शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
3
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
4
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
5
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
6
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
7
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
8
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
9
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
10
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
11
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
12
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
13
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
14
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
15
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
16
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
17
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
18
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
19
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
20
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
Daily Top 2Weekly Top 5

पाणी योजना शुभारंभासाठी मुख्यमंत्री १५ला रत्नागिरीत

By admin | Updated: October 7, 2016 23:51 IST

बाळ माने : नगराध्यक्ष पदाचा उमेदवार प्रदेशाध्यक्ष निवडणार

रत्नागिरी : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानअंतर्गत शासनाकडून मंजुरी मिळालेल्या रत्नागिरी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा प्रकल्पाचा आरंभ १५ आॅक्टोबर २०१६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होेणार आहे. ६२ कोटी ९ हजार २६२ रुपये खर्चाची ही योजना आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र तथा बाळ माने यांनी आज (शुक्रवारी) ही माहिती दिली.भाजपच्या जिल्हा संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत माने बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश शेवडे, अन्य पदाधिकारी तसेच नगरसेवक उपस्थित होते. २०११च्या नगरपरिषद निवडणुकीत सेना-भाजप युतीतर्फे जनतेला पाणीपुरवठा योजना आणण्याबाबत शब्द देण्यात आला होता. सेनेचे मिलिंद कीर यांनी नगराध्यक्ष असताना शहर विकास आराखड्याला चालना दिली. भाजपचे त्यानंतरचे नगराध्यक्ष अशोक मयेकर व विद्यमान नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी या योजनेचा पाठपुरावा केला, असेही माने म्हणाले. १५ आॅक्टोबरला मुख्यमंत्री फडणवीस हे नाणीजला कार्यक्रमासाठी येणार आहेत. याच दौऱ्यात रत्नागिरीच्या या पाणी पुरवठा प्रकल्पाचा आरंभ त्यांच्या हस्ते केला जाणार आहे. येत्या चार ते पाच दिवसात या योजनेची प्रक्रिया सुरू होईल व लवकरात लवकर ही योजना पूर्ण केली जाईल. ही योजना केवळ कागदावर नाही तर आता त्यासाठी निधीही मंजूर झाला आहे. रत्नागिरीकरांची पाणी समस्या सोडविण्याबाबत गेल्या काही वर्षात केवळ घोषणा झाल्या. कोटीच्या कोटी उड्डाणे झाली. मात्र, तत्कालिन सत्ताधाऱ्यांना हा प्रश्न सोडविता आला नाही. १७ जानेवारी २०१६ रोजी मुख्यमंत्री फडणवीस हे पेजे न्यासाच्या कार्यक्रमासाठी रत्नागिरीत आले होते. त्यावेळी या योजनेची मागणी केली होती. त्यांनी योजना मंजूर करण्याचा शब्द दिला होता. प्रकल्प मंजुरीमुळे तो शब्द पूर्ण झाला आहे, असे माने म्हणाले. येत्या दिवाळीपर्यंत रत्नागिरी शहरात योग्य दाबाने पाणीपुरवठा होईल. मारुती मंदिर, माळनाका व अन्य भागातही योग्य दाबाने नळ जोडण्यांना पाणी येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहरातील सांडपाणी वहन यंत्रणा अयोग्य असल्याने भुयारी गटार योजनेच्या ६० कोटींच्या प्रस्तावाला लवकरच मान्यता मिळेल. ही योजनाही २०१७मध्ये पूर्ण होईल. पाणी योजनेच्या मंजुरीअभावी भुयारी गटार योजनेचे काम रखडले होते. आता हे काम पूर्ण होईल. रत्नागिरी शहरात वायफाय सेवा सुरू करण्याचा विचार आहे. शहरातील रस्तेही सिमेंट कॉँक्रीटचे केले जातील. येत्या तीन वर्षात रत्नागिरी हे देशातील ‘स्मार्ट शहर’ बनविण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला. ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी व अन्य विकासकामांसाठी ११० कोटी खर्चाचा ग्रामीण विकास आराखडा तयार आहे. जिल्हा परिषदेतर्फे ही कामे केली जाणार आहेत. पूर्वीच्या पालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या काळात विकासकामे ठप्प झाली होती. काही ठराविक लोकांनाच कामाच्या निविदा दिल्या जात होत्या. ठराविक ठेकेदारांकडून दुसऱ्या ठेकेदारांना निविदा भरू नका, अशी दादागिरी व्हायची. आता राज्यातील सत्ता बदलली आहे. रत्नागिरीतील ठेकेदारांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे, दादागिरी संपली आहे, त्यामुळे विकासकामेही लवकर होतील, असे माने म्हणाले. नगर परिषदेसाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांचे अर्ज स्वीकारले जात आहेत. थेट नगराध्यक्षपदासाठीही उमेदवारी अर्ज आले आहेत. नगराध्यक्षपदासाठी जे अर्ज येतील, ती यादी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे पाठविली जाईल. दानवे हेच अंतिम नाव निश्चित करणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. (प्रतिनिधी)८ रोजी चिपळुणात बैठकनगरसेवकपदाची उमेदवारी कोणाला द्यावी, याबाबतचा निर्णय भाजपची जिल्हा निवडणूक समिती घेणार आहे. या समितीमध्ये माजी आमदार विनय नातू, माजी आमदार राजन तेली, नाना शिंदे यांच्यासह १५ जणांचा समावेश आहे. ८ आॅक्टोबरला चिपळूणमध्ये या समितीची बैठक होत आहे.अशोक मयेकर गैरहजररत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर हे पत्रकारपरिषदेला अनुपस्थित होते. याबाबत विचारता अशोक मयेकर पावस किंवा मिरजोळे जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविणार असल्याचे सांगत ते नगराध्यक्षपद उमेदवारीच्या शर्यतीत नसल्याचे बाळ माने यांनी अप्रत्यक्षरित्या स्पष्ट केले. मात्र, अशोक मयेकर हे नगराध्यक्ष उमेदवारीसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे.