शहरं
Join us  
Trending Stories
1
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
2
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
3
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
4
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
6
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
7
जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला !
8
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
9
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
10
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
11
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
12
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
13
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
14
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
15
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
16
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
17
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
18
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
19
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
20
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?

नगराध्यक्षाचा अट्टाहास युतीच्या अंगलट

By admin | Updated: November 25, 2015 00:35 IST

अपमान नाट्याचा फायदा उठवला काँग्रेसने : मैत्रीपूर्ण राजकारणाच्या नव्या वाटचालीस सुरूवात

वैभव साळकर -- दोडामार्ग  -पुरेसे संख्याबळ नसतानासुद्धा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने कसई दोडामार्ग नगरपंचायतीची सत्ता काबीज करून युतीच्या तोंडचा घास हिरावून घेतला. सुरूवातीपासूनच एकत्र लढलेल्या सेना-भाजपचा नगराध्यक्ष पदासाठीचा अट्टाहास, त्यातून निर्माण झालेली नाराजी आणि अपमाननाट्य याचा काँग्रेस-राष्ट्रवादीने पुरेपूर फायदा उठवत सत्ता स्थापन केली. एकेकाळचे काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे दावेदार संतोष नानचे यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे संध्या प्रसादी, रेश्मा कोरगावकर आणि रामचंद्र ठाकूर यांनी एकत्र येत काँग्रेसला सहकार्य केल्याने सत्ता समीकरण ठरविण्यात आघाडीला यश आले. त्यामुळे या निवडणुकीत राजकारणात कोण कोणाचा दीर्घकालीन शत्रू आणि मित्रही नसतो, याचा प्रत्यय शहरवासीयांना आला. कसई दोडामार्ग नगरपंचायत निवडणूक तशी सुरूवातीपासूनच गाजली आणि चर्चेतही राहिली. एकेकाळचे काँगे्रसचेच असलेल्या संध्या राजेश प्रसादी, रेश्मा कोरगावकर आणि राजेश प्रसादी यांनी काँग्रेसपासून फारकत घेत दोन वर्षांपूर्वीच सेना-भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर रामचंद्र ठाकूर यांनी मनसेत प्रवेश केला. त्यापैकी संध्या प्रसादी यांनी या नगरपंचायतीच्या निवडणुकीत सेनेच्या, तर त्यांचे पती आणि माजी सरपंच राजेश प्रसादी हे भाजपमधून निवडणूक लढले. तर रेश्मा कोरगावकर यासुद्धा भाजपमधूनच नगरपंचायतीच्या निवडणुकीला सामोरे गेल्या. तर रामचंद्र ठाकूर हे मनसेमधून नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यापैकी राजेश प्रसादी हे संतोष नानचे यांच्या विरूद्ध निवडणुकीतच उभे होते. नानचे विरुद्ध प्रसादी अशी लक्षवेधी लढत प्रभाग क्र. ४ मध्ये गाजली. त्यामुळे प्रसादी व नानचे एकत्र येतील, याबाबत शंकाच होती. परंतु राजकारणात कोणी कोणाचा जास्त काळ शत्रू आणि मित्रही नसतो, असे म्हणतात त्याचाच प्रत्यय या निवडणुकीत तंतोतंत आला. कसई-दोडामार्ग नगरपंचायतीच्या इतिहासात झालेल्या पहिल्याच निवडणुकीतील हा किस्सा त्यासाठीच कायम स्मरणात राहील. शिवाय भविष्यातील मैत्रीपूर्ण राजकारणाची सुरूवातही करील. भाजपच्या नगरसेवक तथा माजी जिल्हा परिषद सदस्या रेश्मा कोरगावकर यादेखील नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत होत्या. मात्र, ऐनवेळी त्यांचाही पत्ता कट करून भाजपने सुधीर पनवेलकर यांचे नाव पुढे केले होते. त्यामुळे त्यादेखील नाराज होत्या. तर मनसेचे रामचंद्र ठाकूर हे सेना-भाजप युती सरकारवर पहिल्यापासूनच नाराज होते. त्यामुळे त्यांचा कौल आपूसकच काँग्रेसच्या बाजूने झुकला होता. नेमकी हीच वेळ साधत व नेमका याचाच फायदा काँगे्रेस-राष्ट्रवादीला झाला. संध्या प्रसादी, रेश्मा कोरगाकर व ठाकूर यांनी काँगे्रसला अर्थात नानचे यांना पाठिंबा दिला आणि नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदावर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांची निवड झाली. मात्र, या निवडणुकीत राजकारणात कोण कोणाचा दीर्घकाळ शत्रू आणि मित्रही नसतो, याचा प्रत्यय कसई दोडामार्ग शहरवासीयांसह जिल्ह्यातील जनतेला किंबहुना राजकीय पदाधिकाऱ्यांनाही यानिमित्ताने आला असेल हे मात्र नक्की. या विजयाने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले असून जिल्ह्यात सर्वत्र फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.मध्यस्थी असफल : प्रसादींची नाराजी भोवलीभाजप आणि सेनेचे संख्याबळ १० असताना सुद्धा सेना-भाजप या दोन्ही मित्रपक्षांनी नगराध्यक्षपदाचा अट्टाहास धरला. या अट्टाहासामुळेच सेनेकडून संध्या राजेश प्रसादी, तर भाजपकडून सुधीर पनवेलकर यांनी उमेदवारी अर्ज नगराध्यक्षपदासाठी दाखल केले. दोन्ही पक्षांची नेतेमंडळी नगराध्यक्ष आपलाच हवा, यासाठी अडून बसली. ही युती तुटते की काय, अशी शक्यता निर्माण झाली. त्यामुळे खुद्द पालकमंत्री दीपक केसरकर यांनीही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो प्रयत्नदेखील असफल ठरला. मात्र, अचानक नाट्यमयरित्या सेनेने बॅकफूटवर येत प्रसादी यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले. परिणामी प्रसादी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला खरा; पण त्यांच्या चेहऱ्यावर नाराजीचा भाव स्पष्ट जाणवत होता. याच नाराजी आणि अपमाननाट्याचा फायदा काँग्रेसने करून घेतला. या नाराजीवर मात्र भाजपने तटस्थ राहत केवळ बघ्याची भूमिका घेतली. प्रसादी यांचा झालेला अपमान हा भाजपच्या कुणीच पदाधिकाऱ्यांनी मनावर घेतला नाही की त्यांच्याबाबत सकारात्मक निर्णयही घेतला नाही.नगराध्यक्षपदासाठी सेनेने माझा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. जर हा अर्ज मागे घ्यायचाच होता, तर मुळात तो भरणे चुकीचे होते. मात्र, मुद्दाम अर्ज भरायला लावून तो शेवटच्याक्षणी मागे घेण्यास मला भाग पाडले. त्यामुळे माझ्यावर अन्याय झाल्याने मी संतोष नानचे यांना पाठिंबा दिला. - संध्या प्रसादी, नगरसेवक, शिवसेनानगराध्यक्षपदी मीदेखील इच्छुक होते. मात्र, ऐनवेळी मझा पत्ता कट करून सुधीर पनवेलकर यांना संधी देण्यात आली. यापूर्वीदेखील दोनवेळा माझ्यावर अन्याय झाला. त्यामुळे प्रामाणिक कार्यकर्त्यांवर झालेल्या अन्यायाविरूद्धच मी काँग्रेसला पाठिंंबा देत मतदान केले.- रेश्मा कोरगावकर, नगरसेवक, भाजपसेना-भाजप युती सरकारला लोकांच्या अपेक्षा पूर्ण करता आलेल्या नाहीत. पालकमंत्री दीपक केसरकर जिल्ह्यातील लोकांचे प्रश्न सोडवू शकलेले नाहीत. त्यामुळे केसरकरांच्या अकार्यक्षम कारभारामुळेच कसई दोडामार्गमध्ये स्थिर सरकार देण्याकरिता काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा देण्यात आला. - रामचंद्र ठाकूर, नगरसेवक, मनसे