शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण भारत कोकणशी ‘कनेक्ट’

By admin | Updated: September 7, 2016 23:55 IST

सुरेश प्रभू : बंदर धोरण लवकरच; प. महाराष्ट्रसह देशातील प्रमुख शहरांशी रेल्वे जोडणार

मालवण : कोकणातील पर्यटनामुळे देशासह विदेशातील हौशी कोकणाशी कनेक्ट झाले आहेत. पर्यटनाबरोबरच कोकण किनारपट्टीवरील बंदरांचा विकास करून संपूर्ण भारत देश कोकणला जोडण्यासाठी केंद्र सरकार विचाराधीन आहे. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे, तर रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून कऱ्हाड ते चिपळूण आणि वैभववाडी ते कोल्हापूर या नव्या रेल्वेमार्गांमुळे पश्चिम महाराष्ट्रसह भारतातील प्रमुख शहरे कोकणला ‘कनेक्ट’ करण्यासाठी रेल्वे मंत्रालय पुढाकार घेणार आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली.गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहरातील मेढा येथील निवासस्थानी आलेल्या मंत्री प्रभू यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारच्या सकारात्मक भूमिकेबाबत माहिती देताना येणाऱ्या काळात संपूर्ण कोकण देशाशी जोडले गेलेले असणार आहे. केंद्राच्या माध्यमातून तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहोत. कोकणला जोडण्यात येणाऱ्या नव्या रेल्वेमार्गांमुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह कोकणला प्रगतीची दिशा मिळेल, अशी आशा प्रभू यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)बंदरांचाही विकास करणारमंत्री प्रभू म्हणाले, भारताच्या किनारपट्टीवरील बंदरे अनेक वर्षे दुर्लक्षित राहिली आहेत. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या बंदरांची प्रगती न झाल्याने भारताच्या किनारपट्टीवर म्हणावा तसा विकास साध्य करता आला नाही. मात्र, याबाबत मोदी सरकार सकारात्मक असून, भारतातील बंदरांना चालना देण्याचे धोरण निश्चित केले आहे. त्यामुळे कोकणातील बंदरांना गतवैभव व चालना मिळून येथील भागाचा विकास साधण्यासाठी मंत्री गडकरी यांच्याशी चर्चा झाली असून, लवकरच कोकणातील बंदरांचा विकास करण्याचे काम हाती घेण्यात येईल. जिल्ह्याच्या विकासासाठी युती हवीच!जिल्ह्यात होत असलेल्या आगामी निवडणुकीत शिवसेना-भाजपच्या युतीबाबत विचारले असता प्रभू म्हणाले, जिल्ह्याच्या विकासासाठी भाजप-शिवसेनेत युती होणे महत्त्वाचे आहे. सिंधुदुर्गातील मतदार मोठ्या प्रमाणात युतीचाच आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी दोन्ही पक्षांत युती व्हावी ही आपली इच्छा असून, याचा फायदाही मतदारांना होणार आहे. जिल्ह्यात युती होण्यासाठी आपणही प्रयत्न करणार आहोत.