शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

मुख्यमंत्र्यांची सभा म्हणजे ‘फ्लॉप शो’

By admin | Updated: February 15, 2017 23:07 IST

नीतेश राणे यांची टीका : केवळ अडीच हजारांची उपस्थिती अपमानास्पद बाब

कुडाळ : मुख्यमंत्र्यांच्या सभेला सिंधुदुर्गातील भाजपमार्फत केवळ अडीच हजारांची उपस्थिती म्हणजे पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा केलेला अपमान आहे. ही सभा म्हणजे भाजपचा फ्लॉपशो असल्याची टीका काँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी केली. तसेच जाहीर सभा कशी घ्यायची असते, हे शिकण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कुडाळ येथे १७ फेबु्रवारी रोजीच्या काँग्रेस प्रचार सभेला यावे, आम्ही जागा ठेवू, असा सणसणीत टोलाही त्यांनी भाजपला लगावला.कुडाळ येथे काँग्रेसचे आमदार नीतेश राणे व जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांच्या सभेतील उपस्थिती आणि काँग्रेसच्या सभेची माहिती दिली. यावेळी कुडाळ तालुकाध्यक्ष सतीश साळगावकर, उपतालुकाध्यक्ष सुनील भोगटे, नगराध्यक्ष विनायक राणे, उपनगराध्यक्ष अनंत धडाम, नगरसेवक सुनील बांदेकर, नगरसेविका संध्या तेरसे, साक्षी सावंत, सुप्रिया मांजरेकर, सरोज जाधव, राकेश कांदे व काँग्रेसचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी नीतेश राणे म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री राज्यातील भाजपचे प्रमुख चेहरा आहेत. अशावेळी त्यांच्या जाहीर सभेला केवळ अडीच हजारच माणसे उपस्थित राहिली, हे चित्र जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची वास्तव अवस्था दर्शविणारे आहे. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांसह भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी आत्मचिंतन करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.यावेळी दत्ता सामंत म्हणाले, १७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता काँग्रेसची जाहीर सभा होणार आहे. या सभेत माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते नारायण राणे, माजी खासदार नीलेश राणे, आमदार नीतेश राणे हे मार्गदर्शन करणार असून, जिल्ह्यातील पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. दोन वर्षांपूर्वी मालवण येथे केलेलेच भाषण भाजपच्या सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा केले. शिवाय त्यांनी जिल्ह्यातील कोणत्याच प्रश्नाबाबत भाषणातून मत व्यक्त केले नाही, त्यामुळे जिल्हा विकासाचे व्हिजन कसे असेल, याची प्रचितीही दिली. माजी मुख्यमंत्री नारायण राणेंवर खोटेनाटे आरोप करून खासदार, आमदार, पालकमंत्री झालेल्यांनी कोणताच विकास केला नाही. खासदारांनी तर ‘खंबाटा’ प्रकरणात ४०० कोटी रूपयांचा भ्रष्टाचार करून कामगारांना देशोधडीला लावले. आता या निवडणुकीत जनता केलेली चूक सुधारणार असून काँग्रेसच्या पाठिशी भक्कम उभी राहणार आहे, असे सांगत या सभेत काँग्रेसचा जाहीरनामाही प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.भाजपच्या सभेची वेळ होऊन देखील सभेला कोणीच नसल्यामुळे चक्क मुख्यमंत्र्यांना पाऊण तास थांबावे लागले. जे पदाधिकारी सभेला माणसे आणू शकत नाहीत, ते मतदानासाठी कसे आकर्षित करणार? याचाही विचार भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी करावा, असेही नीतेश राणे यांनी यावेळी सुचविले. (प्रतिनिधी)