शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

सिने नाट्य कलावंत जनार्दन परब यांचे निधन

By admin | Updated: April 3, 2016 03:50 IST

हृदयविकाराचा धक्का : नाट्यक्षेत्रात हळहळ व्यक्त

कणकवली : जेष्ठ सिने नाट्य कलाकार जनार्दन परब (वय ६८) यांचे शनिवारी सकाळी आठ वाजता मुंबई येथे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. सिंधुदुर्गमधील हरकुळ खुर्द हे मूळ गाव असलेल्या जनार्दन परब यांनी मराठी रंगभूमी, चित्रपट, तसेच हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. लहानपणापासूनच जनार्दन परब यांना अभिनय कलेची आवड आणि जाण होती. संपूर्ण बालपण कोकणात तर महाविद्यालयीन शिक्षण आणि नोकरीसाठी ते मुंबईत दाखल झाले. तरुण वयातच ते एकांकीका आणि प्रायोगिक नाटकांशी जोडले गेले. नोकरी व शिक्षण सांभाळत आपल्या अभिनयाची हौस आणि आवड अगदी मनापासून जोपासली. विजया मेहतासारख्या नट मंडळींचे मार्गदर्शन याच काळात त्यांना लाभले. त्यांच्या प्रमुख नाटकांमध्ये ‘अवध्य’, ‘नकटीच्या लग्नाला’, ‘अजब न्याय वर्तुळाचा’, ‘हमिदाबाईची कोठी’, ‘रात्र थोडी सोंग फार’, ‘काका किशाचा’, ‘संगीत विद्याहरण’, ‘मुद्राराक्षस’ तर ‘धुमशान’, ‘नशिबवान खावचो घोव’, ‘कबूतरखाना’सारख्या मालवणी नाटकांमध्ये अभिनयासोबतच काही नाटकांची दिग्दर्शनाची देखील धुरा सांभाळली. अनेक हिंदी-मराठी चित्रपटातील भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. यामध्ये ‘माझा पती करोडपती’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘गम्मत जम्मत’, ‘कुलस्वामिनी तुळजाभवानी’ चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून, हिंदीत ‘कसम’, ‘शिकारी’, ‘ऐलान’, ‘जिद्दी’, ‘क्रांतीवीर’, ‘बाजीगर’, ‘नायक’, ‘गुलाम’, ‘उडान’, ‘चायना गेट’सारख्या चित्रपटांचा उल्लेख करता येईल. क्रांतिवीर चित्रपटातील त्यांचा आणि नाना पाटेकर यांचा प्रसंग आजही स्मरणात आहे. काही वर्षापूर्वी शारीरिक अस्वास्थ्यामुळे जनार्दन परब यांनी कला क्षेत्रापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता. पण दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी पुन:श्च या क्षेत्रात परतण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अनेक मालिका आणि चित्रपटांमधून भूमिकेच्या माध्यमातून ते आपल्याला दिसत राहिले. मालवणी रंगभूमीला त्यांनी दिलेलं योगदान वाखाणण्याजोगं आहे. नवीन विषय प्रेक्षकांसमोर मांडत, परब यांनी तरुण कलाकारांसोबत मालवणी रंगभूमी पुनर्जिवीत ठेवण्याचं कार्य केलेलं आहे. अनेक चित्रपटांमधून तसंच दूरचित्रवाणी मालिकांमधून चरित्र अभिनेता म्हणून त्यांचं काम दखल घेण्याजोगे आहे. जनार्दन परब यांनी चार दशकाहून अधिक काळ रंगभूमी व रुपेरी पडद्यासाठी स्वत:ला झोकून दिले. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना ‘शंकर घाणेकर पुरस्कार’, २००८ सालचा ‘नटवर्य केशवराव दाते पुरस्कार’ तसेच ‘कॉलेज साहित्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांच्या निधनाने नाट्य क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून आणि दोन नातू असा परिवार आहे. (प्रतिनिधी)