शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

नेरुरमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा

By admin | Updated: September 23, 2014 00:16 IST

पंधराजणांना तापाची लागण : पाण्याच्या टाकीत माकड कुजलेल्या अवस्थेत

कुडाळ : नेरूर- वाघचौडी येथील ग्रामीण राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत बांधलेल्या झाकण नसलेल्या पाण्याच्या टाकीत माकड कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. या टाकीतील दूषित पाण्याचा पुरवठा ग्रामस्थांना करण्यात आले. हे दूषित पाणी प्यायल्यामुळे पंधरा ते वीसजणांना तापाची लागण झाली आहे. पंचायत समितीचा पाणी पुरवठा विभाग व नेरूर ग्रामपंचायतीचा दुर्लक्षामुळे येथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आल्याचे संतप्त प्रतिक्रिया यावेळी व्यक्त होत आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की, वर्षभरापूर्वी नेरूर वाघचौडी येथील सुमारे १५० कुटुुंबातील ४०० ते ४५० ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, याकरिता शासनाच्या राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत या ठिकाणी पाण्याची टाकी बांधण्यात आली होती. या टाकीतून ग्रामस्थांना नळाद्वारे पाणी पुरवठा गेल्या वर्षभरापासून केला जात होता. मात्र, पाण्याच्या टाकीच्या पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाने दाखविलेला निष्काळजीपणा तसेच नेरूर ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष यामुळे येथील लोकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागले आहे. वर्षभरापासून पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या या टाकीवर जिल्हा परिषद बांधकाम विभागाने ठेकेदाराकडून झाकण बसवून घेतले नव्हते.टाकी तशीच उघडी ठेवण्यात आली होती. गेले दोन दिवस या टाकीतून येणाऱ्या पाण्याला वास कसा येतो, अशीच चर्चा ग्रामस्थांमध्ये होती. सोमवारी सकाळी मोठ्या प्रमाणात पाण्याला वास येऊ लागल्याने काही ग्रामस्थांनी टाकीवर चढून पाहिले असता त्यामध्ये माकड मृतावस्थेत असलेले आढळले. मृतावस्थेतील माकड कुजल्याने या टाकीत तीन ते चार दिवसांपूर्वी पडले असावे, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत कोणतीच कल्पना नसलेले ग्रामस्थ तेच पाणी पित होते. पाण्याला वास येऊ लागल्यानंतर याची शहानिशा केल्यानंतर सत्य परिस्थिती ग्रामस्थांच्या निदर्शनास आली. दूषित पाणी दोन ते तीन दिवस पिल्याने सोमवारी येथील काही पुरुष, महिला आणि मुलांना तापाची लागण होऊन त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेले वर्षभर या टाकीवर झाकण नाही. तरीही जिल्हा परिषद बांधकाम विभाग तसेच ग्रामपंचायतीने पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्यामुळे आम्हाला या परिस्थितीला सामोरे जावे लागले, असा आरोप संतप्त ग्रामस्थांनी केला. या टाकीवर झाकण न बसविता पाणी सोडल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली असून यामुळे भविष्यात ग्रामस्थ, विशेषत: लहान मुलांच्या स्वास्थ्यावर परिणाम झाल्यास याला जबाबदार कोण? पाणी पुरवठा विभाग, नेरूर ग्रामपंचायत की ठेकेदार, असा सवाल उपस्थित होत आहे. या घटनेमुळे काही ग्रामस्थांनी घरी बनविलेले जेवण टाकून दिले. तसेच परिसरात अन्य विहीर नसल्याने याठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करावा लागणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. यावेळी रूपेश पावसकर, राजू सडवेलकर, जयेश परब, संदीप गावडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, या दूषीत पाण्यामुळे पसरलेल्या साथीमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)अहवाल वरीष्ठांकडे पाठविणार : नाईकया घटनेबाबबतची योग्य ती माहिती घेण्यात येणार आहे. तसेच या संदर्भातील अहवाल आपण वरिष्ठांकडे पाठविणार असल्याचे कुडाळचे गटविकास अधिकारी व्ही. एन. नाईक यांनी या घटनेबाबत बोलताना सांगितले.आरोग्य तपासणी सुरू या घटनेची माहिती मिळताच त्या परिसरातील सर्व ग्रामस्थांची आरोग्य तपासणी सुरू के ली आहे. अजून काही दिवस दैनंदिन सर्वेक्षण सुरू ठेवणार आहे. येथील पाणी तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी आर. एम. कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.