शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

जिल्ह्यात हेल्मेटसक्ती करणार : जिल्हाधिकारी

By admin | Updated: January 12, 2016 00:39 IST

रस्ता सुरक्षा अभियानात मार्गदर्शन : अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी करणार

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात जे अपघात होतात त्या अपघातात दुचाकीस्वारांचेच जास्त बळी गेले आहेत. हेल्मेटचा वापर न केल्यामुळे दुचाकीस्वारांचा मृत्यू होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्ह्यात हेल्मेटसक्ती करण्यात येणार असल्याची माहिंती जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी २७ व्या रस्ता सुरक्षा अभियानात बोलताना दिली.येथील उपप्रादेशिक परिवहन विभागात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी भाषणात जिल्हाधिकारी अनिल भंडारी बोेलत होते. यावेळी पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बी.जी.खंडागळे, जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरिक्षक संजय साबळे, वाहन मोटर निरिक्षक उदयसिंह पाटील, पी. आर. रजपूत, पी. डी. सावंत, सौरभ पाटील, श्रीधर मांगलेकर, अधिकारी वाहन चालक, मालक संघटना, उपप्रादेशिक परिवहन विभागातील कर्मचारी उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी, म्हणाले केंद्रशासनाने यावर्षी ‘रस्ता सुरक्षा-कृती करण्याची वेळ’ हे घोष वाक्य दिले असून या अनुषंगाने यांची अंमलबाजावणी होणे गरजेचे आहे. गेल्या वर्षी भारतात रस्ते अपघातात सुमारे दीड लाख लोक मृत्यूमुखी पडतात. चार मिनिटाला एकाचा अपघातात मृत्यू होतो. ही आकडेवारी भयावह आहे. याला आळा न घातल्यास आगामी काही वर्षात प्रतिदोन मिनिटाला एकाचा मृत्यू होईल अशी शक्यता आहे. दरवर्षी सुमारे तीन लाख ८० हजार कोटी रूपयांचे नुकसान होते. राष्ट्रीय उत्पन्नाच्या तुलनेत हे प्रमाण म्हणजे ३ टक्के असे मोठे आहे. घडणारे बहुतांशी अपघात हे नियम न पाळल्यामुळेच घडतात. यामध्ये पादचारी व मोटरसायकलने वाहतूक करणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने शासकीय कर्मचाऱ्यांना मोटर सायकलचा वापर करताना हेल्मेटचा वापर सक्तीचा करण्यात आला असून वाहन चालवताना संयम ठेवणे, मोटरसायकलवरून रात्रीचा प्रवास टाळणे, व्यसन न करणे तसेच हेल्मेट सक्ती राबविणार असे मतही त्यांनी व्यक्त केले.जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे म्हणाले, रस्ते अपघातात सुरक्षेच्या दृष्टीने इंजिनिअरींग, एज्युकेशन व इंफोर्समेंट या तीन इंग्रजी ‘इ’ ची अंमलबजावणी होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यानुसार रस्त्यांची बांधणी, वाहतुकीच्या नियमांंची जागृती व नियमांची अंमलबजावणी या तीन गोष्टी काटेकोरपणे कृतीत आणल्यानंतर निश्चितच रस्ते अपघातांचे प्रमाण कमी होवू शकेल. यावेळी वाहतुक नियम व वाहतुक चिन्ह मार्गदर्र्शन पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत पी.डी. सावंत, प्रास्ताविक किरण बिडकर, सूत्रसंचालन भास्कर कासार तर आभार बी.जी. खंडागळे यांनी मानले.(प्रतिनिधी)