शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

मुख्यमंत्र्यांची सभा म्हणजे ‘फ्लॉप शो’

By admin | Updated: February 15, 2017 23:07 IST

नीतेश राणे यांची टीका : केवळ अडीच हजारांची उपस्थिती अपमानास्पद बाब

कुडाळ : मुख्यमंत्र्यांच्या सभेला सिंधुदुर्गातील भाजपमार्फत केवळ अडीच हजारांची उपस्थिती म्हणजे पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा केलेला अपमान आहे. ही सभा म्हणजे भाजपचा फ्लॉपशो असल्याची टीका काँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी केली. तसेच जाहीर सभा कशी घ्यायची असते, हे शिकण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कुडाळ येथे १७ फेबु्रवारी रोजीच्या काँग्रेस प्रचार सभेला यावे, आम्ही जागा ठेवू, असा सणसणीत टोलाही त्यांनी भाजपला लगावला.कुडाळ येथे काँग्रेसचे आमदार नीतेश राणे व जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांच्या सभेतील उपस्थिती आणि काँग्रेसच्या सभेची माहिती दिली. यावेळी कुडाळ तालुकाध्यक्ष सतीश साळगावकर, उपतालुकाध्यक्ष सुनील भोगटे, नगराध्यक्ष विनायक राणे, उपनगराध्यक्ष अनंत धडाम, नगरसेवक सुनील बांदेकर, नगरसेविका संध्या तेरसे, साक्षी सावंत, सुप्रिया मांजरेकर, सरोज जाधव, राकेश कांदे व काँग्रेसचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी नीतेश राणे म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री राज्यातील भाजपचे प्रमुख चेहरा आहेत. अशावेळी त्यांच्या जाहीर सभेला केवळ अडीच हजारच माणसे उपस्थित राहिली, हे चित्र जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची वास्तव अवस्था दर्शविणारे आहे. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांसह भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी आत्मचिंतन करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.यावेळी दत्ता सामंत म्हणाले, १७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता काँग्रेसची जाहीर सभा होणार आहे. या सभेत माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते नारायण राणे, माजी खासदार नीलेश राणे, आमदार नीतेश राणे हे मार्गदर्शन करणार असून, जिल्ह्यातील पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. दोन वर्षांपूर्वी मालवण येथे केलेलेच भाषण भाजपच्या सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा केले. शिवाय त्यांनी जिल्ह्यातील कोणत्याच प्रश्नाबाबत भाषणातून मत व्यक्त केले नाही, त्यामुळे जिल्हा विकासाचे व्हिजन कसे असेल, याची प्रचितीही दिली. माजी मुख्यमंत्री नारायण राणेंवर खोटेनाटे आरोप करून खासदार, आमदार, पालकमंत्री झालेल्यांनी कोणताच विकास केला नाही. खासदारांनी तर ‘खंबाटा’ प्रकरणात ४०० कोटी रूपयांचा भ्रष्टाचार करून कामगारांना देशोधडीला लावले. आता या निवडणुकीत जनता केलेली चूक सुधारणार असून काँग्रेसच्या पाठिशी भक्कम उभी राहणार आहे, असे सांगत या सभेत काँग्रेसचा जाहीरनामाही प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.भाजपच्या सभेची वेळ होऊन देखील सभेला कोणीच नसल्यामुळे चक्क मुख्यमंत्र्यांना पाऊण तास थांबावे लागले. जे पदाधिकारी सभेला माणसे आणू शकत नाहीत, ते मतदानासाठी कसे आकर्षित करणार? याचाही विचार भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी करावा, असेही नीतेश राणे यांनी यावेळी सुचविले. (प्रतिनिधी)