शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुंबईतील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर
2
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
3
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
4
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
5
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
6
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
7
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
8
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
9
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
10
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
11
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
12
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
13
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
14
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
15
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
16
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
17
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
18
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
19
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
20
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले

खाडीतील गाळाने घोटला मासेमारीचा गळा

By admin | Updated: September 21, 2015 23:45 IST

मच्छीमारांचे नुकसान : वर्षानुवर्षे झालेल्या दुर्लक्षामुळे राजीवड्यातील प्रश्न बिकट

रत्नागिरी : भाट्ये खाडीच्या मुखाशी असलेले मांडवी बंदर गाळाने भरल्याने खोल समुद्रामध्ये जाण्याचा मासेमारीचा मार्गच धोकादायक बनला आहे. त्यामुळे अनेकदा नौकांना गाळामुळे अपघात होऊन मच्छीमारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात मासेमारी व्यवसायाला मोठ्या प्रमाणात चालना मिळण्याच्या दृष्टीने शासनाने गांभिर्याने विचार करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील बंदरे, खाड्या गाळाने भरल्या आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून हा गाळ उपसलेलाच नाही. त्यासाठी आवश्यक असलेल्या यंत्रसामुग्रीचा वापर करुन ही बंदरे साफ केल्यास त्याचा मोठा फायदा मच्छीमारांना होणार आहे. मात्र, याकडे लक्ष कोण देणार? असा प्रश्न नेहमीच मच्छीमारांना सतावत आहे. भाट्ये खाडीच्या आसपास असलेली राजिवडा, कर्ला, जुवे, फणसोप, भाट्ये आदी गावांमधील हजारो लोक मच्छीमारी व्यवसायावर उदरनिर्वाह करतात. येथील बहुतांशी कुटुंबिय मासेमारीवरच अवलंबून आहेत. भाट्ये खाडी परिसरातील मासेमारी नौकांना खोल समुद्रामध्ये मासमारीला जाण्यासाठी भाट्ये खाडीच्या मुखाशी असलेले मांडवी बंदर हा एकमेव मार्ग आहे. मांडवी बंदर हा मासेमारीचा मार्ग गाळाने भरलेला आहे. या बंदरातील गाळ गेली कित्येक वर्षे उपसलेलाच नाही. त्यामुळे येथून समुद्रात जाताना मच्छीमारांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो. हे मुख गाळाने भरल्याने अनेकदा अपघातही घडले आहेत. येथे मासेमारी नौका बुडाल्याने मच्छीमारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. भरलेल्या गाळामुळे मासेमारी नौकांना भरती-ओहोटीची प्रतीक्षा करावी लागते. या बंदराच्या मुखाशी साचलेला गाळ साफ करण्यात यावा, अशी मागणी भाट्ये खाडी परिसरातील मच्छीमारांकडून अनेकदा करण्यात आली आहे. मात्र, त्याकडे मत्स्य विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. येथील लोकप्रतिनिधींच्याही वेळोवेळी ही बाब लक्षात आणून देखील त्याकडे डोळेझाक केली जात आहे. त्यामुळे मच्छीमारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याकडे शासन कधी लक्ष देणार? असा प्रश्न मच्छीमारांकडून उपस्थित केला जात आहे. (शहर वार्ताहर)भाट्येखाडीच्या मुखाशी मांडवी बंदरामध्ये साचलेला गाळ उपसण्याबाबत गेली अनेक वर्षांपासून शासनाकडे, येथील लोकप्रतिनिधींकडे मागणी करण्यात आली आहे. मात्र, मच्छीमारांना केवळ आश्वासनांच्या खैरातीशिवाय काहीही हाती लागलेले नाही. या बंदरातील गाळ उपसण्यासाठी ठोस उपाययोजना न केल्यास भविष्यात मच्छीमारीचा मार्गच बंद होणार आहे. - शब्बीर भाटकरमाजी अध्यक्ष, रत्नागिरी मच्छीमार सहकारी सोसायटी, राजिवडा.कोट्यावधी रुपये खर्च करुन शासनाने मिरकरवाडा बंदरामध्ये संक्शन ड्रेझर आणला आहे. या ड्रेझरचा वापर मांडवी बंदराच्या मुखाशी साचलेला गाळ काढण्यासाठी होईल, अशी अपेक्षा भाट्ये खाडी परिसरातील मच्छीमारांकडून करण्यात येत होती. मात्र, हा ड्रेझर बंद असल्याने गाळ कसा निघणार. भाट्येखाडीच्या मुखाशी मांडवी बंदरामध्ये साचलेला गाळ उपसण्याबाबत गेली अनेक वर्षांपासून शासनाकडे, येथील लोकप्रतिनिधींकडे मागणी करण्यात आली आहे. मात्र, मच्छीमारांना केवळ आश्वासनांच्या खैरातीशिवाय काहीही हाती लागलेले नाही. या बंदरातील गाळ उपसण्यासाठी ठोस उपाययोजना न केल्यास भविष्यात मच्छीमारीचा मार्गच बंद होणार आहे. - शब्बीर भाटकरमाजी अध्यक्ष, रत्नागिरी मच्छीमार सहकारी सोसायटी, राजिवडा.कोट्यावधी रुपये खर्च करुन शासनाने मिरकरवाडा बंदरामध्ये संक्शन ड्रेझर आणला आहे. या ड्रेझरचा वापर मांडवी बंदराच्या मुखाशी साचलेला गाळ काढण्यासाठी होईल, अशी अपेक्षा भाट्ये खाडी परिसरातील मच्छीमारांकडून करण्यात येत होती. मात्र, हा ड्रेझर बंद असल्याने गाळ कसा निघणार.