शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
6
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
7
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
8
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
9
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
10
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
11
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
12
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
13
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
14
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
15
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
16
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
17
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
18
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
19
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
20
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...

अ‍ॅट्रॉसिटी कायदा बदलून दाखवाच

By admin | Updated: January 9, 2017 00:36 IST

जीवन भालेराव यांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान : सिंधुदुर्गनगरीतील बहुजन क्रांती मोर्चात प्रतिपादन

सिंधुदुर्गनगरी : अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करा अशी मागणी करणे म्हणजे दलित समाजावर अत्याचार करण्यासाठीची मागणी आहे. हा कायदा म्हणजे आमचे संरक्षण कवच आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायदाच काय पण त्या अक्षरातील काना, मात्रा तरी बदलून दाखवाच असे खुले आव्हान बहुजन क्रांती मोर्चाचे संकल्पक जीवन भालेराव यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले. मराठा क्रांती मोर्चाला अनुसरून दलित बांधवांना प्रतिमोर्चा काढावा यासाठी लागणारा पैसा आम्ही देतो असे संघ परिवारामार्फत सांगून दलित विरूद्ध मराठा असा झगडा लावण्याचे कामही संघाच्यावतीने सुरू होते, असा आरोपही भालेराव यांनी केला.रविवारी सिंधुदुर्गनगरी येथे बहुजन क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आरटीओ कार्यालयाच्या नजीक असणाऱ्या गोविंद सुपर मार्केट येथील मोकळ्या जागेत सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बहुजन क्रांती मोर्चाचे संकल्पक आणि क्रांती मोर्चाच्या आयोजन समितीचे राज्य सदस्य अहमदनगर येथील जीवन भालेराव हे बोलत होते.यावेळी सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई शाखा वेंगुर्लेचे वाय. जी. कदम, सावित्रीबाई फुले विचार मंच सावंतवाडी अध्यक्षा सत्यशिला बोर्डे, युनायटेड बहुजन संघटना गोव्याचे दीपेश नाईक, शंकर जाधव, संघर्ष युवा मित्रमंडळ कणकवलीचे प्रकाश कांबळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समिती सिंधुदुर्ग सावंतवाडीचे लाडू जाधव, अजित जामसंडेकर, भिवा जाधव, राज्य मूळ रहिवासी महिला संघाच्या माया जमदाडे, सिताराम लांबर, प्रसाद जळवी आदी उपस्थित होते.भालेराव म्हणाले, कोपर्डी घटनेनंतर मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात झाली. या घटनेतील आरोपींना फाशी द्या, मराठा आरक्षण द्या व ब. मो. पुरंदरे यांचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार काढून घ्या अशा तीन मागण्या होत्या. त्यानंतर अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी नव्याने करण्यात आली. पुरंदरे यांचा पुरस्कार काढून घ्या ही मागणी काढून घेण्याच्या अटीवर मराठा मुक्ती मोर्चाला मुख्यमंत्र्यांनी पूर्ण राज्यातील जिल्ह्यांमध्ये मोर्चा काढण्याची परवानगी दिली आणि तिथूनच पुरस्कार मागे घेण्याची अट मराठा मोर्चातून काढण्यात आली. अ‍ॅट्रॉसिटी कायदा म्हणजे आमची कवचकुंडले आहेत. त्यामुळे हा कायदा कधीच रद्द करू देणार नाही. हा कायदाच काय पण त्यावरील काना, मात्रा तरी बदलून दाखवा, असे आव्हान राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जीवन भालेराव यांनी दिले आहे. (प्रतिनिधी)झगडा लावण्याचे संघाचे प्रयत्नमराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी सुरू झाल्यानंतर संघ परिवाराचे पदाधिकारी आमच्या बहुजन समाजाच्या पदाधिकाऱ्यांना येऊन भेटले आणि तुम्ही अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द होऊ नये यासाठी मराठा मोर्चाविरोधात मोर्चा काढा. आम्ही तुम्हाला पैसा, गाड्या, प्रचार, मीडिया आदी सर्व प्रकारची मदत करतो असे सांगत होते. यातून दलित विरूद्ध मराठा असा झगडा व्हावा आणि मराठा आरक्षणावरून लक्ष दूर जावे ही संघ व सरकार यांची नीती होती. मात्र आम्ही तो प्रस्ताव मान्य केला नाही, असेही भालेराव यांनी यावेळी सभेत स्पष्ट केले.