शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
3
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
4
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
5
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
6
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
7
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
8
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
9
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
10
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
11
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
12
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
13
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
14
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
15
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
16
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
17
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
19
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
20
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक

‘पेसा’च्या अंमलबजावणीसाठी कटिबद्ध

By admin | Updated: February 16, 2016 00:04 IST

दीपक केसरकर : राज्यपालांनी निर्णायक भूमिका बजावली

सावंतवाडी : बांबू, तेंदू, पत्ता, आदी वन उत्पादन तसेच १०० हेक्टरखालील तलावांच्या मालकीचे हस्तांतरण राज्यातील पेसा ग्रामपंचायतींना केले असून, पेसा कायद्याच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राच्या राज्यपालांनी निर्णायक भूमिका बजावली आहे. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास व वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले.केंद्रीय ग्रामीण विकास व पंचायतीराज मंत्रालयाच्यावतीने दिल्ली येथील विज्ञानभवनात ‘पेसा कायद्याची अंमलबजावणी : मुद्दे आणि पुढील पावले’ विषयावर आयोजित कार्यशाळेत पालकमंत्री केसरकर बोलत होते. यावेळी केंद्रीय ग्रामीण विकास व पंचायतीराज मंत्री चौधरी वीरेंद्र सिंह, राज्यमंत्री निहालचंद आणि सचिव एस. एम. विजयानंद यावेळी मंचावर उपस्थित होते. विविध राज्यांचे मंत्री या परिषदेस उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याच्यावतीने ग्रामविकास व वित्त राज्यमंत्री केसरकर आणि सचिव व्ही. गिरिराज, आदी उपस्थित होते.पालकमंत्री केसरकर म्हणाले, पंचायत विस्तार (अनुसूचित क्षेत्र) अधिनियमाच्या अर्थात पेसा कायद्याच्या अंमलबजावणीबाबत राज्यातील आदिवासी बांधवांच्या कल्याणाला अग्रस्थानी ठेवत राज्य शासनाने महत्त्वाची पावले उचलली आहेत. आदिवासी विभागाच्या मंजूर नियतव्ययापैकी २५६ कोटी रुपये ही ५ टक्के रक्कम पेसा ग्रामपंचायतींना विकासकामांसाठी देण्यात आली आहे. राज्यपाल विद्यासागर राव यांनी राज्यातील पेसा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वाची निर्णायक भूमिका बजावली असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी विशेष आग्रह धरून याची अंमलबजावणी केली. राज्यपालांच्या पुढाकाराने राज्यघटनेच्या पाचव्या परिशिष्टाची परिणामकारक अंमलबजावणी करता आली. तसेच विविध पाच कायद्यांमध्ये बदल करता आले, असेही त्यांनी सांगितले. (वार्ताहर)