शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

काँग्रेस, शिवसेना-भाजपचे संमिश्र यश

By admin | Updated: April 24, 2015 01:31 IST

ग्रामपंचायत निकाल जाहीर : काँग्रेस २७, शिवसेना १७, भाजप १२, ग्रामविकास आघाडी १0

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक पोटनिवडणुकीत काँग्रेसने २७, शिवसेनेने १७, भारतीय जनता पक्षाने १२ तर ग्रामविकास आघाडीने १0 जागा जिंकल्या. ६६ सार्वत्रिक ग्रामपंचायत आणि ८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी गुरुवारी मतमोजणी झाली. या निवडणुकांसाठी एकूण ९४४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या निवडणुकीत ९५,१५८ तर पोटनिवडणुकांसाठी ३0२१ असे एकूण ९८,१७९ मतदारांपैकी ६६,९८२ मतदारांनी हक्क बजावला होता. देवगड तालुक्यातील २३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कोर्ले, वरेरी या दोन ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध झाल्या असून उर्वरीत २१ ग्रामपंचायतींचा जाहीर झालेल्या निकालामध्ये ९ ग्रामपंचायती भाजपाकडे व ९ ग्रामपंचायतींवर काँग्रेस तसेच ३ ग्रामपंचायतींवर ग्रामविकास आघाडीने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. राष्ट्रवादी व शिवसेनेने कोणत्याही ग्रामपंचायतीवर स्वतंत्र अस्तित्व राखले नाही. कणकवली तालुक्यातील भिरवंडे, गांधीनगर आणि तोंडवली- बावशी या तीन ग्रामपंचायतीमध्ये भिरवंडे आणि तोंडवली- बावशी या ग्रामपंचायतीवर काँग्रेसने विजय मिळविला तर गांधीनगर ग्रामपंचायत शिवसेनेने जिंकली. मालवण तालुक्यात झालेल्या सार्वत्रिक ७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत काँग्रेसने पाच ठिकाणी आपले गड शाबूत ठेवले असतानाच चिंदर आणि मसदे या दोन ग्रामपंचायती काँग्रेसकडून हिसकावून घेत शिवसेनेने आपला भगवा फडकविला आहे. या निवडणुकीत भाजपचा चंचूप्रवेश झाला असून काँग्रेसने जिंकलेल्या ग्रामपंचायतीमध्ये मसुरे- डांगमोडे, कुणकावळे, गोळवण, कुमामे, आडवली, मालडी, पेंडूर- खरारे यांचा समावेश आहे. वैभववाडी तालुक्यातील ११ पैकी ६ ग्रामपंचायतींवर ग्रामविकास आघाड्यांनी वर्चस्व मिळविले आहे तर सोनाळी आणि आचिर्णे ग्रामपंचायतीवरील सत्ता काँग्रेसने कायम राखली आहे. वेंगसर, मांगवली आणि एडगाव या तीन ग्रामपंचायतींमध्ये भाजपाची सत्ता आली आहे. दरम्यान, ११ पैकी ६ ग्रामपंचायतींवर काँग्रेसने दावा केला आहे. सावंतवाडी तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतींपैकी सात ग्रामपंचायतींवर शिवसेनेने झेंडा फडकवत जोरदार मुसंडी मारली आहे. तर काँग्रेसने चार ग्रामपंचायतींवर विजय प्राप्त केला. या निवडणुकीत प्रस्थापितांना चांगलाच धक्का मिळाला आहे. मतमोजणीनंतर सर्वत्र विजयी मिरवणुका काढण्यात आल्या. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वेंगुर्ले तालुक्यातील आरवली व सागरतीर्थ या ग्रामपंचायतींच्या बुधवारी झालेल्या निवडणुकीत आरवली ग्रामपंचायतीवर शिवसेना पुरस्कृत आरवली विकास पॅनेलने सत्ता प्रस्थापित केली. तर सागरतीर्थ ग्रामपंचायतीवर काँगे्रस-राष्ट्रवादीच्या आघाडीने आठ जागा जिंकल्या असून शिवसेनेने फक्त एकच जागा जिंकली आहे. दोडामार्ग तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काँगे्रसने कुडासे गावात आपले वर्चस्व प्रस्थापित केले. तर तेरवण मेढे येथे ग्रामविकास पॅनेलने बाजी मारले. कुडाळ तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींपैकी सहा ग्रामपंचायतींवर शिवसेनेने भगवा फडकावला. काँगे्रसला तीन ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्यात यश आले. काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष प्रकाश मोर्ये, भाजपा तालुकाध्यक्ष बब्रुवान भगत व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दादा बेळणेकर यांचे पानिपत झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भुईसपाट झाला आहे. (ठिकठिकाणच्या प्रतिनिधींकडून)