शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

कोयनेत अजूनही २९ टक्के पाणीसाठा..!

By admin | Updated: June 13, 2015 00:25 IST

गत वर्षीच्या तुलनेत दुप्पट : सर्वच धरणांची समाधानकारक स्थिती

जगदीश कोष्टी -सातारा  जिल्ह्यात मान्सूनचे आगमन दरवर्षी सरासरी ७ जूनला होते. यंदा मात्र १२ जून उजडला तरी म्हणावा असा पाऊस पडला नाही. त्यामुळे अनेकांना चिंता सतावत असली तरी जिल्ह्यातील जलसाठे समाधानकारक आहेत. सर्वच धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त पाणी आहे. कोयना धरणात ३०.४५ टीएमसी पाणी असून, गेल्या वर्षी याच दिवशी अवघा १५.४७ टीएमसी होते.सातारा जिल्ह्याला लाभलेल्या नैसर्गिक वरदानामुळे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असतो. त्यामुळे महाबळेश्वर, वाई, सातारा, जावळी, पाटण तालुके हे अती पावसाचे म्हणून ओळखले जातात. या तालुक्यातही यंदा फारसा पाऊस झालेला नाही. या पाच जिल्ह्यांच्या अगदी उलटस्थिती असलेल्या माण, खटाव, फलटण व खंडाळा तालुक्यांचा काही भाग दुष्काळी म्हणून ओळखला जातो. या भागात नेहमी परतीचा पाऊस पडतो. मात्र, यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यातच या दुष्काळी तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे. यामुळे यंदा पावसाचे कसे होणार हा प्रश्न बळीराजापुढे उभा आहे.जिल्ह्यात पडत असलेल्या पावसाचा थेंबन्थेंब अडविण्यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर प्रकल्प उभारले गेले. त्यामुळे मुबलक प्रमाणावर पाणीसाठा होत असल्याने जिल्ह्याबरोबरच शेजारच्या जिल्ह्याचीही तहान सातारा भागवत आहे. या सर्वच धरणांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा जास्त पाणीसाठे आहेत. कण्हेर आणि तारळी धरणाचा याला अपवाद आहे. जिल्ह्यातील धरणे व त्यात असलेले पाणी टीएमसीमध्ये (कंसात गेल्या वर्षी १२ जून रोजी) असा : कोयना ३०.४५ (१५.४७), धोम ३.५० (३.३९), कण्हेर २.८५ (३.२८), धोम-बलकवडी ०.३४ (०.३३), उरमोडी ६.७१ (५.१३), तारळे २.४८ (४.१०), येरळवाडी ०.५९ (०.३२), मोरणा ०.६७ (०.१८), उत्तरमांड ०.३९ (०.३७), नागेवाडी ०.१५ (०.१४), महू ०.०५ (०.०४), हातगेघर (०.०३१) (०.०११).तालुकानिहाय पाऊस (मिमी)तालुका२०१५२०१४सातारा ३३.९३९.०७जावळी२८.२३०.७पाटण४५.४५२.६कराड४५.२५५.६कोेरेगाव३१.४३८.८खटाव६४.८५६.०माण९७.७२८.४फलटण४४.०३४.५खंडाळा५६.०३८.६वाई१५.६२१.७महाबळेश्वर६७.८४.३एकूण५३०४००.९पाऊसही नाही मागेजिल्ह्यात सध्या पांढरा कापूस पिंजून ठेवल्यासारखे पांढरे ढग येत आहेत. काळे ढग संध्याकाळी जमा होतात अन् निघूनही जातात. त्यामुळे अनेकांच्या नजरा वरुणराजाकडे लागल्या असल्या तरी चिंतेचे कारण नाही, असे आकडेवारी सांगतात. गेल्या वर्षीच्या तुलनेत आजच्या तारखेला पाऊसही चांगलाच झाला आहे. जिल्ह्यात या हंगामात आतापर्यंत ५३० मिलीमीटर पाऊस पडला आहे. गेल्या वर्षी या दिवसाअखेर अवघा ४००.९ मिलीमीटर झाला होता.