शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा शासनाविरोधी एल्गार

By admin | Updated: February 11, 2016 23:47 IST

राजापूर तालुका : केंद्र, शासनाच्या धोरणाचा करणार निषेध

राजापूर : केवळ आश्वासने देऊन केंद्रासह राज्यात सत्तेवर आलेली भाजपप्रणित शासन सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरली असल्याचा आरोप करीत शासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी दिनांक १५ फेब्रुवारीला राजापूर तालुका काँग्रेसच्यावतीने तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.दीड वर्षाहून अधिक काळ केंद्र व राज्यातील भाजपच्या सरकारने जनतेला ‘अच्छे दिन’ची स्वप्न दाखवली होती. पण, प्रत्यक्षात ही दोन्ही सरकारे सर्वच क्षेत्रात निष्प्रभ ठरली आहेत. त्याचा फटका गोरगरीब जनतेसह शेतकरी, कामगार यांच्यासह सर्वच क्षेत्राला बसला आहे. शासनाने सर्व जनतेची घोर फसवणूक केली आहे. अशा सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.काँग्रेस राजवटीत रेशनवर मिळणारे धान्य या सरकारने बंद करून टाकले. महागाई तिपटीने वाढली आहे. घरबांधणी व दुरुस्तीच्या अधिकारात हस्तक्षेप झाल्याने आता परवानगीसाठी जाचक अटी ठेवण्यात आल्याने सर्वसामान्य जनतेची ससेहोलपट सुरु झाली आहे. एस. टी.सह रेल्वेप्रवास दरात झालेली वाढ, वाढविलेली भरमसाठ घरपट्टी, गौण खनिजाबाबत लादलेल्या जाचक अटी अशा विविध मुद्द्यांकडे केंद्र आणि राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राजापूर तालुका काँग्रेसने मोर्चाचे आयोजन केले आहे.या मोर्चात माजी खासदार नीलेश राणे, विधानपरिषद सदस्य अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे, जिल्हाध्यक्ष रमेश कीर, प्रदेश प्रवक्ते हरीश रोग्ये, ज्येष्ठ नेते राजन देसाई यांच्यासह पक्षाचे नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.सोमवारी सकाळी १० वाजता राजापूर शहरातील गणेश विसर्जन घाटापासून मोर्चा सुरू होऊन तहसील कार्यालयापर्यंत जाईल. विविध समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढणार असल्याची माहिती काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रवींद्र नागरेकर यांनी दिली. (प्रतिनिधी)आंदोलन : सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न...वाढती महागाई, सामान्यांच्या प्रश्नांबाबत शासनाने घेतलेले वादग्रस्त निर्णय, रेशनवरून गायब झालेले धान्य अशा विविध प्रश्नावर शासनाला कोंडीत पकडण्याचा काँग्रेसने आटोकाट प्रयत्न केला आहे. माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली विविध ठिकाणी अशी आंदोलने करण्यात येत आहेत. २६ जानेवारी रोजी रत्नागिरीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात आले होते.राष्ट्रवादीचं काय?केंद्रातील व राज्यातील सरकारच्या कारभाराविरोधात तालुका काँग्रेसने मोर्चाचे आयोजन केले असतानाच काँग्रेसचा तालुक्यात कधी - कधी मित्रपक्षाची भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने या मोर्चाबाबत आपली भूमिका जाहीर केलेली नाही.