शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
3
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
4
अब्जाधीशांच्या यादीत पहिल्यांदाच सामील झाला शाहरुख खान, पाहा किती झाली संपत्ती?
5
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
6
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
7
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
8
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
9
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
10
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
11
Gold Silver Price 1 October: एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
12
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
13
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
14
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
15
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
16
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
17
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
18
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
19
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
20
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

विकासासाठी विरोधाची भूमिका बदला

By admin | Updated: July 1, 2016 23:36 IST

दीपक केसरकर : सासोली येथे कृषीदिनानिमित्त जिल्हास्तरीय कृषी मेळावा

दोडामार्ग : कोकणात एकमेकांना विरोध करण्याची वाईट प्रवृत्ती आहे. ही प्रवृत्ती नाहीशी झाली पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने कोकणचा विकास होईल. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला राज्यात श्रीमंत जिल्हा बनवायचे असेल, तर एकमेकांना विरोध करण्याची भूमिका प्रथम बदलली पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त व ग्रामविकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.महाराष्ट्र शासन कृषी विभाग व जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषीदिनाचे औचित्य साधून सासोली येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कृषी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी उदय चौधरी, राज्याच्या पर्यटक सचिव वलका नायर, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर, पंचायत समिती सभापती विशाखा देसाई, उपसभापती आनंद रेडकर, सासोली सरपंच अनिरूध्द फाटक आदी उपस्थित होते.पालकमंत्री केसरकर म्हणाले, कोकणचा विकास करण्याचे उध्दव ठाकरे यांचे स्वप्न आहे. कोकणसाठी आणि इथल्या शेतकऱ्यांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. पण कोकणच्या विकासात एकमेकांना विरोध करण्याची अपप्रवृत्ती आहे. एखाद्या विकासकामात विरोधाला विरोध केला जात असल्याने कोकण विकासाच्या बाबतीत मागे राहिले आहे. ही अपप्रवृत्ती प्रथम बंद केली पाहिजे. एकमेकांना विरोध करण्याची प्रवृत्ती जेव्हा मावळेल तेव्हाच खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्हा आणि पर्यायाने कोकण समृध्द बनेल. शासनाची पर्यटन आणि कृषी क्षेत्राला भरघोस निधी देण्याची भूमिका राहील. असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)कोकणचा विकास : निधी कमी पडू देणार नाहीजिल्ह्यात काजू बागायतीसाठी सुक्ष्म सिंचनाद्वारे पाणीपुरवठा करा, दोडामार्ग तालुक्यात हत्तींचा उपद्रव वाढत चालला आहे. लाखो रूपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे यापुढे हत्तींपासून शेती-बागायतीचे संरक्षण करण्याकरिता १० किलोमीटरपर्यंतच्या क्षेत्रात हत्तींना प्रतिबंध करण्यासाठी अनुदान तत्त्वावर खंदक खोदणे व सौरकुंपण घालण्याकरिता शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदान देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि कोकणच्या विकासासाठी निधी कोणत्याही परिस्थितीत कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री केसरकर यांनी यावेळी दिली.मसुरे गावाला एक कोटीची मदतमेळाव्याच्या अनुषंगाने जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर यांच्या मसुरे गावाला १ कोटीचा निधी दिला आहे. एक कोटीच्या निधीत सावंतवाडीचा सर्वांगीण विकास केला आहे. त्यामुळे मसुरे गावच्या विकासासाठी हा निधी मोठा असून, त्याचा गावच्या विकासासाठी योग्य वापर करा, अशी सूचनाही यावेळी पालकमंत्री केसरकर यांनी केली.