शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

बालेकिल्ल्यात सेनेला कडवे आव्हान

By admin | Updated: September 23, 2014 00:17 IST

पक्षातील नाराज गटाबरोबरच विरोधकांचा सामना करावा लागणार

शिवाजी गोरे -दापोली-- दापोली तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गेली २५ वर्षे शिवसेनेचे आमदार सूर्यकांत दळवी या मतदारसंघात निवडून येत आहेत. यावेळी ते षटकार मारण्यासाठी इच्छुक आहेत. परंतु यावेळी त्यांना पक्षातील नाराज गटाबरोबरच विरोधकांचा सामना करावा लागणार असल्याने शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच विजयासाठी त्यांना यावेळी कसरत करावी लागणार आहे.दापोली तालुका हा कधी काळी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. परंतु १९९०च्या निवडणुकीत विद्या बेलोसे या काँग्रेसच्या उमेदवाराविरोधात अ‍ॅड. बाळ बेलोसे यांनी बंडखोरी केली. पती- पत्नीच्या वादात शिवसेनेला लॉटरी लागली. तेव्हापासून आजतागायत शिवसेनेने पराभव पत्करला नाही. सलग पाचवेळा दापोली विधानसभा मतदारसंघातून आमदार सूर्यकांत दळवी विजयी होत गेले. आता षटकार मारण्याच्या तयारीत असतानाच पक्षातून बाहेर पडलेले राष्ट्रवादीचे संजय कदम, किशोर देसाई, मनसेचे वैभव खेडेकर यांनी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. आमदार दळवी यांना या निवडणुकीत पक्षातून बाहेर पडलेल्या एकेकाळच्या सहकाऱ्यांशी सामना करायचाच आहे, त्याचबरोबर पक्षातील नाराज गटावरसुद्धा मात करावी लागेल. पक्षाची निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे हाताळणारे भगवान घाडगे, प्रदीप सुर्वे, राजेंद्र फणसे हे निष्ठावंत शिवसैनिक यावेळी बरोबर नाहीत. त्यांच्या मदतीशिवाय निवडणूक लढायची आहे. त्यांच्या नाराजीचा निवडणुकीत परिणाम जाणवेल. विशेष म्हणजे केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांची मर्जी ते कशा प्रकारे राखतात, यावर बरंच काही अवलंबून आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांनी दापोली विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. त्यामुळे कदम यांना तिकीट न मिळाल्यास कदम गट कितपत मदत करतो, यावर बरंच काही अवलंबून आहे. यावेळी कुणबी समाजाने स्वतंत्र उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतल्यामुळे याचा बराचसा फटका शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे.काँग्रेसला दापोली विधानसभा मतदारसंघात २५ वर्षे अपयश येत असल्याने या मतदारसंघावर राष्ट्रवादीने दावा केला. हे दोन स्पर्धक एकेकाळचे शिवसैनिक असल्याने शिवसेनेची राजनीती त्यांना अवगत आहे. काँग्रेसने हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडला नाही, तरी राष्ट्रवादीचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभा राहण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून सुजित झिमण यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. आघाडीचा कोण उमेदवार असेल, यावर बरंच काही अवलंबून आहे. दोन्ही पक्ष आघाडीचा धर्म किती पाळतात, यावर शिवसेनेची गणिते ठरणार आहेत.शिवसेना-भाजप युती आता अटीतटीच्या ठिकाणावर पोहोचली आहे. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते, मतदार शिवसेनेच्या पाठीशी उभे राहतात का, यावरही शिवसेना उमेदवाराचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.