शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात हेल्मेटसक्ती करणार : जिल्हाधिकारी

By admin | Updated: January 12, 2016 00:39 IST

रस्ता सुरक्षा अभियानात मार्गदर्शन : अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी करणार

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात जे अपघात होतात त्या अपघातात दुचाकीस्वारांचेच जास्त बळी गेले आहेत. हेल्मेटचा वापर न केल्यामुळे दुचाकीस्वारांचा मृत्यू होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्ह्यात हेल्मेटसक्ती करण्यात येणार असल्याची माहिंती जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी २७ व्या रस्ता सुरक्षा अभियानात बोलताना दिली.येथील उपप्रादेशिक परिवहन विभागात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी भाषणात जिल्हाधिकारी अनिल भंडारी बोेलत होते. यावेळी पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बी.जी.खंडागळे, जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरिक्षक संजय साबळे, वाहन मोटर निरिक्षक उदयसिंह पाटील, पी. आर. रजपूत, पी. डी. सावंत, सौरभ पाटील, श्रीधर मांगलेकर, अधिकारी वाहन चालक, मालक संघटना, उपप्रादेशिक परिवहन विभागातील कर्मचारी उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी, म्हणाले केंद्रशासनाने यावर्षी ‘रस्ता सुरक्षा-कृती करण्याची वेळ’ हे घोष वाक्य दिले असून या अनुषंगाने यांची अंमलबाजावणी होणे गरजेचे आहे. गेल्या वर्षी भारतात रस्ते अपघातात सुमारे दीड लाख लोक मृत्यूमुखी पडतात. चार मिनिटाला एकाचा अपघातात मृत्यू होतो. ही आकडेवारी भयावह आहे. याला आळा न घातल्यास आगामी काही वर्षात प्रतिदोन मिनिटाला एकाचा मृत्यू होईल अशी शक्यता आहे. दरवर्षी सुमारे तीन लाख ८० हजार कोटी रूपयांचे नुकसान होते. राष्ट्रीय उत्पन्नाच्या तुलनेत हे प्रमाण म्हणजे ३ टक्के असे मोठे आहे. घडणारे बहुतांशी अपघात हे नियम न पाळल्यामुळेच घडतात. यामध्ये पादचारी व मोटरसायकलने वाहतूक करणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने शासकीय कर्मचाऱ्यांना मोटर सायकलचा वापर करताना हेल्मेटचा वापर सक्तीचा करण्यात आला असून वाहन चालवताना संयम ठेवणे, मोटरसायकलवरून रात्रीचा प्रवास टाळणे, व्यसन न करणे तसेच हेल्मेट सक्ती राबविणार असे मतही त्यांनी व्यक्त केले.जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे म्हणाले, रस्ते अपघातात सुरक्षेच्या दृष्टीने इंजिनिअरींग, एज्युकेशन व इंफोर्समेंट या तीन इंग्रजी ‘इ’ ची अंमलबजावणी होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यानुसार रस्त्यांची बांधणी, वाहतुकीच्या नियमांंची जागृती व नियमांची अंमलबजावणी या तीन गोष्टी काटेकोरपणे कृतीत आणल्यानंतर निश्चितच रस्ते अपघातांचे प्रमाण कमी होवू शकेल. यावेळी वाहतुक नियम व वाहतुक चिन्ह मार्गदर्र्शन पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत पी.डी. सावंत, प्रास्ताविक किरण बिडकर, सूत्रसंचालन भास्कर कासार तर आभार बी.जी. खंडागळे यांनी मानले.(प्रतिनिधी)