शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

आरोसबाग पुलाचे काम लवकरच पूर्ण

By admin | Updated: January 24, 2016 00:39 IST

चंद्रकांत पाटील : बांदा येथे लोकोत्सव २0१६ चे उद्घाटन

बांदा : शहरातील सुविधा गावात निर्माण झाल्यास गावातील तरुण शहराकडे जाणार नाही. त्याच धर्तीवर बांदा शहराचा विकास करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. गेली कित्येक वर्षांची मागणी असलेला आरोसबाग येथील पुलाला नाबार्डमधून निधी मंजूर केल्याने या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करुन त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याचा मानस आहे. तसेच शहरातील प्रस्तावित क्रीडा संकुल व सुसज्ज विश्रामगृहाच्या इमारतीचे काम देखिल लवकरच सुरु करण्याचे आश्वासन राज्याचे सार्वजनिक बांधकाम, सहकार, पणन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बांदा येथे दिले. भारतीय जनता पार्टीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकोत्सव २0१६’ च्या उद्घाटन समारंभात मंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी आमदार राजन तेली, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, राजन म्हापसेकर, काका कुडाळकर, तालुकाध्यक्ष मनोज नाईक, श्वेता कोरगावकर, सरपंच मंदार कल्याणकर, उपसरपंच बाळा आकेरकर, शितल राउळ, प्रियांका नाईक, अशोक सावंत, सनी काणेकर, श्यामकांत काणेकर, लोकोत्सव समितीचे अध्यक्ष सुधीर शिरसाट, उमेश फातरफोड आदि मान्यवर उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक मंदार कल्याणकर यांनी केले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी लोकोत्सव समितीच्यावतीने मंत्री पाटील यांचा व राष्ट्रीय पातळीवर वक्तृत्व स्पर्धेतील यश मिळविलेल्या चैतन्या सावंत व दुर्गाराम जोशी या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मंत्री पाटील म्हणाले की, सरकारच्या अच्छेदिनची टिंगल करण्यात येते. मात्र, काँग्रेस शासनाने १५ वर्षात राज्यावर ३ लाख ५ हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा ठेवला असून राज्याला महिन्याला यासाठी २३ हजार कोटी रुपयांचे व्याज भरावे लागते. त्यामुळे अच्छे दिन येण्यासाठी सरकारला वेळ द्या. जनतेला निश्चितच अच्छे दिन येतील. जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार म्हणाले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी ५ हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे. यामुळे कोकणसाठी अच्छे दिन येणार आहेत. मोपा विमानतळामुळे बांद्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. यावेळी अतुल काळसेकर, रविंद्र चव्हाण यांनी आपले विचार मांडले. सूत्रसंचालन अक्षय वाटवे यांनी केले. आभार बाळा आकेरकर यांनी मानले. (प्रतिनिधी)