शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

आगामी निवडणुकीत भाजप तिकीट देईल का याचा विचार करा, सतीश सावंतांचा नितेश राणेंना टोला 

By सुधीर राणे | Updated: March 13, 2023 17:02 IST

मला पक्षात घ्या, म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे याचना करण्याची वेळ भविष्यात त्यांच्यावर आल्याशिवाय राहणार नाही

कणकवली: स्वत:चा स्वाभिमान पक्ष सात महिने जे जिवंत ठेऊ शकले नाहीत, त्यांनी  शिवसेनेला जिवंत ठेवण्याची भाषा करू नये. भाजपाने तिकीट वाटपाचा अधिकार आमदार नितेश राणेंना दिलेला नाही. उलट आगामी निवडणुकीत त्यांनाच तिकीट मिळते का? ही शंका आहे. भाजपाची वरिष्ठ मंडळी त्यांना किती दिवस पक्षात जिवंत ठेवणार याचा त्यांनी आधी विचार करावा. मला पक्षात घ्या, म्हणून आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे याचना करण्याची वेळ भविष्यात त्यांच्यावर आल्याशिवाय राहणार नाही, असा उपरोधिक टोला शिवसेना नूतन जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांनी आमदार नितेश  राणे यांना लगावला आहे.कणकवली येथील मध्यवर्ती कार्यालयात आज, सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला आघाडी जिल्हा संघटक निलम सावंत-पालव, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, नगरसेवक कन्हैया पारकर, ॲड. हर्षद गावडे, प्रमोद मसुरकर, गोट्या कोळसुलकर, उत्तम लोके, वैद्येही गुडेकर, दिव्या साळगावकर, माधवी दळवी, संजना कोलते व इतर पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.सतीश सावंत म्हणाले, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जिल्हाप्रमुख सोडाच पण साधा निष्ठावान शाखाप्रमुखही आमदार नितेश राणेंच्या संपर्कात येणार नाही. त्यामुळे त्यांनी दिवास्वप्ने पाहू नयेत. नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडले त्यावेळी त्यांच्यासोबत अकरा आमदार होते. आज काय स्थिती आहे. त्यावेळी निवडणुका आल्यावर आघाडीची सत्ता येणार याची चाहूल लागताच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर काँग्रेसची सत्ता जाणार हे समजताच भाजपात प्रवेश केला. आमदार नितेश राणे केवळ स्टंटबाजीशिवाय काहीच करत नाहीत. उलट आमदार वैभव नाईक कुडाळ मालवण मतदारसंघात चांगले काम करीत आहेत. राणेंनी निधीची केलेली घोषणा ही कागदावरची आहे. त्यामुळे जूनमध्ये समजेल त्यापैकी  किती कामे झाली आहेत. घाट रस्त्यासाठी  ४०० कोटीचा निधी आला असल्याचे ते सांगत आहेत, पण गगनबावडा रस्त्याची स्थिती  काय आहे? ठेकेदार भेटायला यावेत व कार्यकर्ते आपल्याबरोबरच थांबावेत यासाठी २ हजार कोटीचा निधी मंजूर केला असे सांगून  त्यांची धडपड चालू ठेवली आहे.गद्दारीनंतरही जिल्ह्यातील शिवसेना अभेद्य आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतरही खेडमधील जी सभा झाली, ती विरोधकांना धडकी भरविणारी होती. जनता आमच्यासोबत असून आगामी निवडणुकीत मतदारच विरोधकांना चपराक देतील व सिंधुदुर्गातील तीनही आमदार व खासदार आमचेच असतील असेही सतीश सावंत म्हणाले.ते पुढे म्हणाले, कणकवली विधानसभा मतदारसंघाचा जिल्हाप्रमुख म्हणून संधी दिल्याबद्दल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत, खासदार संजय राऊत, भास्कर जाधव, वैभव नाईक, अरूण दुधवडकर, गौरीशंकर खोत यांना आपण धन्यवाद देतो. पक्षप्रमुखांना अपेक्षीत असलेले काम आपण या मतदारसंघात करणार असून येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूकीच्या अनुषंगाने पक्षबांधणी करण्यात येणार आहे. तालुका व विभाग निहाय बैठका, आवश्यकतेनुसार वरिष्ठांशी चर्चा करून नविन नियुक्त्या, बुथ सक्षम करणे आदी कामे केली जातील.कोणत्याही स्थितीत पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जातील सर्वांना विश्वासात घेऊन संघटना वाढीसाठी प्रयत्न केले जातील असे सतीश सावंत यावेळी म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Satish Sawantसतीश सावंत