शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

चिरेखाण मालकांना चुना

By admin | Updated: November 16, 2015 23:59 IST

लांजा तालुका : मजूर पुरवण्याच्या आमिषाने फसवणूक

लांजा : चिरेखाणीवर मजूर आणून देतो, असे सांगून एक नव्हे तर तब्बल पाच व्यापाऱ्यांना १२ लाखांना चुना लावून पोबारा केलेल्या मुकादमाविरोधात व्यापाऱ्यांनी लांजा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.तालुक्यातील विविध गावांमध्ये चिरेखाणीचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना लक्ष्मण जानू राठोड या कर्नाटकातील मुकादमाने तब्बल १२ लाखाला चुना लावला आहे. याबाबत शनिवार व रविवार दोन दिवस शोध घेऊनही तो न सापडल्याने या व्यापाऱ्यांनी लांजा पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली आहे.लांजा तालुक्यात चिरेखाणींची संख्या जास्त आहे. मात्र त्यासाठी लागणारे कामगार वेळेवर मिळत नसल्याने कामगार बाहेरून आणावे लागतात. हीच संधी साधून राठोड याने चिरेखाणीसाठी कामगार पुरवण्याचे आमिष दाखवले आणि आपला हेतू साध्य करून घेतला. त्याने या कामगारांना आगाऊ रक्कम द्यायचे आहेत, असे सांगून पैसे उकळले आणि या मालकांकडून त्याने लाखो रुपये काढून घेतले.पैसे घेताना राठोड या मुकादमाने एकूण पाच व्यापाऱ्यांकडून २०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर गडीमाणसे पुरवण्याचा करार करून दिला आहे. एकासोबत करार करताना दुसऱ्या व्यापाऱ्याला याची काहीच खबर लागणार नाही याची दक्षता त्याने घेतली होती. मात्र, ज्यांच्याशी त्याने करार केले होते, ते मात्र संबधित मुकादम गडीमाणसे कधी आणणार? याची वाट पाहत होते. त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मोबाईल बंद होता. त्यामुळे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्यांनी आपल्या इतर व्यावसायिकांकडे लक्ष्मण राठोड याची चौकशी केली. त्यावेळी त्याने एक नव्हे तर तब्बल पाच व्यापाऱ्यांना गंडा घातल्याची घटना समोर आली.शनिवार १४ नोव्हेंबरपासून तालुक्यातील चिरेखाण व्यापारी आणि ठेकेदारांनी लक्ष्मण राठोड याची रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात शोधाशोध केली. मात्र तो सापडू शकला नाही. तो नेमका कुठला? हे कोणालाही माहीत नसल्याने त्याला शोधणाऱ्यांची दमछाक झाली आहे. कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्रातील अन्य चिरे व्यावसायिकांना मजूर पुरवणाऱ्या अन्य मुकादमांकडे चौकशी करण्यात आली. मात्र, त्याच्याबाबत काहीच थांगपत्ता लागू शकला नाही. याबाबत लांजा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)राजन साळवी : ...तर काम करू देणार नाहीपश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून गेली अनेक वर्ष कोकणात कामगार येतात. त्याना रोजगार मिळतो. मात्र, चिरेखाण मालकांकडून लाखो रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली जात असल्यास आम्ही गप्प बसणार नाही. चिरेखाण व्यावसायिकांना मजूर पुरवणाऱ्या मुकादमाने लांजा तालुक्यातील व्यापाऱ्यांकडून १२ लाखांची रक्कम घेऊन पळ काढला आहे. त्या व्यक्तीला शोधून आणले पाहिजे अन्यथा यापुढे लांजा, राजापूर भागात कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्रामधील कामगारांना काम करू देणार नाही, असा सज्जड इशारा आमदार राजन साळवी यांनी दिला आहे परप्रांतियांचे वर्चस्वचिरेखाण व्यवसायासाठी स्थानिक कामगार मिळत नसल्याने लांजा तालुक्यात परप्रांतिय कामगार आणावे लागत आहेत.