शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

मुख्यमंत्र्यांची सभा म्हणजे ‘फ्लॉप शो’

By admin | Updated: February 15, 2017 23:07 IST

नीतेश राणे यांची टीका : केवळ अडीच हजारांची उपस्थिती अपमानास्पद बाब

कुडाळ : मुख्यमंत्र्यांच्या सभेला सिंधुदुर्गातील भाजपमार्फत केवळ अडीच हजारांची उपस्थिती म्हणजे पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा केलेला अपमान आहे. ही सभा म्हणजे भाजपचा फ्लॉपशो असल्याची टीका काँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी केली. तसेच जाहीर सभा कशी घ्यायची असते, हे शिकण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कुडाळ येथे १७ फेबु्रवारी रोजीच्या काँग्रेस प्रचार सभेला यावे, आम्ही जागा ठेवू, असा सणसणीत टोलाही त्यांनी भाजपला लगावला.कुडाळ येथे काँग्रेसचे आमदार नीतेश राणे व जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांच्या सभेतील उपस्थिती आणि काँग्रेसच्या सभेची माहिती दिली. यावेळी कुडाळ तालुकाध्यक्ष सतीश साळगावकर, उपतालुकाध्यक्ष सुनील भोगटे, नगराध्यक्ष विनायक राणे, उपनगराध्यक्ष अनंत धडाम, नगरसेवक सुनील बांदेकर, नगरसेविका संध्या तेरसे, साक्षी सावंत, सुप्रिया मांजरेकर, सरोज जाधव, राकेश कांदे व काँग्रेसचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी नीतेश राणे म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री राज्यातील भाजपचे प्रमुख चेहरा आहेत. अशावेळी त्यांच्या जाहीर सभेला केवळ अडीच हजारच माणसे उपस्थित राहिली, हे चित्र जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची वास्तव अवस्था दर्शविणारे आहे. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांसह भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी आत्मचिंतन करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.यावेळी दत्ता सामंत म्हणाले, १७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता काँग्रेसची जाहीर सभा होणार आहे. या सभेत माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते नारायण राणे, माजी खासदार नीलेश राणे, आमदार नीतेश राणे हे मार्गदर्शन करणार असून, जिल्ह्यातील पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. दोन वर्षांपूर्वी मालवण येथे केलेलेच भाषण भाजपच्या सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा केले. शिवाय त्यांनी जिल्ह्यातील कोणत्याच प्रश्नाबाबत भाषणातून मत व्यक्त केले नाही, त्यामुळे जिल्हा विकासाचे व्हिजन कसे असेल, याची प्रचितीही दिली. माजी मुख्यमंत्री नारायण राणेंवर खोटेनाटे आरोप करून खासदार, आमदार, पालकमंत्री झालेल्यांनी कोणताच विकास केला नाही. खासदारांनी तर ‘खंबाटा’ प्रकरणात ४०० कोटी रूपयांचा भ्रष्टाचार करून कामगारांना देशोधडीला लावले. आता या निवडणुकीत जनता केलेली चूक सुधारणार असून काँग्रेसच्या पाठिशी भक्कम उभी राहणार आहे, असे सांगत या सभेत काँग्रेसचा जाहीरनामाही प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.भाजपच्या सभेची वेळ होऊन देखील सभेला कोणीच नसल्यामुळे चक्क मुख्यमंत्र्यांना पाऊण तास थांबावे लागले. जे पदाधिकारी सभेला माणसे आणू शकत नाहीत, ते मतदानासाठी कसे आकर्षित करणार? याचाही विचार भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी करावा, असेही नीतेश राणे यांनी यावेळी सुचविले. (प्रतिनिधी)