शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
2
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
4
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
5
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
6
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
7
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
8
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
9
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
10
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
11
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
12
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
13
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
14
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
15
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
16
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
17
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
18
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
19
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
20
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!

भ्रष्टाचार काँग्रेसने पोसला

By admin | Updated: July 27, 2014 00:38 IST

वामन मेश्राम : महाजागरणअंतर्गत कणकवलीत मेळावा

कणकवली : स्वातंत्र्य मिळाल्यापासून कॉँग्रेसने भ्रष्टाचार आणि जातीयवादाच्या आधारे निवडणुका जिंकल्या आहेत. तसेच विशिष्ट जातीला प्राधान्य देत बहुजन समाजाला सत्तेपासून दूर ठेवण्याचे कारस्थान कॉँग्रेसने केले. आम्ही या देशात गुलाम असून आम्हाला स्वातंत्र्य हवे आहे, असे प्रतिपादन भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केले. महाजागरण अभियानांतर्गत येथील भगवती मंगल कार्यालयात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अ‍ॅड. उमेश सावंत, शबाना मुल्ला, राजरत्न आंबेडकर, मिशा मेश्राम, मामा माडये, एकनाथ तेली, प्रताप भोसले, नगरसेवक गौतम खुडकर, अनिल डेगवेकर, नंदू आरोलकर आदी उपस्थित होते. १९५२ मध्ये झालेल्या पहिल्या लोकसभेपासूनच निवडणुका या गडबड करून जिंकल्या गेल्या. नेहरूंनी विशिष्ट समुदायाचा जातीवाद गुप्तपणे राबवला. राज्यात ज्या जातीचे प्राबल्य त्यांना कॉँग्रेसने दिल्लीत आमचे सरकार आणा राज्यात तुमचे सरकार बनवू असे आमिष दाखवून जातीयवाद पोसला. या राजकारणातूनच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना बनवून मराठावाद निर्माण केला. उमेदवारांना निवडणुकीसाठी मर्यादेपेक्षा जास्त पैसा पुरवण्याचे कॉँग्रेसनेचे सुरू केले. निवडणुकीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा याच पैशांच्या ताकदीने पराभव करण्यात आला. आजही कॉँग्रेस निवडणुकीसाठी शेकडो कोटी रूपये खर्च करते. त्यासाठी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पैसा उभा केला जात आहे. पुढील काळात कॉँग्रेसने मतदान प्रक्रियेतच गौडबंगाल करण्यास सुरूवात केली. गुंडांच्या माध्यमातून बूथ कॅप्चरिंग करण्यासही सुरूवात केली. आणि याच गुंडांना पुढे तिकीटही देऊ केली. १९६७ च्या पुढील निवडणुकांमध्ये गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना पैसे देऊ करण्यात आले आणि त्यानंतर घरोघर पैसा वाटण्यात आला. पैसे वाटप करून निवडणुका जिंकण्याची कामे करण्यात आली, असे आरोप वामन मेश्राम यांनी केले. यावेळी इतर मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. (प्रतिनिधी)