शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

गडनदी धरणग्रस्तांचा मुलभूत समस्यांशी सामना

By admin | Updated: January 21, 2016 00:29 IST

कुचांबेवासीय त्रस्त : सूर्यकांत साळुंखे करणार बेमुदत उपोषण

देवरूख : कुचांबे येथे उभारण्यात येत असलेल्या गडनदी प्रकल्पासाठी प्रकल्पग्रस्तांनी सर्वतोपरी सहकार्य करूनही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. येथील धरणग्रस्तांना आजही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या सर्व समस्या तातडीने सोडवाव्यात अन्यथा १ फेब्रुुवारीपासून सूर्यकांत साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण पाटबंधारे विभागासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा राजीवली, कुटगिरी, रातांबी धरणग्रस्त ग्रामस्थ समितीने जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.मौजे कुचांबे येथे जलसंपदा विभागातर्फे गडनदी प्रकल्पाचे काम गेली ३० वर्षे सुरू आहे. आज धरणाचे काम १०० टक्के पूर्ण होत आले आहे तरीही प्रकल्पग्रस्तांची फरफट मात्र सुरूच आहे. शासन नियमानुसार आधी पुनर्वसन मग धरण, या उक्तीला हरताळ फासत पाटबंधारे विभागाने आपला मनमानी कारभार सुरू ठेवला आहे. याचा नाहक फटका प्रकल्पग्रस्तांना बसत आहे.याबाबत वारंवार प्रशासन आणि शासनाकडून पाठपुरावा सुरु आहे. मात्र त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने साळुंखे यांनी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.आगामी काळात धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासह परिसरातील सोयीसुविधांचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनामध्ये शिर्केवाडी पुनर्वसन रस्ता पूर्ण करावा, शिर्केवाडी, घाडगेवाडी गावठाणातील अपूर्ण सुविधा पूर्ण कराव्यात, राजीवली काळंबेवाडीतील सुविधांची पूर्तता व्हावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.या मागण्यांबरोबरच काळंबेवाडीतील घरांचा मोबदला अदा करण्यात यावा, ग्रामस्थांचे भुखंड सातबारे देण्यात यावेत, शिर्केवाडी पुनर्वसनात पिण्याच्या पाण्याची सोय करावी, शिर्केवाडीतील वीज जोडणीत बदल करून मिळावा, घाडगेवाडीतील निकृष्ठ कामे सुधारावी, कुटगिरी, कदमवाडी, निकमवाडी, बौध्दवाडी ग्रामस्थांना दिलेली आश्वासने पूर्ण करावीत, घाडगेवाडी रस्त्याचे नव्याने डांबरीकरण व्हावे, रस्त्याचे खोदकाम करून माती टाकून नुकसान झालेल्या शेतजमिनींचा मोबदला मिळावा, घाडगेवाडी पोच रस्त्याजवळ संरक्षक भिंंत बांधून मिळावी, स्वेच्छा पुनर्वसन धरणग्रस्तांचे शासकीय अनुदान त्वरित मिळावे, प्रकल्पग्रस्तांचा निर्वाह भत्ता मिळावा, धरणग्रस्तांना अंत्योदय रेशनकार्ड मिळावे, रिंगरोडचे काम पूर्ण करावे, राजीवली - येडगेवाडी - कावळटेक रस्ता तयार करावा, राजीवली काळंबेवाडीतील शाळेवर नियमानुसार स्लॅब टाकून मिळावा, भूमिहिन धरणग्रस्तांना जमिनी उपलब्ध करून देण्यात याव्यात या मागण्यांचा समावेश आहे.या मागण्या मान्य न झाल्यास १ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा या धरणग्रस्त ग्रामस्थ समितीने दिला आहे. (प्रतिनिधी)मागण्या मान्य करा...मागण्यांची पाटबंधारे व पुनर्वसन खाते यांनी पूर्तता करावी आणि त्यावर तातडीने कार्यवाही सुरू करावी. अन्यथा १ फेब्रुवारीपासुन सूर्यकांत साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली लघु पाटबंधारे विभाग, चिपळूणच्या आवारातच बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.नागरी सुविधांचा अभावया क्षेत्रातील राजीवली, रातांबी, पाचांबे, कुटगिरी आदी गावातील धरणग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र, आजही त्या ठिकाणी नागरी सुविधांचा अभाव आहे. याकडे जाणुनबुजून दुर्लक्ष केले जात आहे. वारंवार आंदोलने, उपोषण, मोर्चे काढूनही याकडे लक्ष दिले जात नाही.