शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

बंद प्रकल्पामुळे कोट्यवधींचा चुराडा

By admin | Updated: June 7, 2014 00:29 IST

टाळंबाची व्यथा : कार्यालये, वसाहतींची दुरवस्था, कर्मचाऱ्यांना बिनकामी पगार

विजय पालकर ल्ल माणगावसात गावांचे पुनर्वसन करुन पासष्ट गावांना ओलिताखाली आणण्याच्या उद्देशाने पस्तीस वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करुन सुरु करण्यात आलेल्या टाळंबा प्रकल्पाच्या कार्यालयांची व वसाहतींची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे प्रकल्पातील कर्मचाऱ्यांसह कार्यालयांचे व वसाहतींचे पुनर्वसन करण्याची वेळ आली आहे. गेले दीड वर्ष बंदावस्थेत असल्याने जनतेच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्याचाच हा प्रकार आहे. तसेच बिनकामी पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना काम सुरु असलेल्या ठिकाणी पाठविण्याकडेही वरिष्ठांनी दुर्लक्ष केले आहे.माणगाव खोरे पाण्याने समृद्ध करण्यासाठी पस्तीस वर्षापूवी कोकण पाटबंधारे विकास महामंडळाने टाळंबा प्रकल्प सुरु केला. या प्रकल्पाच्या माध्यमातून माणगाव परिसरातील बुडीताखाली येणाऱ्या सात गावांचे पुनर्वसन करण्याचा बेत आखून परिसरातील पासष्ट गावांना मुबलक पाणीसाठा करण्याचा मुख्य उद्देश या प्रकल्पातून साधण्यात येणार होता. मात्र, सद्यस्थिती पाहता या प्रकल्पामुळे शासनाचा म्हणजे जनतेचाच कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्यात आल्याचे दिसून येत आहे. या प्रकल्पामुळे बुडीत क्षेत्रात येणाऱ्या वसोली, उपवडे, साकीर्डे, आंजिवडे, चाफेली, हळदीचे नेरुर, पुळास या सात गावांच्या पुनर्वसनाबाबतही कोणतीही भूमिका घेण्यात आलेली नाही. तसेच या प्रकल्पामुळे गेल्या तीस वर्षात पाण्याचा एक थेंबही साठविण्यात आलेला नाही.या टाळंबा प्रकल्पासाठी त्यावेळी कार्यालये उभारण्यात आली. लाखो रुपये खर्च करुन गोडावून बांधण्यात आली. मात्र, आजपर्यंत या गोडावूनमध्ये एकही सिमेंटचे पोते उतरविण्यात आलेले नाही. त्यामुळे ही गोडावून का बांधण्यात आली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कार्यालयांची व कर्मचारी वसाहतींची अवस्थाही आता स्मशानभूमीसमान झाली आहे. कित्येकवर्षे या कार्यालयांच्या व वसाहतींच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष देण्यात आलेले नाही. त्यामुळे दीड वर्षे बंदावस्थेत असणारा हा प्रकल्प पुन्हा सुरु होणार का? याबाबतही प्रश्नचिन्ह आहे.जवळपास दीड वर्षे टाळंबा प्रकल्पाचे काम बंद आहे. या दीड वर्षाच्या कालावधीत कर्मचाऱ्यांनी शासनाचे केलेले काम आणि त्यांनी पगारापोटी घेतलेला मोबदला याचे समीकरण मांडले तर या प्रकल्पातील छोटे घोटाळे एकत्र केल्यास मोठा घोटाळा निर्माण होऊ शकतो. टाळंबा प्रकल्पातील काही कर्मचारी असेही आहेत ज्यांना काम न करता पगार घेणं कमीपणाचे वाटत आहे. परंतु, त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच आहे. कोकण पाटबंधारे 'विकास' महामंडळ किती भकास असू शकते हे या टाळंबा प्रकल्पाच्या ठिकाणी आल्यास नक्की कळते.