शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

खाडीतील गाळाने घोटला मासेमारीचा गळा

By admin | Updated: September 21, 2015 23:45 IST

मच्छीमारांचे नुकसान : वर्षानुवर्षे झालेल्या दुर्लक्षामुळे राजीवड्यातील प्रश्न बिकट

रत्नागिरी : भाट्ये खाडीच्या मुखाशी असलेले मांडवी बंदर गाळाने भरल्याने खोल समुद्रामध्ये जाण्याचा मासेमारीचा मार्गच धोकादायक बनला आहे. त्यामुळे अनेकदा नौकांना गाळामुळे अपघात होऊन मच्छीमारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात मासेमारी व्यवसायाला मोठ्या प्रमाणात चालना मिळण्याच्या दृष्टीने शासनाने गांभिर्याने विचार करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील बंदरे, खाड्या गाळाने भरल्या आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून हा गाळ उपसलेलाच नाही. त्यासाठी आवश्यक असलेल्या यंत्रसामुग्रीचा वापर करुन ही बंदरे साफ केल्यास त्याचा मोठा फायदा मच्छीमारांना होणार आहे. मात्र, याकडे लक्ष कोण देणार? असा प्रश्न नेहमीच मच्छीमारांना सतावत आहे. भाट्ये खाडीच्या आसपास असलेली राजिवडा, कर्ला, जुवे, फणसोप, भाट्ये आदी गावांमधील हजारो लोक मच्छीमारी व्यवसायावर उदरनिर्वाह करतात. येथील बहुतांशी कुटुंबिय मासेमारीवरच अवलंबून आहेत. भाट्ये खाडी परिसरातील मासेमारी नौकांना खोल समुद्रामध्ये मासमारीला जाण्यासाठी भाट्ये खाडीच्या मुखाशी असलेले मांडवी बंदर हा एकमेव मार्ग आहे. मांडवी बंदर हा मासेमारीचा मार्ग गाळाने भरलेला आहे. या बंदरातील गाळ गेली कित्येक वर्षे उपसलेलाच नाही. त्यामुळे येथून समुद्रात जाताना मच्छीमारांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो. हे मुख गाळाने भरल्याने अनेकदा अपघातही घडले आहेत. येथे मासेमारी नौका बुडाल्याने मच्छीमारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. भरलेल्या गाळामुळे मासेमारी नौकांना भरती-ओहोटीची प्रतीक्षा करावी लागते. या बंदराच्या मुखाशी साचलेला गाळ साफ करण्यात यावा, अशी मागणी भाट्ये खाडी परिसरातील मच्छीमारांकडून अनेकदा करण्यात आली आहे. मात्र, त्याकडे मत्स्य विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. येथील लोकप्रतिनिधींच्याही वेळोवेळी ही बाब लक्षात आणून देखील त्याकडे डोळेझाक केली जात आहे. त्यामुळे मच्छीमारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याकडे शासन कधी लक्ष देणार? असा प्रश्न मच्छीमारांकडून उपस्थित केला जात आहे. (शहर वार्ताहर)भाट्येखाडीच्या मुखाशी मांडवी बंदरामध्ये साचलेला गाळ उपसण्याबाबत गेली अनेक वर्षांपासून शासनाकडे, येथील लोकप्रतिनिधींकडे मागणी करण्यात आली आहे. मात्र, मच्छीमारांना केवळ आश्वासनांच्या खैरातीशिवाय काहीही हाती लागलेले नाही. या बंदरातील गाळ उपसण्यासाठी ठोस उपाययोजना न केल्यास भविष्यात मच्छीमारीचा मार्गच बंद होणार आहे. - शब्बीर भाटकरमाजी अध्यक्ष, रत्नागिरी मच्छीमार सहकारी सोसायटी, राजिवडा.कोट्यावधी रुपये खर्च करुन शासनाने मिरकरवाडा बंदरामध्ये संक्शन ड्रेझर आणला आहे. या ड्रेझरचा वापर मांडवी बंदराच्या मुखाशी साचलेला गाळ काढण्यासाठी होईल, अशी अपेक्षा भाट्ये खाडी परिसरातील मच्छीमारांकडून करण्यात येत होती. मात्र, हा ड्रेझर बंद असल्याने गाळ कसा निघणार. भाट्येखाडीच्या मुखाशी मांडवी बंदरामध्ये साचलेला गाळ उपसण्याबाबत गेली अनेक वर्षांपासून शासनाकडे, येथील लोकप्रतिनिधींकडे मागणी करण्यात आली आहे. मात्र, मच्छीमारांना केवळ आश्वासनांच्या खैरातीशिवाय काहीही हाती लागलेले नाही. या बंदरातील गाळ उपसण्यासाठी ठोस उपाययोजना न केल्यास भविष्यात मच्छीमारीचा मार्गच बंद होणार आहे. - शब्बीर भाटकरमाजी अध्यक्ष, रत्नागिरी मच्छीमार सहकारी सोसायटी, राजिवडा.कोट्यावधी रुपये खर्च करुन शासनाने मिरकरवाडा बंदरामध्ये संक्शन ड्रेझर आणला आहे. या ड्रेझरचा वापर मांडवी बंदराच्या मुखाशी साचलेला गाळ काढण्यासाठी होईल, अशी अपेक्षा भाट्ये खाडी परिसरातील मच्छीमारांकडून करण्यात येत होती. मात्र, हा ड्रेझर बंद असल्याने गाळ कसा निघणार.