शहरं
Join us  
Trending Stories
1
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
2
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
5
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
6
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
7
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
8
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
9
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
10
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
11
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
12
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
13
Nigeria Mosque Explosion: नायजेरिया हादरलं! मशिदीत नमाजाच्या वेळी मोठा बॉम्बस्फोट; ५ ठार, ३५ जण गंभीर जखमी
14
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
15
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
16
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
17
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
18
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
19
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
20
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
Daily Top 2Weekly Top 5

बंद प्रकल्पामुळे कोट्यवधींचा चुराडा

By admin | Updated: June 7, 2014 00:29 IST

टाळंबाची व्यथा : कार्यालये, वसाहतींची दुरवस्था, कर्मचाऱ्यांना बिनकामी पगार

विजय पालकर ल्ल माणगावसात गावांचे पुनर्वसन करुन पासष्ट गावांना ओलिताखाली आणण्याच्या उद्देशाने पस्तीस वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करुन सुरु करण्यात आलेल्या टाळंबा प्रकल्पाच्या कार्यालयांची व वसाहतींची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे प्रकल्पातील कर्मचाऱ्यांसह कार्यालयांचे व वसाहतींचे पुनर्वसन करण्याची वेळ आली आहे. गेले दीड वर्ष बंदावस्थेत असल्याने जनतेच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्याचाच हा प्रकार आहे. तसेच बिनकामी पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना काम सुरु असलेल्या ठिकाणी पाठविण्याकडेही वरिष्ठांनी दुर्लक्ष केले आहे.माणगाव खोरे पाण्याने समृद्ध करण्यासाठी पस्तीस वर्षापूवी कोकण पाटबंधारे विकास महामंडळाने टाळंबा प्रकल्प सुरु केला. या प्रकल्पाच्या माध्यमातून माणगाव परिसरातील बुडीताखाली येणाऱ्या सात गावांचे पुनर्वसन करण्याचा बेत आखून परिसरातील पासष्ट गावांना मुबलक पाणीसाठा करण्याचा मुख्य उद्देश या प्रकल्पातून साधण्यात येणार होता. मात्र, सद्यस्थिती पाहता या प्रकल्पामुळे शासनाचा म्हणजे जनतेचाच कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्यात आल्याचे दिसून येत आहे. या प्रकल्पामुळे बुडीत क्षेत्रात येणाऱ्या वसोली, उपवडे, साकीर्डे, आंजिवडे, चाफेली, हळदीचे नेरुर, पुळास या सात गावांच्या पुनर्वसनाबाबतही कोणतीही भूमिका घेण्यात आलेली नाही. तसेच या प्रकल्पामुळे गेल्या तीस वर्षात पाण्याचा एक थेंबही साठविण्यात आलेला नाही.या टाळंबा प्रकल्पासाठी त्यावेळी कार्यालये उभारण्यात आली. लाखो रुपये खर्च करुन गोडावून बांधण्यात आली. मात्र, आजपर्यंत या गोडावूनमध्ये एकही सिमेंटचे पोते उतरविण्यात आलेले नाही. त्यामुळे ही गोडावून का बांधण्यात आली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कार्यालयांची व कर्मचारी वसाहतींची अवस्थाही आता स्मशानभूमीसमान झाली आहे. कित्येकवर्षे या कार्यालयांच्या व वसाहतींच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष देण्यात आलेले नाही. त्यामुळे दीड वर्षे बंदावस्थेत असणारा हा प्रकल्प पुन्हा सुरु होणार का? याबाबतही प्रश्नचिन्ह आहे.जवळपास दीड वर्षे टाळंबा प्रकल्पाचे काम बंद आहे. या दीड वर्षाच्या कालावधीत कर्मचाऱ्यांनी शासनाचे केलेले काम आणि त्यांनी पगारापोटी घेतलेला मोबदला याचे समीकरण मांडले तर या प्रकल्पातील छोटे घोटाळे एकत्र केल्यास मोठा घोटाळा निर्माण होऊ शकतो. टाळंबा प्रकल्पातील काही कर्मचारी असेही आहेत ज्यांना काम न करता पगार घेणं कमीपणाचे वाटत आहे. परंतु, त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच आहे. कोकण पाटबंधारे 'विकास' महामंडळ किती भकास असू शकते हे या टाळंबा प्रकल्पाच्या ठिकाणी आल्यास नक्की कळते.