शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

चिरेखाण मालकांना चुना

By admin | Updated: November 16, 2015 23:59 IST

लांजा तालुका : मजूर पुरवण्याच्या आमिषाने फसवणूक

लांजा : चिरेखाणीवर मजूर आणून देतो, असे सांगून एक नव्हे तर तब्बल पाच व्यापाऱ्यांना १२ लाखांना चुना लावून पोबारा केलेल्या मुकादमाविरोधात व्यापाऱ्यांनी लांजा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.तालुक्यातील विविध गावांमध्ये चिरेखाणीचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना लक्ष्मण जानू राठोड या कर्नाटकातील मुकादमाने तब्बल १२ लाखाला चुना लावला आहे. याबाबत शनिवार व रविवार दोन दिवस शोध घेऊनही तो न सापडल्याने या व्यापाऱ्यांनी लांजा पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली आहे.लांजा तालुक्यात चिरेखाणींची संख्या जास्त आहे. मात्र त्यासाठी लागणारे कामगार वेळेवर मिळत नसल्याने कामगार बाहेरून आणावे लागतात. हीच संधी साधून राठोड याने चिरेखाणीसाठी कामगार पुरवण्याचे आमिष दाखवले आणि आपला हेतू साध्य करून घेतला. त्याने या कामगारांना आगाऊ रक्कम द्यायचे आहेत, असे सांगून पैसे उकळले आणि या मालकांकडून त्याने लाखो रुपये काढून घेतले.पैसे घेताना राठोड या मुकादमाने एकूण पाच व्यापाऱ्यांकडून २०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर गडीमाणसे पुरवण्याचा करार करून दिला आहे. एकासोबत करार करताना दुसऱ्या व्यापाऱ्याला याची काहीच खबर लागणार नाही याची दक्षता त्याने घेतली होती. मात्र, ज्यांच्याशी त्याने करार केले होते, ते मात्र संबधित मुकादम गडीमाणसे कधी आणणार? याची वाट पाहत होते. त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मोबाईल बंद होता. त्यामुळे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्यांनी आपल्या इतर व्यावसायिकांकडे लक्ष्मण राठोड याची चौकशी केली. त्यावेळी त्याने एक नव्हे तर तब्बल पाच व्यापाऱ्यांना गंडा घातल्याची घटना समोर आली.शनिवार १४ नोव्हेंबरपासून तालुक्यातील चिरेखाण व्यापारी आणि ठेकेदारांनी लक्ष्मण राठोड याची रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात शोधाशोध केली. मात्र तो सापडू शकला नाही. तो नेमका कुठला? हे कोणालाही माहीत नसल्याने त्याला शोधणाऱ्यांची दमछाक झाली आहे. कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्रातील अन्य चिरे व्यावसायिकांना मजूर पुरवणाऱ्या अन्य मुकादमांकडे चौकशी करण्यात आली. मात्र, त्याच्याबाबत काहीच थांगपत्ता लागू शकला नाही. याबाबत लांजा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)राजन साळवी : ...तर काम करू देणार नाहीपश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून गेली अनेक वर्ष कोकणात कामगार येतात. त्याना रोजगार मिळतो. मात्र, चिरेखाण मालकांकडून लाखो रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली जात असल्यास आम्ही गप्प बसणार नाही. चिरेखाण व्यावसायिकांना मजूर पुरवणाऱ्या मुकादमाने लांजा तालुक्यातील व्यापाऱ्यांकडून १२ लाखांची रक्कम घेऊन पळ काढला आहे. त्या व्यक्तीला शोधून आणले पाहिजे अन्यथा यापुढे लांजा, राजापूर भागात कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्रामधील कामगारांना काम करू देणार नाही, असा सज्जड इशारा आमदार राजन साळवी यांनी दिला आहे परप्रांतियांचे वर्चस्वचिरेखाण व्यवसायासाठी स्थानिक कामगार मिळत नसल्याने लांजा तालुक्यात परप्रांतिय कामगार आणावे लागत आहेत.