शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना घेराव

By admin | Updated: July 9, 2015 00:14 IST

भाजप पदाधिकारी आक्रमक : विकासकामे मंजूर होत नसल्याचा आरोप

सिंधुदुर्गनगरी : भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजनमधून सुचविलेली विकासकामे पाठपुरावा करूनही मंजूर होत नाहीत. मात्र, इतर पक्षाकडून दूरध्वनीवरून सांगितलेली विकासकामे मंजूर केली जातात. त्यामुळे अखेर बुधवारी संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हा नियोजन अधिकारी हरिबा थोरात यांना घेराव घालत याबाबतचा जाब विचारला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असता या प्रकरणी आपण बारकाईने लक्ष देऊन पुरवणी यादी ठेवून विकासकामे मंजुरीसाठी ठेवतो असे सांगत आक्रमक झालेल्या भाजप कार्यकर्त्यांना जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी शांत केले.जिल्हा नियोजनमधून जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने विकासात्मक कामे केली जातात. परंतु जिल्हा नियोजन विकास आराखड्यामध्ये भाजपचे प्रमोद जठार, अतुल काळसेकर, काका कुडाळकर आदी पदाधिकाऱ्यांनी काही विकासकामे सुचविली होती. मात्र दूरध्वनीवरून संपर्क करून सुचविलेली काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची कामे विकासकामांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. ही कामे ठेकेदारांशी बसून निश्चित करण्यात आली आहेत असा आरोप भाजपच्या काका कुडाळकर व अतुल काळसेकर यांनी केला आहे.याबाबत बुधवारी संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हा नियोजन अधिकारी हरिबा थोरात यांना त्यांच्या कार्यालयात घेराव घालत आमची कामे सुचवूनही का डावलण्यात आली याची कारणे द्या. कोणाच्या सांगण्यावरून कामे डावलली? आमचा हक्क का डावलला जात आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित करत नियोजन अधिकारी हरिबा थोरात यांना धारेवर धरले. यावेळी नियोजन अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तराने समाधान न झाल्याने आक्रमक झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांची भेट घेत आपल्यावर झालेल्या अन्यायाकडे लक्ष वेधले.पुरवणी यादीद्वारे विकासकामे मंजुरीसाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी सुचविलेली कामे जाणूनबुजून डावलण्यात आली आहेत. आमची कामे यादीत समाविष्ट केली नाहीत. अधिकाऱ्यांकडून समर्पक उत्तरे दिली जात नाहीत. कामे का डावलली याचे नियमानुसार उत्तर द्या. तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही असा पवित्रा भाजप कार्यकर्त्यांनी घेतला. अखेर जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी आपण याबाबत स्वत: लक्ष घालून कोणावर अन्याय होऊ नये यासाठी आपली कामे मंजूर होण्याच्या दृष्टीने पुरवणी यादी नियोजन समिती सादर केली जाईल असे स्पष्ट करत आक्रमक झालेल्या भाजप कार्यकर्त्यांना शांत केले.यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, काका कुडाळकर, प्रज्ञा ढवण, प्रमोद रावराणे, बाळू देसाई, राजू राऊळ यांच्यासह मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)भ्रष्टाचाराची चौकशी कराजिल्हा नियोजनमधून दीड वर्षापूर्वी घेतलेली कामे पूर्ण झालेली असताना संबंधित कामांना पुन्हा निधी देऊन भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. तसेच याची चौकशी करण्याची मागणीही जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे