शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
3
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
4
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
5
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
6
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
7
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
8
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
9
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
10
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
11
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
12
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
13
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
14
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
15
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
16
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
17
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
18
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
19
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
20
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश

तटरक्षक दलात मच्छीमारांनाही संधी द्यावी

By admin | Updated: July 29, 2015 22:09 IST

सागरी मच्छीमार संघटना आक्रमक : पहिल्याच बैठकीत रोजगाराच्या विषयावर चर्चा

रत्नागिरी : रत्नागिरी तटरक्षक दलातील नोकरभरतीमध्ये मच्छिमारांना सामावून घेण्यासंदर्भात सागरी मच्छीमार संघटना आक्रमक झाली आहे. सागरी मच्छीमार संघटनेची पहिली बैठक रत्नागिरी येथे पार पडली. बदलत्या काळाबरोबरच मच्छीमारांच्या रोजगाराचा प्रश्नही गंभीर रुप धारण करत आहे. त्यादृष्टीने तटरक्षक दलामध्ये नोकरभरती करताना मच्छीमार बांधवांनाच प्राधान्य देणे गरजेचे आहे. समुद्रामध्ये होणारे प्रदूषण व त्यामुळे होणारे बदल यासंदर्भात मच्छीमारांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. या बैठकीत मच्छीमारांच्या दृष्टीने आवश्यक अशा अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये संघटनेचे कार्य व संघटनेची माहिती अधिकाधिक मच्छिमारांपर्यंत पोहोचविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. सागरी पाण्याचे होणारे प्रदूषण व त्यामुळे पाण्यात होणारे बदल यावर चर्चा करून प्रदूषणामुळे मत्स्योत्पादनावर होणाऱ्या विपरित परिणामांची माहिती मच्छिमारांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. त्यादृष्टीनेही बैठकीत चर्चा झाली. डिझेलवरील मूल्यवर्धित कराचा परतावा दर महिन्याच्या ५ तारखेपर्यंत मिळावा, यासाठीदेखील संघटनेकडून प्रयत्न करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. शहरातील उद्यमनगर येथे आयोजित बैठकीला संघटनेचे उपाध्यक्ष अमजद बोरकर, सचिव सुधीर वासावे, उपसचिव महेश नाटेकर, खजिनदार मुश्ताक मुकादम, सदस्य संजय पावसकर, अलंकार महाकाळ, मकबूल जांभारकर, मुकेश लोकरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)समुद्रातील प्रदूषणाबाबत मच्छीमारांमध्ये जागरूकता करण्याचा निर्णय.जिल्ह्यातील मच्छीमारांच्या विविध प्रश्नांवरही करण्यात आली चर्चा.