शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

युती शासनामुळे जिल्हा अधोगतीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2015 23:51 IST

नारायण राणेंचा घणाघात : काँग्रेसच्या मोर्चाने सिंधुदुर्गनगरी परिसर दणाणला

 सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील सी वर्ल्ड, विमानतळ, रेडी बंदर, महामार्ग चौपदरीकरण, पाटबंधारे प्रकल्प, आंबा, काजू बागायतदारांना पुरेशी नुकसान भरपाई नाही. मच्छिमारांसंदर्भात धोरणात्मक निर्णय नाही, जिल्ह्यातील वाळू, चिरे, खडी यावर वाढलेली रॉयल्टी यामुळे जिल्हा अधोगतीकडे जावू लागला आहे. याला सर्वस्वी जबाबदार भाजप-शिवसेना युती सरकार असून या झोपी गेलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी गुरुवारी काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी भवनावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारो कार्यकर्ते, शेतकरी, महिलावर्ग उपस्थित होते. प्रदेश काँग्रेसच्या सुचनेनुसार राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने गुरुवारी मोर्चा काढण्यात आला. पोलीस प्रशासनानेही या मोर्चासाठी बंदोबस्त ठेवला होता. मुख्यालयाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. ओरोस रवळनाथ मंदिर येथून साडेबारा वाजता निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर १ वाजता धडकला. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत म्हणाले, युती सरकार निष्क्रीय आहे. जिल्ह्याचा विकास करू शकत नाही. जिल्ह्यात होऊ घातलेले प्रकल्प बंद करून केवळ जनतेची विकासाच्या नावाने दिशाभूल करत आहे. रास्त दराचे धान्य, केरोसिन, भात खरेदी, आंबा-काजू नुकसानीबाबत अद्यापही या सरकारने कोणतेही निर्णय घेतलेले नाहीत. मुंबई-गोवा महामार्ग रुंदीकरणात जबरदस्तीने शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न सुरु आहे. शेतकऱ्यांचे जीवनावश्यक प्रश्न हे सरकार सोडवू शकत नाही ते जिल्ह्याचा विकास काम करणार? आता जिल्ह्याचा विकास व्हावा असे वाटत असेल तर काँग्रेस नेते नारायण राणे यांना साथ द्या असे सतीश सावंत यांनी सांगितले. संदीप कुडतरकर म्हणाले, युती सरकार स्थापन झाल्यावर आठ महिने झाले तरी हे सरकार स्थिर झालेले दिसत नाही. केवळ तुंबड्या भरण्यासाठी या सरकारचा कारभार सुरु असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला. अस्मिता बांदेकर म्हणाल्या, आश्वासन देऊन या सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. हे सरकार जिल्ह्याचा विकास करू शकत नाही. हे गेल्या आठ महिन्यात जनतेला समजले आहे. गेल्या निवडणुकांमध्ये झालेली चूक सुधारून जिल्ह्याच्या विकासासाठी आणि स्वत:च्या भल्यासाठी जिल्हावासियांनी राणे यांच्या पाठिशी रहावे, असाही संकल्प सोडला. (प्रतिनिधी) महत्वाच्या घटना या मोर्चात काँग्रेस नेते नारायण राणे बैलगाडीतून सहभागी झाले होते. युती शासन व पालकमंत्री यांच्या विरोधात घोषणा देत मोर्चा ओरोस फाट्यावरून मार्गस्थ झाला. या मोर्चात आमदार नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे, संदेश पारकर यांच्यासह काही काँग्रेसच्या माजी पदाधिकाऱ्यांचाही सहभाग जाणवला नाही. या मोर्चामुळे पुन्हा एकदा बऱ्याच कालावधीनंतर काँग्रेस सक्रीय झाल्याचे दिसून आले. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर मोर्चाचे रुपांतर सभेमध्ये झाले. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.