शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेने जिल्ह्यात पर्यटनाला मिळणार उभारी...!

By admin | Updated: April 13, 2016 00:11 IST

--रत्नागिरी पर्यटन विकास

प्रकाश वराडकर ल्ल रत्नागिरीकोकणसाठी स्वतंत्र पर्यटन विकास महामंडळ स्थापन करण्यासह रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांच्या पर्यटन विकासावर ३ हजार ५५ कोटी रुपये खर्च करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत केली. त्यामुळे कोकणात बहरणाऱ्या पर्यटन व्यवसायाला आणखी उभारी मिळणार आहे. कोकणची अर्थव्यवस्थाच पर्यटनातून उभी राहणार असून, पर्यटनात प्रतिगोवा, प्रतिकेरळ असे स्वरूप प्राप्त होण्याची आशा पल्लवित झाली आहे. दोन दशकांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री असताना सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा, तर रत्नागिरी फलोद्यान जिल्हा म्हणून घोषित करून येथील पर्यटन विकासाला चालना देण्याचे पहिले पाऊल उचलले होेते. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही वर्षात पर्यटन विकास मोठ्या प्रमाणावर झाला आहे. गोव्याकडील पर्यटक मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळांकडे वळला आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातही पर्यटन व्यवसायाची मोठी क्षमता असताना रत्नागिरीला पर्यटन जिल्ह्याचा दर्जा मिळाला नव्हता. मुंबई व कोकणाविषयीच्या सोमवारी विधानसभेत झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोकणसाठी स्वतंत्र पर्यटन विकास महामंडळ, रत्नागिरी व सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाकरिता एशियन डेव्हलपमेंट बॅँकेचे सहकार्य घेतले जाणार असून, ३ हजार ५५ कोटींचा आराखडा या बॅँकेकडे लवकरच सादर केला जाणार आहे. कोकण पर्यटन विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. स्वतंत्र पर्यटन विकास मंडळासाठी स्वतंत्र सनदी अधिकारी नियुक्त करण्याची आमदार भास्कर जाधव यांची मागणीही त्यांनी मान्य केली. कोकण पर्यटन महामंडळाची घोषणा चांगली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या अन्य घोषणाही चांगल्या आहेत. त्यामुळे या घोषणांचे स्वागत आहे. कोकणला निसर्गदत्त सौंदर्याची देणगी लाभली आहे. लोभस सागरी किनाऱ्याचे वरदान आहे. त्यामुळे रत्नागिरी व सिंधुदुर्गसह कोकणच्या पर्यटनाचा विकास करणाऱ्या या घोषणा नक्कीच चांगल्या आहेत. शासन याबाबत स्वत: बोलते आहे. परंतु आर्थिक बाबतीत गेल्या काही दिवसात सरकारचे प्रतिनिधी ज्याप्रकारे भाष्य करीत आहेत ते पाहता पर्यटन विकासाबाबत केलेल्या या घोषणाच चांगल्या आहेत, असे म्हणण्याची वेळ हे सरकार कोकणवासीयांवर येऊ देणार नाही, अशी आशा करायला हरकत नाही. प्रश्न असा आहे की, या पर्यटन विकासासाठी अर्थसंकल्पीय तरतूद असते. कागदावर व प्रत्यक्षात त्यामध्ये तफावत नको. हॉटेल्सनाही उद्योगाचा दर्जा हवा. - रमेश कीर, कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष, कोकण म्हाडाचे माजी अध्यक्षफडणवीस सरकारने कोकण पर्यटन विकासाबाबत जे निर्णय घेतले आहेत ते अत्यंत सकारात्मक असून, कोकणचा कायापालट होईल. त्यातून रोजगार निर्मिती होणार आहे. ग्रीन रिफायनरीही प्रदूषणमुक्त असेल. स्वतंत्र पर्यटन महामंडळ उपक्रम वेगाने राबवेल व भाजप सरकार कोकणला वरदान ठरेल. - सचिन वहाळकर, भाजप माजी जिल्हाध्यक्ष, रत्नागिरी. रत्नागिरीतील तटरक्षक दलाच्या विमानतळाचा विस्तार केला जाणार असून, विमानतळ व्यावसायिक तत्त्वावर चालवला जाणार आहे. तेथे रात्रीही प्रवासी विमाने उतरू शकतील, अशी व्यवस्था केली जाणार आहे. स्वदेश दर्शनांतर्गत योजनेतून विजयदुर्गसह ९ ठिकाणी पर्यटक निवास उभारले जाणार आहेत. चिपी विमानतळ विकसित होणार आहे. मालवण तालुक्यातील सी वर्ल्ड हा प्रकल्प ३५० एकरात उभारला जाणार आहे. कोकण पर्यटन विकासासाठी ज्या काही घोषणा केल्या आहेत, त्यांची अंमलबजावणी योग्यरित्या व निर्धारित कालावधीत झाल्यास पर्यटन विकासात पिछाडीवर असलेल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्यटन व्यवसायाला उभारी मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.