शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

भरपाई कागपदपत्रांच्या कचाट्यात

By admin | Updated: October 6, 2015 23:50 IST

आंबा, काजू नुकसानी : अद्यापही ४२ हजार लाभार्थी वंचित, ३३ कोटींचे वाटप होणे बाकी

सिंधुदुर्गनगरी : नुकसानग्रस्त आंबा व काजू बागायतदारांसाठी आलेली भरपाईची रक्कम महसूल विभागाच्या कागदपत्रांच्या कचाट्यात सापडली असून अद्यापपर्यंत जिल्ह्यातील नुकसानग्रस्त ३७०२ लाभार्थ्यांना ४ कोटी ५९ लाख ५५ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. अद्यापपर्यंत ४२ हजार ५४१ नुकसानग्रस्त बागायतदारांना ३३ कोटी ३२ लाख १९ हजार अनुदान वाटप होणे बाकी आहे. अनुदान खात्यात जमा होण्यासाठी शेतकऱ्यांकडून संमतीपत्राची पूर्तता होत नसल्याने महसूल विभागाकडून अनुदान वाटप धिम्या गतीने होत आहे.फेब्रुवारी व मार्च या दरम्यान जिल्ह्यात ऐन आंबा आणि काजू पिकाच्या हंगामामध्ये अवकाळी पावसाने थैमान मांडत या पिकांची नुकसानी केली होती. जिल्ह्यातील आंब्याचे ६६६९ हेक्टर तर काजू पिकाचे ८४९७.१४ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार समोर आले होते. त्या नुकसानीचा पंचनामा करून मदतीसाठीचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला होता. यात ४६ हजार २४३ बागायतदारांना याचा फटका बसत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते.त्यानुसार जून २०१५ मध्ये राज्य शासनाच्या कृषी विभागाकडे शासनाने बागायतदारांच्या नुकसानीपोटी तब्बल ३७ कोटी ९१ लाख ७ हजार रुपये अनुदान प्राप्त झाले होते. मात्र, हे अनुदान कृषी विभागाकडून वितरीत न करता महसूल विभागामार्फत अनुदान वितरीत करावे असे आदेश शासनाने दिल्याने कृषी विभागाकडे प्राप्त झालेले सर्व अनुदान प्रत्येक तालुका तहसीलदारांकडे वर्ग करण्यात आले. त्यानुसार संबंधित नुकसानग्रस्त बागायतदारांकडून बँक खाते, सातबारा व संमतीपत्र घेण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली.अनुदान प्राप्त होऊन चार महिन्यांचा कालावधी लोटला तरी प्राप्त अनुदानापैकी ३७०२ लाभार्थ्यांना ४ कोटी ५९ लाख ५५ हजार ३७६ एवढी नुकसानीपोटी रक्कम वितरीत करण्यात आली आहे. त्यामुळे केवळ १२ टक्के निधी वितरीत करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)महसूलसमोर आहेत अनेक अडचणीनुकसानग्रस्त बागायतदारांच्या सातबारावर जर एकच नाव असेल तर त्याला संमतीपत्राची आवश्यकता नाही. मात्र, एका एका सातबारावर ४० ते ५० सहहिस्सेदारांची नावे असल्यास बागायतदाराला संमतीपत्र मिळणे अवघड होऊन जाते. महसूलकडे संमतीपत्र न मिळाल्याने हे अनुदान वाटप रखडले आहे. संमतीपत्राऐवजी हमीपत्र घ्यावे अशी मागणीही काँग्रेस, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. शासनाच्या आदेशानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना (बागायतदारांना) हेक्टरी २५ हजार रुपये अनुदान द्यावे. असे असताना महसूल विभाग प्रति हेक्टरी ७ ते ८ हजार रुपये एवढी मदत देत आहे.खर्च मार्चपूर्वी हवाआंबा आणि काजूच्या नुकसानीपोटी प्राप्त झालेल्या अनुदानापैकी अद्यापही ३३ कोटी ३२ लाख १९ हजार ६२४ रुपये अनुदानाचे वाटप होणे शिल्लक आहे. हा निधी मार्च २०१६ अखेरपर्यंत वाटप होणे आवश्यक आहे नाहीतर नुकसानग्रस्तांसाठी आलेला निधी शासनास जमा करण्याची नामुष्की महसूल विभागावर ओढवली जावू शकते.