शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

सिंधुदुर्गात संततधार सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2016 23:47 IST

बळिराजा सुखावला : गतवर्षीच्या तुलनेत ३0२७ मिलिमीटर जास्त पाऊस

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाची असणारी संततधार शनिवारीही सुरूच होती. यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज अजूनपर्यंत तरी खरा ठरला आहे. दरम्यान, गेले पाच दिवस सिंधुुदुर्गात पडलेल्या संततधार पावसाने नदी, नाले, ओहोळांना पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या चौवीस तासांत जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस कणकवली तालुक्यात पडला आहे. गेल्या महिन्याभरात जिल्ह्यात १२९१.३० च्या सरासरीने १०३२८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, गतवर्षी याच दिवसापर्यंत ९१२.६५ च्या सरासरीने ७३००.२० मिलीमीटर पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात यावर्षी ३०२७ मिलीमीटर जास्त पाऊस झाल्याची नोंद प्रशासनाकडे प्राप्त आहे. अजूनपर्यंत जिल्ह्यात पडझड होऊन ११ लाख १७ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या पावसाने बळिराजा मात्र सुखावला आहे. जिल्ह्यात यावर्षी पावसाने उशिरा जरी सुरुवात केली असली तरी तो समाधानकारक बरसत आहे. यंदा सरासरीपेक्षा १३० टक्के पाऊस जास्त पडणार असे हवामान खात्याचे भाकीत सद्य:स्थितीत तरी सत्यात उतरले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ३०२७ मिलीमीटर जास्त पाऊस पडला असून, शेतीसाठी पूरक असा पाऊस पडत आहे. यामुळे शेतकरी सुखावला असून शेतीच्या कामांना जोर चढला आहे. १९ जूनपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसाने अद्यापपर्यंत पाचजणांचे बळी घेतले असून त्यापैकी दोन मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी चार लाखांप्रमाणे प्रशासनाकडून मदत केली आहे. पाच जनावरे मृत्युमुखी पडली असून, त्यापैकी एका जनावराच्या मालकाला २५ हजारांची मदत करण्यात आली आहे. (प्रतिनिधी) वरवडेत पुराच्या पाण्याने वाहतूक ठप्प कणकवली तालुक्यात शनिवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. वरवडे सेंट उसुर्ला स्कूलजवळ कणकवली-आचरा रस्त्यावर सकाळी ७ वाजता पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी दोन तास बंद झाला होता. त्यानंतर पाणी ओसरल्याने वाहतूक सुरु झाली. कणकवली-आचरा, कलमठ -फणसवाडी, बिडवाडी, आडवली येथे रात्री रस्त्यावर झाडे उन्मळुन पडली. ही झाडे बांधकाम विभागाचे शाखा अभियंता प्रमोद कांबळे यांनी सहकाऱ्यांसहित मध्यरात्री तीन वाजल्यापासून बाजूला केली. तसेच रस्ता वाहतुकीस मोकळा केला. तर वरवड़े सेंट उसुर्ला हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना शनिवारी वाढत्या पावसामुळे सुटी देण्यात आली होती ६१ घरांची पडझड गेल्या महिनाभरात जिल्ह्याभरातील ६१ घरांची पडझड होऊन सुमारे नऊ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे., तर सात गोठ्यांची पडझड झाली असून, त्यात ५८ हजार ४४० रुपयांचे नुकसान झाले आहे. शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू देवगड : तालुक्यातील जामसंडे येथील तलावात मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेला प्रतीक राजन ठुकरूल (वय १६, रा. जामसंडे बेलवाडी) याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडली असून, देवगड पोलिस ठाण्यामध्ये या घटनेची आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. वृत्त/४