शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेने जिल्ह्यात पर्यटनाला मिळणार उभारी...!

By admin | Updated: April 13, 2016 00:11 IST

--रत्नागिरी पर्यटन विकास

प्रकाश वराडकर ल्ल रत्नागिरीकोकणसाठी स्वतंत्र पर्यटन विकास महामंडळ स्थापन करण्यासह रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांच्या पर्यटन विकासावर ३ हजार ५५ कोटी रुपये खर्च करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत केली. त्यामुळे कोकणात बहरणाऱ्या पर्यटन व्यवसायाला आणखी उभारी मिळणार आहे. कोकणची अर्थव्यवस्थाच पर्यटनातून उभी राहणार असून, पर्यटनात प्रतिगोवा, प्रतिकेरळ असे स्वरूप प्राप्त होण्याची आशा पल्लवित झाली आहे. दोन दशकांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री असताना सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा, तर रत्नागिरी फलोद्यान जिल्हा म्हणून घोषित करून येथील पर्यटन विकासाला चालना देण्याचे पहिले पाऊल उचलले होेते. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही वर्षात पर्यटन विकास मोठ्या प्रमाणावर झाला आहे. गोव्याकडील पर्यटक मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळांकडे वळला आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातही पर्यटन व्यवसायाची मोठी क्षमता असताना रत्नागिरीला पर्यटन जिल्ह्याचा दर्जा मिळाला नव्हता. मुंबई व कोकणाविषयीच्या सोमवारी विधानसभेत झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोकणसाठी स्वतंत्र पर्यटन विकास महामंडळ, रत्नागिरी व सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाकरिता एशियन डेव्हलपमेंट बॅँकेचे सहकार्य घेतले जाणार असून, ३ हजार ५५ कोटींचा आराखडा या बॅँकेकडे लवकरच सादर केला जाणार आहे. कोकण पर्यटन विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. स्वतंत्र पर्यटन विकास मंडळासाठी स्वतंत्र सनदी अधिकारी नियुक्त करण्याची आमदार भास्कर जाधव यांची मागणीही त्यांनी मान्य केली. कोकण पर्यटन महामंडळाची घोषणा चांगली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या अन्य घोषणाही चांगल्या आहेत. त्यामुळे या घोषणांचे स्वागत आहे. कोकणला निसर्गदत्त सौंदर्याची देणगी लाभली आहे. लोभस सागरी किनाऱ्याचे वरदान आहे. त्यामुळे रत्नागिरी व सिंधुदुर्गसह कोकणच्या पर्यटनाचा विकास करणाऱ्या या घोषणा नक्कीच चांगल्या आहेत. शासन याबाबत स्वत: बोलते आहे. परंतु आर्थिक बाबतीत गेल्या काही दिवसात सरकारचे प्रतिनिधी ज्याप्रकारे भाष्य करीत आहेत ते पाहता पर्यटन विकासाबाबत केलेल्या या घोषणाच चांगल्या आहेत, असे म्हणण्याची वेळ हे सरकार कोकणवासीयांवर येऊ देणार नाही, अशी आशा करायला हरकत नाही. प्रश्न असा आहे की, या पर्यटन विकासासाठी अर्थसंकल्पीय तरतूद असते. कागदावर व प्रत्यक्षात त्यामध्ये तफावत नको. हॉटेल्सनाही उद्योगाचा दर्जा हवा. - रमेश कीर, कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष, कोकण म्हाडाचे माजी अध्यक्षफडणवीस सरकारने कोकण पर्यटन विकासाबाबत जे निर्णय घेतले आहेत ते अत्यंत सकारात्मक असून, कोकणचा कायापालट होईल. त्यातून रोजगार निर्मिती होणार आहे. ग्रीन रिफायनरीही प्रदूषणमुक्त असेल. स्वतंत्र पर्यटन महामंडळ उपक्रम वेगाने राबवेल व भाजप सरकार कोकणला वरदान ठरेल. - सचिन वहाळकर, भाजप माजी जिल्हाध्यक्ष, रत्नागिरी. रत्नागिरीतील तटरक्षक दलाच्या विमानतळाचा विस्तार केला जाणार असून, विमानतळ व्यावसायिक तत्त्वावर चालवला जाणार आहे. तेथे रात्रीही प्रवासी विमाने उतरू शकतील, अशी व्यवस्था केली जाणार आहे. स्वदेश दर्शनांतर्गत योजनेतून विजयदुर्गसह ९ ठिकाणी पर्यटक निवास उभारले जाणार आहेत. चिपी विमानतळ विकसित होणार आहे. मालवण तालुक्यातील सी वर्ल्ड हा प्रकल्प ३५० एकरात उभारला जाणार आहे. कोकण पर्यटन विकासासाठी ज्या काही घोषणा केल्या आहेत, त्यांची अंमलबजावणी योग्यरित्या व निर्धारित कालावधीत झाल्यास पर्यटन विकासात पिछाडीवर असलेल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्यटन व्यवसायाला उभारी मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.