शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

काँग्रेस, शिवसेना-भाजपचे संमिश्र यश

By admin | Updated: April 24, 2015 01:31 IST

ग्रामपंचायत निकाल जाहीर : काँग्रेस २७, शिवसेना १७, भाजप १२, ग्रामविकास आघाडी १0

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक पोटनिवडणुकीत काँग्रेसने २७, शिवसेनेने १७, भारतीय जनता पक्षाने १२ तर ग्रामविकास आघाडीने १0 जागा जिंकल्या. ६६ सार्वत्रिक ग्रामपंचायत आणि ८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी गुरुवारी मतमोजणी झाली. या निवडणुकांसाठी एकूण ९४४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या निवडणुकीत ९५,१५८ तर पोटनिवडणुकांसाठी ३0२१ असे एकूण ९८,१७९ मतदारांपैकी ६६,९८२ मतदारांनी हक्क बजावला होता. देवगड तालुक्यातील २३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कोर्ले, वरेरी या दोन ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध झाल्या असून उर्वरीत २१ ग्रामपंचायतींचा जाहीर झालेल्या निकालामध्ये ९ ग्रामपंचायती भाजपाकडे व ९ ग्रामपंचायतींवर काँग्रेस तसेच ३ ग्रामपंचायतींवर ग्रामविकास आघाडीने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. राष्ट्रवादी व शिवसेनेने कोणत्याही ग्रामपंचायतीवर स्वतंत्र अस्तित्व राखले नाही. कणकवली तालुक्यातील भिरवंडे, गांधीनगर आणि तोंडवली- बावशी या तीन ग्रामपंचायतीमध्ये भिरवंडे आणि तोंडवली- बावशी या ग्रामपंचायतीवर काँग्रेसने विजय मिळविला तर गांधीनगर ग्रामपंचायत शिवसेनेने जिंकली. मालवण तालुक्यात झालेल्या सार्वत्रिक ७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत काँग्रेसने पाच ठिकाणी आपले गड शाबूत ठेवले असतानाच चिंदर आणि मसदे या दोन ग्रामपंचायती काँग्रेसकडून हिसकावून घेत शिवसेनेने आपला भगवा फडकविला आहे. या निवडणुकीत भाजपचा चंचूप्रवेश झाला असून काँग्रेसने जिंकलेल्या ग्रामपंचायतीमध्ये मसुरे- डांगमोडे, कुणकावळे, गोळवण, कुमामे, आडवली, मालडी, पेंडूर- खरारे यांचा समावेश आहे. वैभववाडी तालुक्यातील ११ पैकी ६ ग्रामपंचायतींवर ग्रामविकास आघाड्यांनी वर्चस्व मिळविले आहे तर सोनाळी आणि आचिर्णे ग्रामपंचायतीवरील सत्ता काँग्रेसने कायम राखली आहे. वेंगसर, मांगवली आणि एडगाव या तीन ग्रामपंचायतींमध्ये भाजपाची सत्ता आली आहे. दरम्यान, ११ पैकी ६ ग्रामपंचायतींवर काँग्रेसने दावा केला आहे. सावंतवाडी तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतींपैकी सात ग्रामपंचायतींवर शिवसेनेने झेंडा फडकवत जोरदार मुसंडी मारली आहे. तर काँग्रेसने चार ग्रामपंचायतींवर विजय प्राप्त केला. या निवडणुकीत प्रस्थापितांना चांगलाच धक्का मिळाला आहे. मतमोजणीनंतर सर्वत्र विजयी मिरवणुका काढण्यात आल्या. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वेंगुर्ले तालुक्यातील आरवली व सागरतीर्थ या ग्रामपंचायतींच्या बुधवारी झालेल्या निवडणुकीत आरवली ग्रामपंचायतीवर शिवसेना पुरस्कृत आरवली विकास पॅनेलने सत्ता प्रस्थापित केली. तर सागरतीर्थ ग्रामपंचायतीवर काँगे्रस-राष्ट्रवादीच्या आघाडीने आठ जागा जिंकल्या असून शिवसेनेने फक्त एकच जागा जिंकली आहे. दोडामार्ग तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काँगे्रसने कुडासे गावात आपले वर्चस्व प्रस्थापित केले. तर तेरवण मेढे येथे ग्रामविकास पॅनेलने बाजी मारले. कुडाळ तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींपैकी सहा ग्रामपंचायतींवर शिवसेनेने भगवा फडकावला. काँगे्रसला तीन ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्यात यश आले. काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष प्रकाश मोर्ये, भाजपा तालुकाध्यक्ष बब्रुवान भगत व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दादा बेळणेकर यांचे पानिपत झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भुईसपाट झाला आहे. (ठिकठिकाणच्या प्रतिनिधींकडून)