शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

प्रत्येक जिल्ह्यात सक्षम नाट्यगृह

By admin | Updated: February 1, 2016 00:51 IST

विनोद तावडे : सांस्कृतिक पुरस्कारांचे रत्नागिरीत वितरण

रत्नागिरी : महाराष्ट्राची संस्कृती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. येथील लोककला, नाट्यकला, विविध कलांची जोपासना होणे आवश्यक आहे. राज्याची ही संस्कृती अनंतकाळ टिकावी, यासाठीच राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे प्रयत्न केले जात आहेत. त्याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात एक नाट्यगृह उभारण्यावर शासनाचा भर राहणार आहे. जेथे नाट्यगृह असेल, तेथे ते अधिक सक्षम करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक व शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी येथे रविवारी बोलताना केले. येथील सावरकर नाट्यगृहात रविवारी सायंकाळी राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित राज्य सांस्कृतिक पुरस्कार २०१५ प्रदान सोहळा आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कारप्राप्त कलाकारांचा सत्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. रत्नागिरीत कार्यक्रम होत असलेल्या सावरकर नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठीही शासनाकडून आर्थिक मदत केली जाईल. त्याबाबतची इतर जबाबदारी रत्नागिरी नगरपरिषदेने उचलावी, असेही तावडे म्हणाले. पुरस्कार वितरणानंतर कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात अकादमीरत्न (फेलो) तुळशीदास बोरकर यांचा पंडित विजय बक्षी व शिवानंद डेगलुरकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यानंतर तावडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला आमदार उदय सामंत, आमदार हुस्नबानू खलिफे, जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश शेवडे, भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने, रत्नागिरीचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात स्थानिक मान्यवरांच्या हस्ते राज्य सांस्कृतिक पुरस्कार २०१५ चे वितरण करण्यात आले. त्यामध्ये नाट्य दिग्दर्शक प्रकाश बुद्धिसागर, सत्यपाल चिंचोळकर (कीर्तन व समाजप्रबोधन), दत्तोबा भडाळे (कलादान), रामदास कामत (नाट्यक्षेत्र), पंडित विजय बक्षी (कंठसंगीत), डॉ. उषाताई पारखे (उपशास्त्रीय संगीत), पं.रमाकांत म्हापसेकर (वाद्यसंगीत), गुरू दत्तराज बोपन्ना बोडे (नृत्य), हिरामण बडे (तमाशा), शाहीर बाळ जगताप (शाहिरी), आशाताई मुसळे (लोककला), ठका कृष्णा गांगड (आदिवासी गिरिजन) यांचा समावेश होता. डॉ. उषाताई पारखे यांच्या अनुपस्थितीत त्यांचे सुपुत्र राजीव पारखे यांनी पुरस्कार स्वीकारला. (प्रतिनिधी) मुंबईतही नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा राज्यात लोकप्रिय असलेली नाट्यकला अधिक जोपासता यावी, अभिनयाबाबतचे दर्जेदार प्रशिक्षण येथील लोकांना मिळावे, यासाठी दिल्लीच्या नॅशनल स्कूल आॅफ ड्रामाची शाखा मुंबईतही सुरू केली जाणार आहे. त्याबाबतची कार्यवाही सुरू असल्याची माहिती मंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्कार वितरण सोहळ्यात दिली.