शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सिने नाट्य कलावंत जनार्दन परब यांचे निधन

By admin | Updated: April 3, 2016 03:50 IST

हृदयविकाराचा धक्का : नाट्यक्षेत्रात हळहळ व्यक्त

कणकवली : जेष्ठ सिने नाट्य कलाकार जनार्दन परब (वय ६८) यांचे शनिवारी सकाळी आठ वाजता मुंबई येथे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. सिंधुदुर्गमधील हरकुळ खुर्द हे मूळ गाव असलेल्या जनार्दन परब यांनी मराठी रंगभूमी, चित्रपट, तसेच हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. लहानपणापासूनच जनार्दन परब यांना अभिनय कलेची आवड आणि जाण होती. संपूर्ण बालपण कोकणात तर महाविद्यालयीन शिक्षण आणि नोकरीसाठी ते मुंबईत दाखल झाले. तरुण वयातच ते एकांकीका आणि प्रायोगिक नाटकांशी जोडले गेले. नोकरी व शिक्षण सांभाळत आपल्या अभिनयाची हौस आणि आवड अगदी मनापासून जोपासली. विजया मेहतासारख्या नट मंडळींचे मार्गदर्शन याच काळात त्यांना लाभले. त्यांच्या प्रमुख नाटकांमध्ये ‘अवध्य’, ‘नकटीच्या लग्नाला’, ‘अजब न्याय वर्तुळाचा’, ‘हमिदाबाईची कोठी’, ‘रात्र थोडी सोंग फार’, ‘काका किशाचा’, ‘संगीत विद्याहरण’, ‘मुद्राराक्षस’ तर ‘धुमशान’, ‘नशिबवान खावचो घोव’, ‘कबूतरखाना’सारख्या मालवणी नाटकांमध्ये अभिनयासोबतच काही नाटकांची दिग्दर्शनाची देखील धुरा सांभाळली. अनेक हिंदी-मराठी चित्रपटातील भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. यामध्ये ‘माझा पती करोडपती’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘गम्मत जम्मत’, ‘कुलस्वामिनी तुळजाभवानी’ चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून, हिंदीत ‘कसम’, ‘शिकारी’, ‘ऐलान’, ‘जिद्दी’, ‘क्रांतीवीर’, ‘बाजीगर’, ‘नायक’, ‘गुलाम’, ‘उडान’, ‘चायना गेट’सारख्या चित्रपटांचा उल्लेख करता येईल. क्रांतिवीर चित्रपटातील त्यांचा आणि नाना पाटेकर यांचा प्रसंग आजही स्मरणात आहे. काही वर्षापूर्वी शारीरिक अस्वास्थ्यामुळे जनार्दन परब यांनी कला क्षेत्रापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता. पण दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी पुन:श्च या क्षेत्रात परतण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अनेक मालिका आणि चित्रपटांमधून भूमिकेच्या माध्यमातून ते आपल्याला दिसत राहिले. मालवणी रंगभूमीला त्यांनी दिलेलं योगदान वाखाणण्याजोगं आहे. नवीन विषय प्रेक्षकांसमोर मांडत, परब यांनी तरुण कलाकारांसोबत मालवणी रंगभूमी पुनर्जिवीत ठेवण्याचं कार्य केलेलं आहे. अनेक चित्रपटांमधून तसंच दूरचित्रवाणी मालिकांमधून चरित्र अभिनेता म्हणून त्यांचं काम दखल घेण्याजोगे आहे. जनार्दन परब यांनी चार दशकाहून अधिक काळ रंगभूमी व रुपेरी पडद्यासाठी स्वत:ला झोकून दिले. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना ‘शंकर घाणेकर पुरस्कार’, २००८ सालचा ‘नटवर्य केशवराव दाते पुरस्कार’ तसेच ‘कॉलेज साहित्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांच्या निधनाने नाट्य क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून आणि दोन नातू असा परिवार आहे. (प्रतिनिधी)