शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

काँग्रेसचा शासनाविरोधी एल्गार

By admin | Updated: February 11, 2016 23:47 IST

राजापूर तालुका : केंद्र, शासनाच्या धोरणाचा करणार निषेध

राजापूर : केवळ आश्वासने देऊन केंद्रासह राज्यात सत्तेवर आलेली भाजपप्रणित शासन सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरली असल्याचा आरोप करीत शासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी दिनांक १५ फेब्रुवारीला राजापूर तालुका काँग्रेसच्यावतीने तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.दीड वर्षाहून अधिक काळ केंद्र व राज्यातील भाजपच्या सरकारने जनतेला ‘अच्छे दिन’ची स्वप्न दाखवली होती. पण, प्रत्यक्षात ही दोन्ही सरकारे सर्वच क्षेत्रात निष्प्रभ ठरली आहेत. त्याचा फटका गोरगरीब जनतेसह शेतकरी, कामगार यांच्यासह सर्वच क्षेत्राला बसला आहे. शासनाने सर्व जनतेची घोर फसवणूक केली आहे. अशा सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.काँग्रेस राजवटीत रेशनवर मिळणारे धान्य या सरकारने बंद करून टाकले. महागाई तिपटीने वाढली आहे. घरबांधणी व दुरुस्तीच्या अधिकारात हस्तक्षेप झाल्याने आता परवानगीसाठी जाचक अटी ठेवण्यात आल्याने सर्वसामान्य जनतेची ससेहोलपट सुरु झाली आहे. एस. टी.सह रेल्वेप्रवास दरात झालेली वाढ, वाढविलेली भरमसाठ घरपट्टी, गौण खनिजाबाबत लादलेल्या जाचक अटी अशा विविध मुद्द्यांकडे केंद्र आणि राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राजापूर तालुका काँग्रेसने मोर्चाचे आयोजन केले आहे.या मोर्चात माजी खासदार नीलेश राणे, विधानपरिषद सदस्य अ‍ॅड. हुस्नबानू खलिफे, जिल्हाध्यक्ष रमेश कीर, प्रदेश प्रवक्ते हरीश रोग्ये, ज्येष्ठ नेते राजन देसाई यांच्यासह पक्षाचे नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.सोमवारी सकाळी १० वाजता राजापूर शहरातील गणेश विसर्जन घाटापासून मोर्चा सुरू होऊन तहसील कार्यालयापर्यंत जाईल. विविध समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढणार असल्याची माहिती काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रवींद्र नागरेकर यांनी दिली. (प्रतिनिधी)आंदोलन : सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न...वाढती महागाई, सामान्यांच्या प्रश्नांबाबत शासनाने घेतलेले वादग्रस्त निर्णय, रेशनवरून गायब झालेले धान्य अशा विविध प्रश्नावर शासनाला कोंडीत पकडण्याचा काँग्रेसने आटोकाट प्रयत्न केला आहे. माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली विविध ठिकाणी अशी आंदोलने करण्यात येत आहेत. २६ जानेवारी रोजी रत्नागिरीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात आले होते.राष्ट्रवादीचं काय?केंद्रातील व राज्यातील सरकारच्या कारभाराविरोधात तालुका काँग्रेसने मोर्चाचे आयोजन केले असतानाच काँग्रेसचा तालुक्यात कधी - कधी मित्रपक्षाची भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने या मोर्चाबाबत आपली भूमिका जाहीर केलेली नाही.