शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

नगराध्यक्षाचा अट्टाहास युतीच्या अंगलट

By admin | Updated: November 25, 2015 00:35 IST

अपमान नाट्याचा फायदा उठवला काँग्रेसने : मैत्रीपूर्ण राजकारणाच्या नव्या वाटचालीस सुरूवात

वैभव साळकर -- दोडामार्ग  -पुरेसे संख्याबळ नसतानासुद्धा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने कसई दोडामार्ग नगरपंचायतीची सत्ता काबीज करून युतीच्या तोंडचा घास हिरावून घेतला. सुरूवातीपासूनच एकत्र लढलेल्या सेना-भाजपचा नगराध्यक्ष पदासाठीचा अट्टाहास, त्यातून निर्माण झालेली नाराजी आणि अपमाननाट्य याचा काँग्रेस-राष्ट्रवादीने पुरेपूर फायदा उठवत सत्ता स्थापन केली. एकेकाळचे काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे दावेदार संतोष नानचे यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे संध्या प्रसादी, रेश्मा कोरगावकर आणि रामचंद्र ठाकूर यांनी एकत्र येत काँग्रेसला सहकार्य केल्याने सत्ता समीकरण ठरविण्यात आघाडीला यश आले. त्यामुळे या निवडणुकीत राजकारणात कोण कोणाचा दीर्घकालीन शत्रू आणि मित्रही नसतो, याचा प्रत्यय शहरवासीयांना आला. कसई दोडामार्ग नगरपंचायत निवडणूक तशी सुरूवातीपासूनच गाजली आणि चर्चेतही राहिली. एकेकाळचे काँगे्रसचेच असलेल्या संध्या राजेश प्रसादी, रेश्मा कोरगावकर आणि राजेश प्रसादी यांनी काँग्रेसपासून फारकत घेत दोन वर्षांपूर्वीच सेना-भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर रामचंद्र ठाकूर यांनी मनसेत प्रवेश केला. त्यापैकी संध्या प्रसादी यांनी या नगरपंचायतीच्या निवडणुकीत सेनेच्या, तर त्यांचे पती आणि माजी सरपंच राजेश प्रसादी हे भाजपमधून निवडणूक लढले. तर रेश्मा कोरगावकर यासुद्धा भाजपमधूनच नगरपंचायतीच्या निवडणुकीला सामोरे गेल्या. तर रामचंद्र ठाकूर हे मनसेमधून नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यापैकी राजेश प्रसादी हे संतोष नानचे यांच्या विरूद्ध निवडणुकीतच उभे होते. नानचे विरुद्ध प्रसादी अशी लक्षवेधी लढत प्रभाग क्र. ४ मध्ये गाजली. त्यामुळे प्रसादी व नानचे एकत्र येतील, याबाबत शंकाच होती. परंतु राजकारणात कोणी कोणाचा जास्त काळ शत्रू आणि मित्रही नसतो, असे म्हणतात त्याचाच प्रत्यय या निवडणुकीत तंतोतंत आला. कसई-दोडामार्ग नगरपंचायतीच्या इतिहासात झालेल्या पहिल्याच निवडणुकीतील हा किस्सा त्यासाठीच कायम स्मरणात राहील. शिवाय भविष्यातील मैत्रीपूर्ण राजकारणाची सुरूवातही करील. भाजपच्या नगरसेवक तथा माजी जिल्हा परिषद सदस्या रेश्मा कोरगावकर यादेखील नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत होत्या. मात्र, ऐनवेळी त्यांचाही पत्ता कट करून भाजपने सुधीर पनवेलकर यांचे नाव पुढे केले होते. त्यामुळे त्यादेखील नाराज होत्या. तर मनसेचे रामचंद्र ठाकूर हे सेना-भाजप युती सरकारवर पहिल्यापासूनच नाराज होते. त्यामुळे त्यांचा कौल आपूसकच काँग्रेसच्या बाजूने झुकला होता. नेमकी हीच वेळ साधत व नेमका याचाच फायदा काँगे्रेस-राष्ट्रवादीला झाला. संध्या प्रसादी, रेश्मा कोरगाकर व ठाकूर यांनी काँगे्रसला अर्थात नानचे यांना पाठिंबा दिला आणि नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदावर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांची निवड झाली. मात्र, या निवडणुकीत राजकारणात कोण कोणाचा दीर्घकाळ शत्रू आणि मित्रही नसतो, याचा प्रत्यय कसई दोडामार्ग शहरवासीयांसह जिल्ह्यातील जनतेला किंबहुना राजकीय पदाधिकाऱ्यांनाही यानिमित्ताने आला असेल हे मात्र नक्की. या विजयाने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले असून जिल्ह्यात सर्वत्र फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.मध्यस्थी असफल : प्रसादींची नाराजी भोवलीभाजप आणि सेनेचे संख्याबळ १० असताना सुद्धा सेना-भाजप या दोन्ही मित्रपक्षांनी नगराध्यक्षपदाचा अट्टाहास धरला. या अट्टाहासामुळेच सेनेकडून संध्या राजेश प्रसादी, तर भाजपकडून सुधीर पनवेलकर यांनी उमेदवारी अर्ज नगराध्यक्षपदासाठी दाखल केले. दोन्ही पक्षांची नेतेमंडळी नगराध्यक्ष आपलाच हवा, यासाठी अडून बसली. ही युती तुटते की काय, अशी शक्यता निर्माण झाली. त्यामुळे खुद्द पालकमंत्री दीपक केसरकर यांनीही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो प्रयत्नदेखील असफल ठरला. मात्र, अचानक नाट्यमयरित्या सेनेने बॅकफूटवर येत प्रसादी यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले. परिणामी प्रसादी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला खरा; पण त्यांच्या चेहऱ्यावर नाराजीचा भाव स्पष्ट जाणवत होता. याच नाराजी आणि अपमाननाट्याचा फायदा काँग्रेसने करून घेतला. या नाराजीवर मात्र भाजपने तटस्थ राहत केवळ बघ्याची भूमिका घेतली. प्रसादी यांचा झालेला अपमान हा भाजपच्या कुणीच पदाधिकाऱ्यांनी मनावर घेतला नाही की त्यांच्याबाबत सकारात्मक निर्णयही घेतला नाही.नगराध्यक्षपदासाठी सेनेने माझा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. जर हा अर्ज मागे घ्यायचाच होता, तर मुळात तो भरणे चुकीचे होते. मात्र, मुद्दाम अर्ज भरायला लावून तो शेवटच्याक्षणी मागे घेण्यास मला भाग पाडले. त्यामुळे माझ्यावर अन्याय झाल्याने मी संतोष नानचे यांना पाठिंबा दिला. - संध्या प्रसादी, नगरसेवक, शिवसेनानगराध्यक्षपदी मीदेखील इच्छुक होते. मात्र, ऐनवेळी मझा पत्ता कट करून सुधीर पनवेलकर यांना संधी देण्यात आली. यापूर्वीदेखील दोनवेळा माझ्यावर अन्याय झाला. त्यामुळे प्रामाणिक कार्यकर्त्यांवर झालेल्या अन्यायाविरूद्धच मी काँग्रेसला पाठिंंबा देत मतदान केले.- रेश्मा कोरगावकर, नगरसेवक, भाजपसेना-भाजप युती सरकारला लोकांच्या अपेक्षा पूर्ण करता आलेल्या नाहीत. पालकमंत्री दीपक केसरकर जिल्ह्यातील लोकांचे प्रश्न सोडवू शकलेले नाहीत. त्यामुळे केसरकरांच्या अकार्यक्षम कारभारामुळेच कसई दोडामार्गमध्ये स्थिर सरकार देण्याकरिता काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा देण्यात आला. - रामचंद्र ठाकूर, नगरसेवक, मनसे