शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

राजापुरात ६९ ठिकाणचे पंचनामे पूर्ण

By admin | Updated: April 30, 2015 00:30 IST

अवकाळी पाऊस : आतापर्यंत साडेचार लाखांच्या नुकसानीची नोंद

राजापूर : दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील ६० ते ७० गावांना जबरदस्त तडाखा देणाऱ्या चक्रीवादळातील नुकसानाची पाहणी करत त्याचे पंचनामे करण्याचे काम प्रशासकीय पातळीवर जोरात सुरू असून बुधवारी दुपारपर्यंत एकूण ६९ ठिकाणचे रितसर पंचनामे झाले होते. त्या ठिकाणी झालेल्या नुकसानाची आकडेवारी ही ४ लाख ६६ हजार ७०२ एवढी होती. आणखी शंभरहून अधिक ठिकाणच्या पंचनाम्याची आकडेवारी तहसील कार्यालयाकडे प्राप्त झाली नव्हती.सोमवारी सायंकाळी उशिरा तालुक्यातील पाचल, कोंड्ये, सौंदळ, हसोळतर्फे सौंळ या तलाठी सजातील अनेक गावांना तुफानी चक्रीवादळाचा व मुसळधार पावसाचा तडाखा बसला होता. या वादळात अनेक ठिकाणी घरांची, गोठ्यांची कौले व पत्रे उडून तर अनेक ठिकाणी घरांवर लगतची झाडे कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.अचानक आलेल्या या वादळाने तालुुक्याला चांगलाच हादरा दिला असून दुर्घटनाग्रस्त गावातील पडझडीतून तेथील ग्रामस्थ अद्याप सावरलेले नाहीत. मात्र, त्या घटनेनंतर देखील ढगाळ वातावरण कायम राहिल्याने अधिक नुकसान होऊ नये म्हणून वेळीच खबरदारी घेताना अनेकांनी आपापली उडालेली छप्परे पुन्हा शाकारायला सुरुवात केली. बुधवारी दिवसभर तेच काम कायम सुरु होते.तालुक्यातील केळवली, मोरोशी, ससाळे, गोठणे दोनिवडे भागात झालेल्या नुकसानाचे ६१ पंचनामे करण्यात आले असून एकूण ४ लाख ६६ हजार ७०२ एवढे नुकसान झाल्याचा अहवाल तयार झाला आहे. उर्वरित नुकसानग्रस्त गावातील पंचनाम्यांची आकडेवारी अद्याप तहसील कार्यालयापर्यंत पोहोचलेली नसून आणखी किमान १०० च्या आसपास पंचनाम्यांची आकडेवारी अपेक्षित आहे.दरम्यान तहसीलदार गुरुनाथ हुन्नरे हे स्वत: जातीनिशी लक्ष ठेवून असून त्यांनी वेळोवेळी प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या आहेत. आगामी एक दोन दिवसात संपूर्ण तालुक्यातील झालेल्या नुकसानाचे पंचनामे व त्याची आकडेवारी तहसील कार्यालयाकडे प्राप्त होणार आहे.मागील अनेक वर्षात राजापूर तालुक्याला असा वादळाचा फटका कधी बसला नव्हता. पंधरा दिवसापूर्वी रायपाटण या गावाला वादळाने झोडपून काढले होते. (प्रतिनिधी)ग्रामस्थ संतप्तकेळवली या गावात शासकीय यंत्रणा उशिराने दाखल झाल्याने तेथील संतापलेल्या काही ग्रामस्थांनी महसूल विभागाचे मंडळ अधिकारी व तलाठी यांना पंचनामा करण्यापासून रोखले. त्यामुळे चांगलाच पेचप्रसंग उद्भवला. अखेर तहसीलदार गुरूनाथ हुन्नरे हे पोलीस संरक्षण घेऊन केळवली गावात हजर झाले. त्यानंतर स्वत: तहसीलदार हुन्नरे यांनी समस्त ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करत त्यांची समजूत काढली व नंतर राहिलेले पंचनामे महसूलच्या अधिकाऱ्यांनी पूर्ण केले.