शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

केंद्राकडून निर्मल ग्राम पुरस्कार योजना बंद

By admin | Updated: November 21, 2015 00:25 IST

स्वप्न धुसर

सिंधुुदुर्गनगरी : जिल्ह्यातील १०० टक्के निर्मल झालेल्या ग्रामपंचायतींना दिला जाणारा ‘निर्मल ग्राम पुरस्कार’ केंद्र शासनाने बंद केल्यामुळे या पुरस्काराअंतर्गत ग्रामपंचातींना मिळणारी लाखो रुपयांची रक्कम बंद होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील निर्मल होणाऱ्या ९२ ग्रामपंचायतींना याचा फटका बसला आहे. संपूर्ण स्वच्छता अभियान व निर्मल भारत अभियानाअंतर्गत ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छतेचे सातत्य राखण्यासाठी व स्वच्छताबाबत लोकचळवळ निर्माण करण्यासाठी सन २००३ पासून निर्मलग्राम पुरस्कार योजना केंद्र शासनामार्फ त राबवण्यात येत होती. ज्या ग्रामपंचायती निर्मल होतील त्यांना शासनाच्यावतीने लोकसंख्येच्या आधारावर पुरस्काराची रक्कम दिली जात होती. यामध्ये १ हजारपेक्षा कमी लोकसंख्येस १ लाख रक्कम, दोन हजारापर्यंत २ लाख रूपये व १० हजार लोकसंख्येमागे १० लाख रूपये असे या बक्षीसाचे स्वरूप होते. ही सर्व रक्कम ग्रामपंचायतींना देण्यात येत होती. ही रक्कम विकास योजनांवर खर्च करण्यात येत होती. जिल्ह्यातील ३४० ग्रामपंचायती या निर्मल ग्राम झाल्या असून ९२ ग्रामपंचायतीचा निर्मल होणे बाकी आहे.त्यांना आता बक्षीसाच्या रकमेचा लाभ मिळणार नाही. (प्रतिनिधी)स्वप्न धुसरकें द्र शासनाने निर्मल झालेल्या ग्रामपंचायतींना देण्यात येणाऱ्या रोख रक्कमरूपी पुरस्काराची योजना बंद केल्याने जिल्ह्यातील निर्मल होणे बाकी असलेल्या ९२ ग्रामपंचायती निर्मल होण्यासाठी उत्स्फूर्त सहभाग घेतील की नाही यात शंका निर्माण होत आहे. निर्मल झालेल्या ७८.७० टक्के ग्रामपंचायतींनी पुरस्कारांच्या आशेने या ग्रामपंचायती निर्मल केल्या. मात्र शासनाने निर्मलग्राम पुरस्कार योजनाच बंद केल्याने जिल्हा निर्मल होण्याचे स्वप्न जवळ जवळ भंगले आहे.