शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
3
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
4
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
5
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
6
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
7
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
8
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
9
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
10
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
11
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
12
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
13
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
14
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
15
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
16
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
17
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
18
MSRTC: ...तरच जेष्ठ नागरिकांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, नियमात बदल!
19
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
20
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक

केंद्राकडून निर्मल ग्राम पुरस्कार योजना बंद

By admin | Updated: November 21, 2015 00:25 IST

स्वप्न धुसर

सिंधुुदुर्गनगरी : जिल्ह्यातील १०० टक्के निर्मल झालेल्या ग्रामपंचायतींना दिला जाणारा ‘निर्मल ग्राम पुरस्कार’ केंद्र शासनाने बंद केल्यामुळे या पुरस्काराअंतर्गत ग्रामपंचातींना मिळणारी लाखो रुपयांची रक्कम बंद होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील निर्मल होणाऱ्या ९२ ग्रामपंचायतींना याचा फटका बसला आहे. संपूर्ण स्वच्छता अभियान व निर्मल भारत अभियानाअंतर्गत ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छतेचे सातत्य राखण्यासाठी व स्वच्छताबाबत लोकचळवळ निर्माण करण्यासाठी सन २००३ पासून निर्मलग्राम पुरस्कार योजना केंद्र शासनामार्फ त राबवण्यात येत होती. ज्या ग्रामपंचायती निर्मल होतील त्यांना शासनाच्यावतीने लोकसंख्येच्या आधारावर पुरस्काराची रक्कम दिली जात होती. यामध्ये १ हजारपेक्षा कमी लोकसंख्येस १ लाख रक्कम, दोन हजारापर्यंत २ लाख रूपये व १० हजार लोकसंख्येमागे १० लाख रूपये असे या बक्षीसाचे स्वरूप होते. ही सर्व रक्कम ग्रामपंचायतींना देण्यात येत होती. ही रक्कम विकास योजनांवर खर्च करण्यात येत होती. जिल्ह्यातील ३४० ग्रामपंचायती या निर्मल ग्राम झाल्या असून ९२ ग्रामपंचायतीचा निर्मल होणे बाकी आहे.त्यांना आता बक्षीसाच्या रकमेचा लाभ मिळणार नाही. (प्रतिनिधी)स्वप्न धुसरकें द्र शासनाने निर्मल झालेल्या ग्रामपंचायतींना देण्यात येणाऱ्या रोख रक्कमरूपी पुरस्काराची योजना बंद केल्याने जिल्ह्यातील निर्मल होणे बाकी असलेल्या ९२ ग्रामपंचायती निर्मल होण्यासाठी उत्स्फूर्त सहभाग घेतील की नाही यात शंका निर्माण होत आहे. निर्मल झालेल्या ७८.७० टक्के ग्रामपंचायतींनी पुरस्कारांच्या आशेने या ग्रामपंचायती निर्मल केल्या. मात्र शासनाने निर्मलग्राम पुरस्कार योजनाच बंद केल्याने जिल्हा निर्मल होण्याचे स्वप्न जवळ जवळ भंगले आहे.