शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
2
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
3
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
4
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
5
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
6
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
7
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
8
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
9
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
10
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
11
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
12
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
13
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
14
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
15
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
16
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
17
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
18
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
19
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
20
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास

संपूर्ण भारत कोकणशी ‘कनेक्ट’

By admin | Updated: September 7, 2016 23:55 IST

सुरेश प्रभू : बंदर धोरण लवकरच; प. महाराष्ट्रसह देशातील प्रमुख शहरांशी रेल्वे जोडणार

मालवण : कोकणातील पर्यटनामुळे देशासह विदेशातील हौशी कोकणाशी कनेक्ट झाले आहेत. पर्यटनाबरोबरच कोकण किनारपट्टीवरील बंदरांचा विकास करून संपूर्ण भारत देश कोकणला जोडण्यासाठी केंद्र सरकार विचाराधीन आहे. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे, तर रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून कऱ्हाड ते चिपळूण आणि वैभववाडी ते कोल्हापूर या नव्या रेल्वेमार्गांमुळे पश्चिम महाराष्ट्रसह भारतातील प्रमुख शहरे कोकणला ‘कनेक्ट’ करण्यासाठी रेल्वे मंत्रालय पुढाकार घेणार आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली.गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहरातील मेढा येथील निवासस्थानी आलेल्या मंत्री प्रभू यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारच्या सकारात्मक भूमिकेबाबत माहिती देताना येणाऱ्या काळात संपूर्ण कोकण देशाशी जोडले गेलेले असणार आहे. केंद्राच्या माध्यमातून तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहोत. कोकणला जोडण्यात येणाऱ्या नव्या रेल्वेमार्गांमुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह कोकणला प्रगतीची दिशा मिळेल, अशी आशा प्रभू यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)बंदरांचाही विकास करणारमंत्री प्रभू म्हणाले, भारताच्या किनारपट्टीवरील बंदरे अनेक वर्षे दुर्लक्षित राहिली आहेत. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या बंदरांची प्रगती न झाल्याने भारताच्या किनारपट्टीवर म्हणावा तसा विकास साध्य करता आला नाही. मात्र, याबाबत मोदी सरकार सकारात्मक असून, भारतातील बंदरांना चालना देण्याचे धोरण निश्चित केले आहे. त्यामुळे कोकणातील बंदरांना गतवैभव व चालना मिळून येथील भागाचा विकास साधण्यासाठी मंत्री गडकरी यांच्याशी चर्चा झाली असून, लवकरच कोकणातील बंदरांचा विकास करण्याचे काम हाती घेण्यात येईल. जिल्ह्याच्या विकासासाठी युती हवीच!जिल्ह्यात होत असलेल्या आगामी निवडणुकीत शिवसेना-भाजपच्या युतीबाबत विचारले असता प्रभू म्हणाले, जिल्ह्याच्या विकासासाठी भाजप-शिवसेनेत युती होणे महत्त्वाचे आहे. सिंधुदुर्गातील मतदार मोठ्या प्रमाणात युतीचाच आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी दोन्ही पक्षांत युती व्हावी ही आपली इच्छा असून, याचा फायदाही मतदारांना होणार आहे. जिल्ह्यात युती होण्यासाठी आपणही प्रयत्न करणार आहोत.