शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
अर्चना तिवारी चतुर निघाली!ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
3
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
4
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
5
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
6
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
8
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
9
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
10
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
11
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
13
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
14
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
15
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
16
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
17
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
18
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
19
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
20
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

चिरेखाण मालकांना चुना

By admin | Updated: November 16, 2015 23:59 IST

लांजा तालुका : मजूर पुरवण्याच्या आमिषाने फसवणूक

लांजा : चिरेखाणीवर मजूर आणून देतो, असे सांगून एक नव्हे तर तब्बल पाच व्यापाऱ्यांना १२ लाखांना चुना लावून पोबारा केलेल्या मुकादमाविरोधात व्यापाऱ्यांनी लांजा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.तालुक्यातील विविध गावांमध्ये चिरेखाणीचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना लक्ष्मण जानू राठोड या कर्नाटकातील मुकादमाने तब्बल १२ लाखाला चुना लावला आहे. याबाबत शनिवार व रविवार दोन दिवस शोध घेऊनही तो न सापडल्याने या व्यापाऱ्यांनी लांजा पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली आहे.लांजा तालुक्यात चिरेखाणींची संख्या जास्त आहे. मात्र त्यासाठी लागणारे कामगार वेळेवर मिळत नसल्याने कामगार बाहेरून आणावे लागतात. हीच संधी साधून राठोड याने चिरेखाणीसाठी कामगार पुरवण्याचे आमिष दाखवले आणि आपला हेतू साध्य करून घेतला. त्याने या कामगारांना आगाऊ रक्कम द्यायचे आहेत, असे सांगून पैसे उकळले आणि या मालकांकडून त्याने लाखो रुपये काढून घेतले.पैसे घेताना राठोड या मुकादमाने एकूण पाच व्यापाऱ्यांकडून २०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर गडीमाणसे पुरवण्याचा करार करून दिला आहे. एकासोबत करार करताना दुसऱ्या व्यापाऱ्याला याची काहीच खबर लागणार नाही याची दक्षता त्याने घेतली होती. मात्र, ज्यांच्याशी त्याने करार केले होते, ते मात्र संबधित मुकादम गडीमाणसे कधी आणणार? याची वाट पाहत होते. त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मोबाईल बंद होता. त्यामुळे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्यांनी आपल्या इतर व्यावसायिकांकडे लक्ष्मण राठोड याची चौकशी केली. त्यावेळी त्याने एक नव्हे तर तब्बल पाच व्यापाऱ्यांना गंडा घातल्याची घटना समोर आली.शनिवार १४ नोव्हेंबरपासून तालुक्यातील चिरेखाण व्यापारी आणि ठेकेदारांनी लक्ष्मण राठोड याची रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात शोधाशोध केली. मात्र तो सापडू शकला नाही. तो नेमका कुठला? हे कोणालाही माहीत नसल्याने त्याला शोधणाऱ्यांची दमछाक झाली आहे. कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्रातील अन्य चिरे व्यावसायिकांना मजूर पुरवणाऱ्या अन्य मुकादमांकडे चौकशी करण्यात आली. मात्र, त्याच्याबाबत काहीच थांगपत्ता लागू शकला नाही. याबाबत लांजा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)राजन साळवी : ...तर काम करू देणार नाहीपश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून गेली अनेक वर्ष कोकणात कामगार येतात. त्याना रोजगार मिळतो. मात्र, चिरेखाण मालकांकडून लाखो रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली जात असल्यास आम्ही गप्प बसणार नाही. चिरेखाण व्यावसायिकांना मजूर पुरवणाऱ्या मुकादमाने लांजा तालुक्यातील व्यापाऱ्यांकडून १२ लाखांची रक्कम घेऊन पळ काढला आहे. त्या व्यक्तीला शोधून आणले पाहिजे अन्यथा यापुढे लांजा, राजापूर भागात कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्रामधील कामगारांना काम करू देणार नाही, असा सज्जड इशारा आमदार राजन साळवी यांनी दिला आहे परप्रांतियांचे वर्चस्वचिरेखाण व्यवसायासाठी स्थानिक कामगार मिळत नसल्याने लांजा तालुक्यात परप्रांतिय कामगार आणावे लागत आहेत.