शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिमेची आंब्याशी स्पर्धा

By admin | Updated: December 19, 2014 00:24 IST

फेरफटका...

कोकणात सध्या आंबा आणि पाण्याचा विषय गाजतो आहे. रत्नागिरी हापूसची अवीट गोडी व त्याला प्रथमच पश्चिम महाराष्ट्रातून झालेली स्पर्धा हा कुतुहलाचा विषय ठरला आहे. दरवर्षी रत्नागिरीतून हापूसची स्वारी परदेशात जाते. यंदाही ही स्वारी रवाना होणार असली तरी यामध्ये आपली ओळख व्हावी, यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून प्रथमच स्पर्धा झाली. जुन्नरमधून हापूस तयार करुन त्याची चार डझनाची पेटी मुंबईमध्ये गेली. देवगड, रत्नागिरी या हापूसचा स्वाद जगाने प्रेम करावा असा आहे. मात्र, या व्यवसायात सध्या अघोरी स्पर्धा सुरू आहे.आंब्याच्या उलाढालीत कोकणच्या शेतकऱ्याचे अर्थकारण गुंतलेले असते. चार महिने या क्षेत्रात बागायतदार व्यावसायिकदृष्ट्या उतरलेले असतात, तर संपूर्ण वर्षभर बागायतीवर अवलंबून असलेले ग्रामीण भागातील छोटे-मोठे शेतकरी आपली वर्षाची निकड यातून काढण्याचा प्रयत्न करत असतात. कोकणात आंब्याचे उत्पादन हे देशभरातील इतर कोणत्याही राज्यांपेक्षा जास्त असते. त्यामुळेच जगभरातून पर्यटक अथवा कोणताही परदेशी पाहुणा आला की, तो आंब्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहात नाही. सध्या या पिकामध्ये तंत्रज्ञानाची भर पडली आहे. कल्टारचा वापरही अधिक प्रमाणावर केला जातो. आंब्याची वाढ व आंब्याचे पीक या दोन्ही गोष्टी संबंधित बागायतदार शेतकरी जीवापाड जपत असतो. यातच अनेक बँकांचे सहकार्य या विषयाला घेतल्यामुळे त्याचा परतावा वेळेत कसा देता येईल, याचा विचारही महत्त्वाचा मानला गेला आहे. या पार्श्वभूमीवर कोकणच्या हापूसची लोकप्रियता पश्चिमेकडील काही बागायतदारांना कदाचित सलत असावी, या हेतूनेच जगाच्या कोपऱ्यात आपलेही स्वतंत्र ब्रॅण्डिंग व्हावे, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पश्चिम महाराष्ट्रात उसाचे पीक अधिक असते. आता तेथील शेतकरी कृषी विद्यापीठाच्या मदतीने आंब्याचे प्रयोग करु लागला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात विजय मेहता कुलगुरु असताना या भागातील नारळ व आंबा शिरोळच्या रत्नाप्पा अण्णा कुंभार यांनी कारखाना परिसरात कसा लावला होता, याचे वर्णन करत व पश्चिम महाराष्ट्रात कोकणकडे शेतीतील उत्पादन देणाऱ्या स्वतंत्र जातीबाबत कसा आपुलकीने पाहात असे, या गोष्टी सांगत असत. याच्यामध्ये स्पर्धा जरुर होती. मात्र, त्यामध्ये आपला भाग कोकणच्या पुढे जावा व या क्षेत्रात दबाव गट निर्माण करावा, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली नव्हती. दुर्दैवाने गेल्या आठवड्यात माध्यमांमधील बातम्या वाचल्यानंतर जुन्नर असो अथवा सातारा-सांगलीकडील गाव असो या भागात हापूसची आपली अशी स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरु केला आहे. इतकेच नव्हे; तर मुंबईत खपला जाणारा आंबा अथवा विक्रीसाठी ठेवला जाणारा आंबा हा रत्नागिरी हापूस म्हणून विकला जातो. तो आता आपल्या भागाचा आंबा म्हणून समोर यावा, अशी काहींची इच्छा आहे. कोकणात रत्नागिरी, देवगड या दोन भागांनी कित्येक वर्षे हापूसचा स्वाद जगाला दिला आहे. कोणी कितीही प्रयत्न केले तरी या मातीचा गुण आंब्यामध्ये चवीच्या रुपाने येतो आहे. तंत्र विकसित झाले असले तरी बाहेरुन येणारा पाहुणा हा रत्नागिरी हापूसची ओळख विसरु शकत नाही. आंब्यामधील रेषांचा अभ्यास हा अनेकवेळा त्याची ओळख स्पष्ट करतो. कोकणातील आंब्यावर निसर्गाची अवकृपा झाली तरी येथील शेतकरी आपला स्वाभिमान गहाण ठेवत नाही. किंबहुना एखाद्या वर्षी पिकाने दगा दिला असला तरी त्याचे दु:ख पचवत तो पुढील वर्षी नव्या दमाने उभा राहातो व शेती-बागायतीतील आपली ओळख स्वतंत्रच ठेवत असतो. हापूसमध्ये अनेक जाती विकसित करण्याचा प्रयत्न संशोधक करत आहेत. कृषी तंत्रज्ञान या भागातील जमिनीचा कस व त्यावर पिकामध्ये येणारे गुण-दोष शोधून काढले आहेत. गेल्या १५ वर्षांत या भागात हापूसची निर्यातही मोठ्या प्रमाणावर होत असली तरी दलालीचा शाप जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आव्हाने कायम राहतील. शेतकरी, बागायतदारांना आंबा शिकवतो, सुचवतो व जगायला प्रेरणा देतो.- धनंजय काळे--