शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

राजापुरात ६९ ठिकाणचे पंचनामे पूर्ण

By admin | Updated: April 30, 2015 00:30 IST

अवकाळी पाऊस : आतापर्यंत साडेचार लाखांच्या नुकसानीची नोंद

राजापूर : दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील ६० ते ७० गावांना जबरदस्त तडाखा देणाऱ्या चक्रीवादळातील नुकसानाची पाहणी करत त्याचे पंचनामे करण्याचे काम प्रशासकीय पातळीवर जोरात सुरू असून बुधवारी दुपारपर्यंत एकूण ६९ ठिकाणचे रितसर पंचनामे झाले होते. त्या ठिकाणी झालेल्या नुकसानाची आकडेवारी ही ४ लाख ६६ हजार ७०२ एवढी होती. आणखी शंभरहून अधिक ठिकाणच्या पंचनाम्याची आकडेवारी तहसील कार्यालयाकडे प्राप्त झाली नव्हती.सोमवारी सायंकाळी उशिरा तालुक्यातील पाचल, कोंड्ये, सौंदळ, हसोळतर्फे सौंळ या तलाठी सजातील अनेक गावांना तुफानी चक्रीवादळाचा व मुसळधार पावसाचा तडाखा बसला होता. या वादळात अनेक ठिकाणी घरांची, गोठ्यांची कौले व पत्रे उडून तर अनेक ठिकाणी घरांवर लगतची झाडे कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.अचानक आलेल्या या वादळाने तालुुक्याला चांगलाच हादरा दिला असून दुर्घटनाग्रस्त गावातील पडझडीतून तेथील ग्रामस्थ अद्याप सावरलेले नाहीत. मात्र, त्या घटनेनंतर देखील ढगाळ वातावरण कायम राहिल्याने अधिक नुकसान होऊ नये म्हणून वेळीच खबरदारी घेताना अनेकांनी आपापली उडालेली छप्परे पुन्हा शाकारायला सुरुवात केली. बुधवारी दिवसभर तेच काम कायम सुरु होते.तालुक्यातील केळवली, मोरोशी, ससाळे, गोठणे दोनिवडे भागात झालेल्या नुकसानाचे ६१ पंचनामे करण्यात आले असून एकूण ४ लाख ६६ हजार ७०२ एवढे नुकसान झाल्याचा अहवाल तयार झाला आहे. उर्वरित नुकसानग्रस्त गावातील पंचनाम्यांची आकडेवारी अद्याप तहसील कार्यालयापर्यंत पोहोचलेली नसून आणखी किमान १०० च्या आसपास पंचनाम्यांची आकडेवारी अपेक्षित आहे.दरम्यान तहसीलदार गुरुनाथ हुन्नरे हे स्वत: जातीनिशी लक्ष ठेवून असून त्यांनी वेळोवेळी प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या आहेत. आगामी एक दोन दिवसात संपूर्ण तालुक्यातील झालेल्या नुकसानाचे पंचनामे व त्याची आकडेवारी तहसील कार्यालयाकडे प्राप्त होणार आहे.मागील अनेक वर्षात राजापूर तालुक्याला असा वादळाचा फटका कधी बसला नव्हता. पंधरा दिवसापूर्वी रायपाटण या गावाला वादळाने झोडपून काढले होते. (प्रतिनिधी)ग्रामस्थ संतप्तकेळवली या गावात शासकीय यंत्रणा उशिराने दाखल झाल्याने तेथील संतापलेल्या काही ग्रामस्थांनी महसूल विभागाचे मंडळ अधिकारी व तलाठी यांना पंचनामा करण्यापासून रोखले. त्यामुळे चांगलाच पेचप्रसंग उद्भवला. अखेर तहसीलदार गुरूनाथ हुन्नरे हे पोलीस संरक्षण घेऊन केळवली गावात हजर झाले. त्यानंतर स्वत: तहसीलदार हुन्नरे यांनी समस्त ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करत त्यांची समजूत काढली व नंतर राहिलेले पंचनामे महसूलच्या अधिकाऱ्यांनी पूर्ण केले.