शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

खाडीतील गाळाने घोटला मासेमारीचा गळा

By admin | Updated: September 21, 2015 23:45 IST

मच्छीमारांचे नुकसान : वर्षानुवर्षे झालेल्या दुर्लक्षामुळे राजीवड्यातील प्रश्न बिकट

रत्नागिरी : भाट्ये खाडीच्या मुखाशी असलेले मांडवी बंदर गाळाने भरल्याने खोल समुद्रामध्ये जाण्याचा मासेमारीचा मार्गच धोकादायक बनला आहे. त्यामुळे अनेकदा नौकांना गाळामुळे अपघात होऊन मच्छीमारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात मासेमारी व्यवसायाला मोठ्या प्रमाणात चालना मिळण्याच्या दृष्टीने शासनाने गांभिर्याने विचार करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील बंदरे, खाड्या गाळाने भरल्या आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून हा गाळ उपसलेलाच नाही. त्यासाठी आवश्यक असलेल्या यंत्रसामुग्रीचा वापर करुन ही बंदरे साफ केल्यास त्याचा मोठा फायदा मच्छीमारांना होणार आहे. मात्र, याकडे लक्ष कोण देणार? असा प्रश्न नेहमीच मच्छीमारांना सतावत आहे. भाट्ये खाडीच्या आसपास असलेली राजिवडा, कर्ला, जुवे, फणसोप, भाट्ये आदी गावांमधील हजारो लोक मच्छीमारी व्यवसायावर उदरनिर्वाह करतात. येथील बहुतांशी कुटुंबिय मासेमारीवरच अवलंबून आहेत. भाट्ये खाडी परिसरातील मासेमारी नौकांना खोल समुद्रामध्ये मासमारीला जाण्यासाठी भाट्ये खाडीच्या मुखाशी असलेले मांडवी बंदर हा एकमेव मार्ग आहे. मांडवी बंदर हा मासेमारीचा मार्ग गाळाने भरलेला आहे. या बंदरातील गाळ गेली कित्येक वर्षे उपसलेलाच नाही. त्यामुळे येथून समुद्रात जाताना मच्छीमारांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो. हे मुख गाळाने भरल्याने अनेकदा अपघातही घडले आहेत. येथे मासेमारी नौका बुडाल्याने मच्छीमारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. भरलेल्या गाळामुळे मासेमारी नौकांना भरती-ओहोटीची प्रतीक्षा करावी लागते. या बंदराच्या मुखाशी साचलेला गाळ साफ करण्यात यावा, अशी मागणी भाट्ये खाडी परिसरातील मच्छीमारांकडून अनेकदा करण्यात आली आहे. मात्र, त्याकडे मत्स्य विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. येथील लोकप्रतिनिधींच्याही वेळोवेळी ही बाब लक्षात आणून देखील त्याकडे डोळेझाक केली जात आहे. त्यामुळे मच्छीमारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याकडे शासन कधी लक्ष देणार? असा प्रश्न मच्छीमारांकडून उपस्थित केला जात आहे. (शहर वार्ताहर)भाट्येखाडीच्या मुखाशी मांडवी बंदरामध्ये साचलेला गाळ उपसण्याबाबत गेली अनेक वर्षांपासून शासनाकडे, येथील लोकप्रतिनिधींकडे मागणी करण्यात आली आहे. मात्र, मच्छीमारांना केवळ आश्वासनांच्या खैरातीशिवाय काहीही हाती लागलेले नाही. या बंदरातील गाळ उपसण्यासाठी ठोस उपाययोजना न केल्यास भविष्यात मच्छीमारीचा मार्गच बंद होणार आहे. - शब्बीर भाटकरमाजी अध्यक्ष, रत्नागिरी मच्छीमार सहकारी सोसायटी, राजिवडा.कोट्यावधी रुपये खर्च करुन शासनाने मिरकरवाडा बंदरामध्ये संक्शन ड्रेझर आणला आहे. या ड्रेझरचा वापर मांडवी बंदराच्या मुखाशी साचलेला गाळ काढण्यासाठी होईल, अशी अपेक्षा भाट्ये खाडी परिसरातील मच्छीमारांकडून करण्यात येत होती. मात्र, हा ड्रेझर बंद असल्याने गाळ कसा निघणार. भाट्येखाडीच्या मुखाशी मांडवी बंदरामध्ये साचलेला गाळ उपसण्याबाबत गेली अनेक वर्षांपासून शासनाकडे, येथील लोकप्रतिनिधींकडे मागणी करण्यात आली आहे. मात्र, मच्छीमारांना केवळ आश्वासनांच्या खैरातीशिवाय काहीही हाती लागलेले नाही. या बंदरातील गाळ उपसण्यासाठी ठोस उपाययोजना न केल्यास भविष्यात मच्छीमारीचा मार्गच बंद होणार आहे. - शब्बीर भाटकरमाजी अध्यक्ष, रत्नागिरी मच्छीमार सहकारी सोसायटी, राजिवडा.कोट्यावधी रुपये खर्च करुन शासनाने मिरकरवाडा बंदरामध्ये संक्शन ड्रेझर आणला आहे. या ड्रेझरचा वापर मांडवी बंदराच्या मुखाशी साचलेला गाळ काढण्यासाठी होईल, अशी अपेक्षा भाट्ये खाडी परिसरातील मच्छीमारांकडून करण्यात येत होती. मात्र, हा ड्रेझर बंद असल्याने गाळ कसा निघणार.