शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

भरपाई कागपदपत्रांच्या कचाट्यात

By admin | Updated: October 6, 2015 23:50 IST

आंबा, काजू नुकसानी : अद्यापही ४२ हजार लाभार्थी वंचित, ३३ कोटींचे वाटप होणे बाकी

सिंधुदुर्गनगरी : नुकसानग्रस्त आंबा व काजू बागायतदारांसाठी आलेली भरपाईची रक्कम महसूल विभागाच्या कागदपत्रांच्या कचाट्यात सापडली असून अद्यापपर्यंत जिल्ह्यातील नुकसानग्रस्त ३७०२ लाभार्थ्यांना ४ कोटी ५९ लाख ५५ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. अद्यापपर्यंत ४२ हजार ५४१ नुकसानग्रस्त बागायतदारांना ३३ कोटी ३२ लाख १९ हजार अनुदान वाटप होणे बाकी आहे. अनुदान खात्यात जमा होण्यासाठी शेतकऱ्यांकडून संमतीपत्राची पूर्तता होत नसल्याने महसूल विभागाकडून अनुदान वाटप धिम्या गतीने होत आहे.फेब्रुवारी व मार्च या दरम्यान जिल्ह्यात ऐन आंबा आणि काजू पिकाच्या हंगामामध्ये अवकाळी पावसाने थैमान मांडत या पिकांची नुकसानी केली होती. जिल्ह्यातील आंब्याचे ६६६९ हेक्टर तर काजू पिकाचे ८४९७.१४ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार समोर आले होते. त्या नुकसानीचा पंचनामा करून मदतीसाठीचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला होता. यात ४६ हजार २४३ बागायतदारांना याचा फटका बसत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते.त्यानुसार जून २०१५ मध्ये राज्य शासनाच्या कृषी विभागाकडे शासनाने बागायतदारांच्या नुकसानीपोटी तब्बल ३७ कोटी ९१ लाख ७ हजार रुपये अनुदान प्राप्त झाले होते. मात्र, हे अनुदान कृषी विभागाकडून वितरीत न करता महसूल विभागामार्फत अनुदान वितरीत करावे असे आदेश शासनाने दिल्याने कृषी विभागाकडे प्राप्त झालेले सर्व अनुदान प्रत्येक तालुका तहसीलदारांकडे वर्ग करण्यात आले. त्यानुसार संबंधित नुकसानग्रस्त बागायतदारांकडून बँक खाते, सातबारा व संमतीपत्र घेण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली.अनुदान प्राप्त होऊन चार महिन्यांचा कालावधी लोटला तरी प्राप्त अनुदानापैकी ३७०२ लाभार्थ्यांना ४ कोटी ५९ लाख ५५ हजार ३७६ एवढी नुकसानीपोटी रक्कम वितरीत करण्यात आली आहे. त्यामुळे केवळ १२ टक्के निधी वितरीत करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)महसूलसमोर आहेत अनेक अडचणीनुकसानग्रस्त बागायतदारांच्या सातबारावर जर एकच नाव असेल तर त्याला संमतीपत्राची आवश्यकता नाही. मात्र, एका एका सातबारावर ४० ते ५० सहहिस्सेदारांची नावे असल्यास बागायतदाराला संमतीपत्र मिळणे अवघड होऊन जाते. महसूलकडे संमतीपत्र न मिळाल्याने हे अनुदान वाटप रखडले आहे. संमतीपत्राऐवजी हमीपत्र घ्यावे अशी मागणीही काँग्रेस, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. शासनाच्या आदेशानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना (बागायतदारांना) हेक्टरी २५ हजार रुपये अनुदान द्यावे. असे असताना महसूल विभाग प्रति हेक्टरी ७ ते ८ हजार रुपये एवढी मदत देत आहे.खर्च मार्चपूर्वी हवाआंबा आणि काजूच्या नुकसानीपोटी प्राप्त झालेल्या अनुदानापैकी अद्यापही ३३ कोटी ३२ लाख १९ हजार ६२४ रुपये अनुदानाचे वाटप होणे शिल्लक आहे. हा निधी मार्च २०१६ अखेरपर्यंत वाटप होणे आवश्यक आहे नाहीतर नुकसानग्रस्तांसाठी आलेला निधी शासनास जमा करण्याची नामुष्की महसूल विभागावर ओढवली जावू शकते.