शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिमेची आंब्याशी स्पर्धा

By admin | Updated: December 19, 2014 00:24 IST

फेरफटका...

कोकणात सध्या आंबा आणि पाण्याचा विषय गाजतो आहे. रत्नागिरी हापूसची अवीट गोडी व त्याला प्रथमच पश्चिम महाराष्ट्रातून झालेली स्पर्धा हा कुतुहलाचा विषय ठरला आहे. दरवर्षी रत्नागिरीतून हापूसची स्वारी परदेशात जाते. यंदाही ही स्वारी रवाना होणार असली तरी यामध्ये आपली ओळख व्हावी, यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून प्रथमच स्पर्धा झाली. जुन्नरमधून हापूस तयार करुन त्याची चार डझनाची पेटी मुंबईमध्ये गेली. देवगड, रत्नागिरी या हापूसचा स्वाद जगाने प्रेम करावा असा आहे. मात्र, या व्यवसायात सध्या अघोरी स्पर्धा सुरू आहे.आंब्याच्या उलाढालीत कोकणच्या शेतकऱ्याचे अर्थकारण गुंतलेले असते. चार महिने या क्षेत्रात बागायतदार व्यावसायिकदृष्ट्या उतरलेले असतात, तर संपूर्ण वर्षभर बागायतीवर अवलंबून असलेले ग्रामीण भागातील छोटे-मोठे शेतकरी आपली वर्षाची निकड यातून काढण्याचा प्रयत्न करत असतात. कोकणात आंब्याचे उत्पादन हे देशभरातील इतर कोणत्याही राज्यांपेक्षा जास्त असते. त्यामुळेच जगभरातून पर्यटक अथवा कोणताही परदेशी पाहुणा आला की, तो आंब्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहात नाही. सध्या या पिकामध्ये तंत्रज्ञानाची भर पडली आहे. कल्टारचा वापरही अधिक प्रमाणावर केला जातो. आंब्याची वाढ व आंब्याचे पीक या दोन्ही गोष्टी संबंधित बागायतदार शेतकरी जीवापाड जपत असतो. यातच अनेक बँकांचे सहकार्य या विषयाला घेतल्यामुळे त्याचा परतावा वेळेत कसा देता येईल, याचा विचारही महत्त्वाचा मानला गेला आहे. या पार्श्वभूमीवर कोकणच्या हापूसची लोकप्रियता पश्चिमेकडील काही बागायतदारांना कदाचित सलत असावी, या हेतूनेच जगाच्या कोपऱ्यात आपलेही स्वतंत्र ब्रॅण्डिंग व्हावे, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पश्चिम महाराष्ट्रात उसाचे पीक अधिक असते. आता तेथील शेतकरी कृषी विद्यापीठाच्या मदतीने आंब्याचे प्रयोग करु लागला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात विजय मेहता कुलगुरु असताना या भागातील नारळ व आंबा शिरोळच्या रत्नाप्पा अण्णा कुंभार यांनी कारखाना परिसरात कसा लावला होता, याचे वर्णन करत व पश्चिम महाराष्ट्रात कोकणकडे शेतीतील उत्पादन देणाऱ्या स्वतंत्र जातीबाबत कसा आपुलकीने पाहात असे, या गोष्टी सांगत असत. याच्यामध्ये स्पर्धा जरुर होती. मात्र, त्यामध्ये आपला भाग कोकणच्या पुढे जावा व या क्षेत्रात दबाव गट निर्माण करावा, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली नव्हती. दुर्दैवाने गेल्या आठवड्यात माध्यमांमधील बातम्या वाचल्यानंतर जुन्नर असो अथवा सातारा-सांगलीकडील गाव असो या भागात हापूसची आपली अशी स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरु केला आहे. इतकेच नव्हे; तर मुंबईत खपला जाणारा आंबा अथवा विक्रीसाठी ठेवला जाणारा आंबा हा रत्नागिरी हापूस म्हणून विकला जातो. तो आता आपल्या भागाचा आंबा म्हणून समोर यावा, अशी काहींची इच्छा आहे. कोकणात रत्नागिरी, देवगड या दोन भागांनी कित्येक वर्षे हापूसचा स्वाद जगाला दिला आहे. कोणी कितीही प्रयत्न केले तरी या मातीचा गुण आंब्यामध्ये चवीच्या रुपाने येतो आहे. तंत्र विकसित झाले असले तरी बाहेरुन येणारा पाहुणा हा रत्नागिरी हापूसची ओळख विसरु शकत नाही. आंब्यामधील रेषांचा अभ्यास हा अनेकवेळा त्याची ओळख स्पष्ट करतो. कोकणातील आंब्यावर निसर्गाची अवकृपा झाली तरी येथील शेतकरी आपला स्वाभिमान गहाण ठेवत नाही. किंबहुना एखाद्या वर्षी पिकाने दगा दिला असला तरी त्याचे दु:ख पचवत तो पुढील वर्षी नव्या दमाने उभा राहातो व शेती-बागायतीतील आपली ओळख स्वतंत्रच ठेवत असतो. हापूसमध्ये अनेक जाती विकसित करण्याचा प्रयत्न संशोधक करत आहेत. कृषी तंत्रज्ञान या भागातील जमिनीचा कस व त्यावर पिकामध्ये येणारे गुण-दोष शोधून काढले आहेत. गेल्या १५ वर्षांत या भागात हापूसची निर्यातही मोठ्या प्रमाणावर होत असली तरी दलालीचा शाप जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आव्हाने कायम राहतील. शेतकरी, बागायतदारांना आंबा शिकवतो, सुचवतो व जगायला प्रेरणा देतो.- धनंजय काळे--