ७३००.२० मिलीमीटर पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात यावर्षी ३०२७ मिलीमीटर जास्त पाऊस झाल्याची नोंद प्रशासनाकडे प्राप्त आहे. अजूनपर्यंत जिल्ह्यात पडझड होऊन ११ लाख १७ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या पावसाने बळिराजा मात्र सुखावला आहे. जिल्ह्यात यावर्षी पावसाने उशिरा जरी सुरुवात केली असली तरी तो समाधानकारक बरसत आहे. यंदा सरासरीपेक्षा १३० टक्के पाऊस जास्त पडणार असे हवामान खात्याचे भाकीत सद्य:स्थितीत तरी सत्यात उतरले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ३०२७ मिलीमीटर जास्त पाऊस पडला असून, शेतीसाठी पूरक असा पाऊस पडत आहे. यामुळे शेतकरी सुखावला असून शेतीच्या कामांना जोर चढला आहे. १९ जूनपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसाने अद्यापपर्यंत पाचजणांचे बळी घेतले असून त्यापैकी दोन मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी चार लाखांप्रमाणे प्रशासनाकडून मदत केली आहे. पाच जनावरे मृत्युमुखी पडली असून, त्यापैकी एका जनावराच्या मालकाला २५ हजारांची मदत करण्यात आली आहे. (प्रतिनिधी) वरवडेत पुराच्या पाण्याने वाहतूक ठप्प कणकवली तालुक्यात शनिवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. वरवडे सेंट उसुर्ला स्कूलजवळ कणकवली-आचरा रस्त्यावर सकाळी ७ वाजता पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी दोन तास बंद झाला होता. त्यानंतर पाणी ओसरल्याने वाहतूक सुरु झाली. कणकवली-आचरा, कलमठ -फणसवाडी, बिडवाडी, आडवली येथे रात्री रस्त्यावर झाडे उन्मळुन पडली. ही झाडे बांधकाम विभागाचे शाखा अभियंता प्रमोद कांबळे यांनी सहकाऱ्यांसहित मध्यरात्री तीन वाजल्यापासून बाजूला केली. तसेच रस्ता वाहतुकीस मोकळा केला. तर वरवड़े सेंट उसुर्ला हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना शनिवारी वाढत्या पावसामुळे सुटी देण्यात आली होती ६१ घरांची पडझड गेल्या महिनाभरात जिल्ह्याभरातील ६१ घरांची पडझड होऊन सुमारे नऊ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे., तर सात गोठ्यांची पडझड झाली असून, त्यात ५८ हजार ४४० रुपयांचे नुकसान झाले आहे. शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू देवगड : तालुक्यातील जामसंडे येथील तलावात मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेला प्रतीक राजन ठुकरूल (वय १६, रा. जामसंडे बेलवाडी) याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडली असून, देवगड पोलिस ठाण्यामध्ये या घटनेची आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. वृत्त/४