शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
3
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
4
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
5
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
6
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
7
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
8
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
9
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
10
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
11
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
13
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
14
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
15
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
16
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
17
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
18
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
19
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
20
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  

जिल्ह्यात हेल्मेटसक्ती करणार : जिल्हाधिकारी

By admin | Updated: January 12, 2016 00:39 IST

रस्ता सुरक्षा अभियानात मार्गदर्शन : अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी करणार

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात जे अपघात होतात त्या अपघातात दुचाकीस्वारांचेच जास्त बळी गेले आहेत. हेल्मेटचा वापर न केल्यामुळे दुचाकीस्वारांचा मृत्यू होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्ह्यात हेल्मेटसक्ती करण्यात येणार असल्याची माहिंती जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी २७ व्या रस्ता सुरक्षा अभियानात बोलताना दिली.येथील उपप्रादेशिक परिवहन विभागात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी भाषणात जिल्हाधिकारी अनिल भंडारी बोेलत होते. यावेळी पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बी.जी.खंडागळे, जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरिक्षक संजय साबळे, वाहन मोटर निरिक्षक उदयसिंह पाटील, पी. आर. रजपूत, पी. डी. सावंत, सौरभ पाटील, श्रीधर मांगलेकर, अधिकारी वाहन चालक, मालक संघटना, उपप्रादेशिक परिवहन विभागातील कर्मचारी उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी, म्हणाले केंद्रशासनाने यावर्षी ‘रस्ता सुरक्षा-कृती करण्याची वेळ’ हे घोष वाक्य दिले असून या अनुषंगाने यांची अंमलबाजावणी होणे गरजेचे आहे. गेल्या वर्षी भारतात रस्ते अपघातात सुमारे दीड लाख लोक मृत्यूमुखी पडतात. चार मिनिटाला एकाचा अपघातात मृत्यू होतो. ही आकडेवारी भयावह आहे. याला आळा न घातल्यास आगामी काही वर्षात प्रतिदोन मिनिटाला एकाचा मृत्यू होईल अशी शक्यता आहे. दरवर्षी सुमारे तीन लाख ८० हजार कोटी रूपयांचे नुकसान होते. राष्ट्रीय उत्पन्नाच्या तुलनेत हे प्रमाण म्हणजे ३ टक्के असे मोठे आहे. घडणारे बहुतांशी अपघात हे नियम न पाळल्यामुळेच घडतात. यामध्ये पादचारी व मोटरसायकलने वाहतूक करणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने शासकीय कर्मचाऱ्यांना मोटर सायकलचा वापर करताना हेल्मेटचा वापर सक्तीचा करण्यात आला असून वाहन चालवताना संयम ठेवणे, मोटरसायकलवरून रात्रीचा प्रवास टाळणे, व्यसन न करणे तसेच हेल्मेट सक्ती राबविणार असे मतही त्यांनी व्यक्त केले.जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे म्हणाले, रस्ते अपघातात सुरक्षेच्या दृष्टीने इंजिनिअरींग, एज्युकेशन व इंफोर्समेंट या तीन इंग्रजी ‘इ’ ची अंमलबजावणी होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यानुसार रस्त्यांची बांधणी, वाहतुकीच्या नियमांंची जागृती व नियमांची अंमलबजावणी या तीन गोष्टी काटेकोरपणे कृतीत आणल्यानंतर निश्चितच रस्ते अपघातांचे प्रमाण कमी होवू शकेल. यावेळी वाहतुक नियम व वाहतुक चिन्ह मार्गदर्र्शन पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत पी.डी. सावंत, प्रास्ताविक किरण बिडकर, सूत्रसंचालन भास्कर कासार तर आभार बी.जी. खंडागळे यांनी मानले.(प्रतिनिधी)