शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

पश्चिमेची आंब्याशी स्पर्धा

By admin | Updated: December 19, 2014 00:24 IST

फेरफटका...

कोकणात सध्या आंबा आणि पाण्याचा विषय गाजतो आहे. रत्नागिरी हापूसची अवीट गोडी व त्याला प्रथमच पश्चिम महाराष्ट्रातून झालेली स्पर्धा हा कुतुहलाचा विषय ठरला आहे. दरवर्षी रत्नागिरीतून हापूसची स्वारी परदेशात जाते. यंदाही ही स्वारी रवाना होणार असली तरी यामध्ये आपली ओळख व्हावी, यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून प्रथमच स्पर्धा झाली. जुन्नरमधून हापूस तयार करुन त्याची चार डझनाची पेटी मुंबईमध्ये गेली. देवगड, रत्नागिरी या हापूसचा स्वाद जगाने प्रेम करावा असा आहे. मात्र, या व्यवसायात सध्या अघोरी स्पर्धा सुरू आहे.आंब्याच्या उलाढालीत कोकणच्या शेतकऱ्याचे अर्थकारण गुंतलेले असते. चार महिने या क्षेत्रात बागायतदार व्यावसायिकदृष्ट्या उतरलेले असतात, तर संपूर्ण वर्षभर बागायतीवर अवलंबून असलेले ग्रामीण भागातील छोटे-मोठे शेतकरी आपली वर्षाची निकड यातून काढण्याचा प्रयत्न करत असतात. कोकणात आंब्याचे उत्पादन हे देशभरातील इतर कोणत्याही राज्यांपेक्षा जास्त असते. त्यामुळेच जगभरातून पर्यटक अथवा कोणताही परदेशी पाहुणा आला की, तो आंब्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहात नाही. सध्या या पिकामध्ये तंत्रज्ञानाची भर पडली आहे. कल्टारचा वापरही अधिक प्रमाणावर केला जातो. आंब्याची वाढ व आंब्याचे पीक या दोन्ही गोष्टी संबंधित बागायतदार शेतकरी जीवापाड जपत असतो. यातच अनेक बँकांचे सहकार्य या विषयाला घेतल्यामुळे त्याचा परतावा वेळेत कसा देता येईल, याचा विचारही महत्त्वाचा मानला गेला आहे. या पार्श्वभूमीवर कोकणच्या हापूसची लोकप्रियता पश्चिमेकडील काही बागायतदारांना कदाचित सलत असावी, या हेतूनेच जगाच्या कोपऱ्यात आपलेही स्वतंत्र ब्रॅण्डिंग व्हावे, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पश्चिम महाराष्ट्रात उसाचे पीक अधिक असते. आता तेथील शेतकरी कृषी विद्यापीठाच्या मदतीने आंब्याचे प्रयोग करु लागला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात विजय मेहता कुलगुरु असताना या भागातील नारळ व आंबा शिरोळच्या रत्नाप्पा अण्णा कुंभार यांनी कारखाना परिसरात कसा लावला होता, याचे वर्णन करत व पश्चिम महाराष्ट्रात कोकणकडे शेतीतील उत्पादन देणाऱ्या स्वतंत्र जातीबाबत कसा आपुलकीने पाहात असे, या गोष्टी सांगत असत. याच्यामध्ये स्पर्धा जरुर होती. मात्र, त्यामध्ये आपला भाग कोकणच्या पुढे जावा व या क्षेत्रात दबाव गट निर्माण करावा, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली नव्हती. दुर्दैवाने गेल्या आठवड्यात माध्यमांमधील बातम्या वाचल्यानंतर जुन्नर असो अथवा सातारा-सांगलीकडील गाव असो या भागात हापूसची आपली अशी स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरु केला आहे. इतकेच नव्हे; तर मुंबईत खपला जाणारा आंबा अथवा विक्रीसाठी ठेवला जाणारा आंबा हा रत्नागिरी हापूस म्हणून विकला जातो. तो आता आपल्या भागाचा आंबा म्हणून समोर यावा, अशी काहींची इच्छा आहे. कोकणात रत्नागिरी, देवगड या दोन भागांनी कित्येक वर्षे हापूसचा स्वाद जगाला दिला आहे. कोणी कितीही प्रयत्न केले तरी या मातीचा गुण आंब्यामध्ये चवीच्या रुपाने येतो आहे. तंत्र विकसित झाले असले तरी बाहेरुन येणारा पाहुणा हा रत्नागिरी हापूसची ओळख विसरु शकत नाही. आंब्यामधील रेषांचा अभ्यास हा अनेकवेळा त्याची ओळख स्पष्ट करतो. कोकणातील आंब्यावर निसर्गाची अवकृपा झाली तरी येथील शेतकरी आपला स्वाभिमान गहाण ठेवत नाही. किंबहुना एखाद्या वर्षी पिकाने दगा दिला असला तरी त्याचे दु:ख पचवत तो पुढील वर्षी नव्या दमाने उभा राहातो व शेती-बागायतीतील आपली ओळख स्वतंत्रच ठेवत असतो. हापूसमध्ये अनेक जाती विकसित करण्याचा प्रयत्न संशोधक करत आहेत. कृषी तंत्रज्ञान या भागातील जमिनीचा कस व त्यावर पिकामध्ये येणारे गुण-दोष शोधून काढले आहेत. गेल्या १५ वर्षांत या भागात हापूसची निर्यातही मोठ्या प्रमाणावर होत असली तरी दलालीचा शाप जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आव्हाने कायम राहतील. शेतकरी, बागायतदारांना आंबा शिकवतो, सुचवतो व जगायला प्रेरणा देतो.- धनंजय काळे--