शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

काँग्रेसचा शासनाविरोधी एल्गार

By admin | Updated: February 11, 2016 23:47 IST

राजापूर तालुका : केंद्र, शासनाच्या धोरणाचा करणार निषेध

राजापूर : केवळ आश्वासने देऊन केंद्रासह राज्यात सत्तेवर आलेली भाजपप्रणित शासन सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरली असल्याचा आरोप करीत शासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी दिनांक १५ फेब्रुवारीला राजापूर तालुका काँग्रेसच्यावतीने तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.दीड वर्षाहून अधिक काळ केंद्र व राज्यातील भाजपच्या सरकारने जनतेला ‘अच्छे दिन’ची स्वप्न दाखवली होती. पण, प्रत्यक्षात ही दोन्ही सरकारे सर्वच क्षेत्रात निष्प्रभ ठरली आहेत. त्याचा फटका गोरगरीब जनतेसह शेतकरी, कामगार यांच्यासह सर्वच क्षेत्राला बसला आहे. शासनाने सर्व जनतेची घोर फसवणूक केली आहे. अशा सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.काँग्रेस राजवटीत रेशनवर मिळणारे धान्य या सरकारने बंद करून टाकले. महागाई तिपटीने वाढली आहे. घरबांधणी व दुरुस्तीच्या अधिकारात हस्तक्षेप झाल्याने आता परवानगीसाठी जाचक अटी ठेवण्यात आल्याने सर्वसामान्य जनतेची ससेहोलपट सुरु झाली आहे. एस. टी.सह रेल्वेप्रवास दरात झालेली वाढ, वाढविलेली भरमसाठ घरपट्टी, गौण खनिजाबाबत लादलेल्या जाचक अटी अशा विविध मुद्द्यांकडे केंद्र आणि राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राजापूर तालुका काँग्रेसने मोर्चाचे आयोजन केले आहे.या मोर्चात माजी खासदार नीलेश राणे, विधानपरिषद सदस्य अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे, जिल्हाध्यक्ष रमेश कीर, प्रदेश प्रवक्ते हरीश रोग्ये, ज्येष्ठ नेते राजन देसाई यांच्यासह पक्षाचे नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.सोमवारी सकाळी १० वाजता राजापूर शहरातील गणेश विसर्जन घाटापासून मोर्चा सुरू होऊन तहसील कार्यालयापर्यंत जाईल. विविध समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढणार असल्याची माहिती काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रवींद्र नागरेकर यांनी दिली. (प्रतिनिधी)आंदोलन : सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न...वाढती महागाई, सामान्यांच्या प्रश्नांबाबत शासनाने घेतलेले वादग्रस्त निर्णय, रेशनवरून गायब झालेले धान्य अशा विविध प्रश्नावर शासनाला कोंडीत पकडण्याचा काँग्रेसने आटोकाट प्रयत्न केला आहे. माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली विविध ठिकाणी अशी आंदोलने करण्यात येत आहेत. २६ जानेवारी रोजी रत्नागिरीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात आले होते.राष्ट्रवादीचं काय?केंद्रातील व राज्यातील सरकारच्या कारभाराविरोधात तालुका काँग्रेसने मोर्चाचे आयोजन केले असतानाच काँग्रेसचा तालुक्यात कधी - कधी मित्रपक्षाची भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने या मोर्चाबाबत आपली भूमिका जाहीर केलेली नाही.