शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

संघर्ष अखेर चव्हाट्यावर

By admin | Updated: April 1, 2015 00:10 IST

लॅपटॉप चोरीप्रकरण : कृषी अधिकाऱ्यांची संशयास्पद भूमिका

राजापूर : तालुका कृषी कार्यालयातील लॅपटॉप पळवापळवीच्या घटनेनंतर त्याबाबतची वृत्ते प्रसिद्ध होताच कृषी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्यातील खदखदणारा संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. याप्रकरणी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी संशयास्पद भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दुसरीकडे कर्मचाऱ्यांना त्रास देणाऱ्या कथित प्रभारी मंडल अधिकाऱ्याची अन्यत्र बदली करा, अशी मागणी कर्मचाऱ्यांतूनच दबक्या आवाजात सुरु झाली आहे.येथील कृषी कार्यालयातील कामकाजाचा लॅपटॉप पळविण्यात आल्याची घटना घडताच खळबळ उडाली होती. कार्यालयातील अंतर्गत कामकाजाचा कानोसा घेता एकमेकांचा हिशोब चुकता करण्याचेच काम त्यामधून झाल्याचे पुढे आले आहे. त्याला संबंधित कृषी मंडल अधिकारीच जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. लॅपटॉप चोरीप्रकरणानंतर आता कृषी विभागातील अनेक कारनामे पुढे येऊ लागले आहेत.यापूर्वी पाचल विभागात काम करताना याच मंडल अधिकाऱ्याने तेथील कर्मचाऱ्यांना त्रास दिला होता. त्यामुळे त्याची राजापूरला बदली केली गेली. तथापी राजापुरातदेखील त्याने तेथे कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना उपद्रव द्यायला सुरुवात केली. त्यातूनच लॅपटॉप पळवापळवीचे प्रकरण घडल्याचे बोलले जात आहे. मात्र, या प्रकरणाची माहिती असतानादेखील तालुका कृषी अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी झटकत नरोवा वा कुंजरोवा अशीच भूमिका घेतली असल्याचे निष्पन्न झाले आहे.हे प्रकरण आता चांगलेच तापणार, याची कुणकुण लागताच तालुका कृषी अधिकाऱ्यांनी याबाबतचा अहवाल जिल्हा कार्यालयाकडे तत्काळ पाठवण्याबाबतचा निर्णय घेतला आहे, तर आपल्याला नाहक मनस्ताप दिला जात असून, त्याबाबत कोणतीच कारवाई होत नसल्याने तालुका कृषी सहाय्यकाने आता कायदेशीर कारवाईचा मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला असल्याचे कळते.तालुका कृषी कार्यालयातील लॅपटॉप पळवापळवी प्रकरणातून संबंधित कृषी कार्यालयातील अंतर्गत संघर्ष उग्र रुप धारण करण्याच्या मार्गावर असून, या मंथनातून अनेक प्रकरणे आता बाहेर पडण्याची लक्षणे दिसू लागली आहेत. (प्रतिनिधी)