शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

बाल साहित्य संमेलन-

By admin | Updated: December 16, 2014 00:19 IST

फेरफटका--वृंदा कांबळी

आज वर्तमानपत्रात दापोलीत झालेल्या बालसाहित्य संमेलनाची बातमी वाचनात आली. मी शाळेत सेवेत असताना काव्य वाचनासारखे कार्यक्रम शाळा पातळीवर आयोजित करीत असे. त्याची आठवण झाली. साहित्याविषयी अभिरू ची निर्माण करण्यासाठी मुलांपासूनच सुरुवात करायला हवी, परंतु शाळेतील एकूण दिनक्रम, तेथील यंत्रणा या सर्वांत व्यापक पातळीवर ते करता येणे कधी कधी अडचणीचे होते. त्यासाठी अशाप्रकारे सामाजिक संस्थांचाही सहभाग त्यात असणे गरजेचे आहे. मुलांबरोबर पालकही उपस्थित राहतात. त्यामुळे त्या कार्यक्रमाला भव्य स्वरूप होते. मुलांना व्यासपीठ मिळाल्यामुळे त्यांना प्रेरणा मिळते. ती मुलं आवडीने काही वाचू लागतात. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी करावयाच्या अनेक प्रयत्नांपैकी बाल साहित्य संमेलने भरवणे हाही एक प्रभावी प्रयत्न आहे. मागील वर्षी बांदा शिक्षण प्रसारक मंडळात असलेल्या बालसाहित्य संमेलनाच्या प्रथेविषयी मी लिहिले होतेच. शाळेच्या संस्थाचालकांनी अशा प्रकारच्या दृष्टिकोनातून विचार करणे हे खूप महत्त्वाचे आहे आणि आज ते गरजेचे आहे. अशा मनाला आश्वासक दिलासा व आनंद देणाऱ्या घटना घडत आहेत. अनेक ठिकाणी संवेदनशीलतेने प्राप्त परिस्थितीचा विचार केला जातोय.जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा देवसू शाळेतील शिक्षक मनोहर परब यांनी केलेला काव्यसंग्रह प्रकाशित करण्याचा उपक्रम असाच अत्यंत स्तुत्य आहे. त्यांनी शाळेतील मुलांनी स्वत: केलेल्या कवितांचा ‘ऊब’ नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित केला. त्या उपक्रमामध्ये मुख्याध्यापक, पालक, गटशिक्षणाधिकारी या सर्वांचे सहकार्य लाभले. सर्वांचे सहकार्य मिळविणे हे एक कौशल्य असते, पण उपक्रम कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक सहकार्य मिळविण्याचे कौशल्य कमी पडते आणि चांगले उपक्रमही दुर्लक्षित राहतात. पण श्री. मनोहर परब यांंनी आपली कल्पना साकार करण्यासाठी सर्वांचे अपेक्षित सहकार्य मिळविले. सर्वांच्या सहकार्याच्या समन्वयातून साकारला सुरेख असा ‘ऊब’ हा काव्यसंग्रह. पुस्तकाचे मुखपृष्ठही आकर्षक आणि सूचक आहे. काटक्यांनी बांधलेल्या घरामध्ये अंड्यातून बाहेर पडलेली, पंख न फुटलेली पिल्ली आहेत. त्यांना पक्षीण आपल्या पंखांची ऊब देत आहे. तशीच लहान मुलांना अशा उपक्रमातून ममतेची, संस्काराची ऊब द्यावयाची आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये या दृष्टीने विचार करणारी माणसे हवी आहेत. नाहीतर काही मोजके शिक्षक या दृष्टीने विचार करीत असताना एकटे पडतात किंवा भोवतालच्या लोकांच्या विरोधात गराड्यात त्यांचा एकाकी विचार अभिमन्यू होतो. तसं व्हायला नको असेल, तर अशा उपक्रमशील शिक्षकांना समाजातील अन्य घटकांनीही प्रोत्साहन देण्याची गरज आहे. देवसू गावातील ग्रामस्थांनी या दृष्टीने चांगला आदर्श ठेवला आहे. धडपडणाऱ्या शिक्षकांच्या मनातील उर्मी, प्रोत्साहनाअभावी वाळूतील पाण्याच्या धारेप्रमाणे विरून जाता नये. ती जिवंत ठेवली पाहिजे. श्री. मनोहर परब यांच्यासारखे उपक्रमशील शिक्षक असतील त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली पाहिजे आणि त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य दिले पाहिजे. लहान मुलांना साहित्यातून संस्कार, विचार देणे गरजेचे आहे. समाजाच्या विकासाला पोषक अशी विचारांची बैठक त्यांची आतापासूनच तयार झाली पाहिजे. त्यासाठी ‘साहित्य’ हे प्रभावी माध्यम आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांसाठी साहित्यिक उपक्रम राबविले गेले पाहिजेत. विविध उपक्रमांच्या माध्यमातून मुलांमध्ये साहित्यिक अभिरूची निर्माण केली पाहिजे. बालसाहित्य संमेलन, मुलांचे काव्यसंग्रह अशा प्रकारच्या तुरळक घटना घडत असतात. त्या वाढल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांवर संस्कार करणारे असे उपक्रम बळकट केले पाहिजेत. गावोगावी बालसाहित्य संमेलनांसारखे कार्यक्रम राबवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य घडले पाहिजे. त्यासाठी शासन, अधिकारी वर्ग व समाज यांचे एकमेकांना सहकार्य हवे.(लेखिका साहित्यिका आहेत.)