शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

संघर्ष अखेर चव्हाट्यावर

By admin | Updated: April 1, 2015 00:10 IST

लॅपटॉप चोरीप्रकरण : कृषी अधिकाऱ्यांची संशयास्पद भूमिका

राजापूर : तालुका कृषी कार्यालयातील लॅपटॉप पळवापळवीच्या घटनेनंतर त्याबाबतची वृत्ते प्रसिद्ध होताच कृषी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्यातील खदखदणारा संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. याप्रकरणी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी संशयास्पद भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दुसरीकडे कर्मचाऱ्यांना त्रास देणाऱ्या कथित प्रभारी मंडल अधिकाऱ्याची अन्यत्र बदली करा, अशी मागणी कर्मचाऱ्यांतूनच दबक्या आवाजात सुरु झाली आहे.येथील कृषी कार्यालयातील कामकाजाचा लॅपटॉप पळविण्यात आल्याची घटना घडताच खळबळ उडाली होती. कार्यालयातील अंतर्गत कामकाजाचा कानोसा घेता एकमेकांचा हिशोब चुकता करण्याचेच काम त्यामधून झाल्याचे पुढे आले आहे. त्याला संबंधित कृषी मंडल अधिकारीच जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. लॅपटॉप चोरीप्रकरणानंतर आता कृषी विभागातील अनेक कारनामे पुढे येऊ लागले आहेत.यापूर्वी पाचल विभागात काम करताना याच मंडल अधिकाऱ्याने तेथील कर्मचाऱ्यांना त्रास दिला होता. त्यामुळे त्याची राजापूरला बदली केली गेली. तथापी राजापुरातदेखील त्याने तेथे कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना उपद्रव द्यायला सुरुवात केली. त्यातूनच लॅपटॉप पळवापळवीचे प्रकरण घडल्याचे बोलले जात आहे. मात्र, या प्रकरणाची माहिती असतानादेखील तालुका कृषी अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी झटकत नरोवा वा कुंजरोवा अशीच भूमिका घेतली असल्याचे निष्पन्न झाले आहे.हे प्रकरण आता चांगलेच तापणार, याची कुणकुण लागताच तालुका कृषी अधिकाऱ्यांनी याबाबतचा अहवाल जिल्हा कार्यालयाकडे तत्काळ पाठवण्याबाबतचा निर्णय घेतला आहे, तर आपल्याला नाहक मनस्ताप दिला जात असून, त्याबाबत कोणतीच कारवाई होत नसल्याने तालुका कृषी सहाय्यकाने आता कायदेशीर कारवाईचा मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला असल्याचे कळते.तालुका कृषी कार्यालयातील लॅपटॉप पळवापळवी प्रकरणातून संबंधित कृषी कार्यालयातील अंतर्गत संघर्ष उग्र रुप धारण करण्याच्या मार्गावर असून, या मंथनातून अनेक प्रकरणे आता बाहेर पडण्याची लक्षणे दिसू लागली आहेत. (प्रतिनिधी)