शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

‘महाकबड्डी’साठी खेडही प्रयत्नशील ?

By admin | Updated: March 12, 2015 00:03 IST

क्रीडारसिकांना पर्वणी : ‘पशुपतीनाथ ग्रुप’तर्फे होणार स्पर्धेचे आयोजन

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील क्रिडा शौकिनांना मे महिन्यात राज्यस्तरीय महाकबड्डी लिग स्पर्धेचा आनंद लुटता येणार आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी फेडरेशन आणि पुणे येथील पशुपतीनाथ ग्रुृप आॅफ कंपनी यांच्यातील चर्चेनंतर या स्पर्धा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घेण्याबाबत आग्रह धरण्यात आला आहे. विशेषत: खेडमध्ये या स्पर्धा घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत़ खेड येथे झालेल्या या संघटनेच्या पत्रकार परिषदेत याबाबत सहमती असल्याचे सांगण्यात आले.या स्पर्धा १ ते २३ मेदरम्यान आयोजित करण्यात आल्या असून रत्नागिरी जिल्ह्याचा कबड्डी संघ पुणे येथील पशुपतीनाथ कंपनीने पुरस्कृत केल्याची माहिती कंपनीचे अध्यक्ष अजय चिंगळे यांच्यावतीने सिध्दार्थ मेहता आणि कंपनीचे संचालक शशांक कदम तसेच सचिन चव्हाण यांनी दिली आहे़ पुणे येथील पशुपतीनाथ ग्रुप आॅफ कंपनीने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. राज्य कबड्डी फेडरेशनशी कंपनीची बोलणी झाल्याची माहिती कंपनीच्या संचालकांनी दिली आहे. क्रिकेटच्या धर्तीवर महाराष्ट्रात अशा प्रकारची ही पहिली स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापुर, बारामती, नाशिक, रायगड, रत्नागिरी आदी १२ संघ सहभागी होणार आहेत.विशेष म्हणजे या स्पर्धेमध्ये राज्य, राष्टीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कबड्डी खेळाडू सहभागी होणार असल्याने या स्पर्धेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. हे सर्व संघ पुरस्कुत केलेले आहेत. या स्पर्धेमुळे अनेक खेळाडूंना चांगले उत्पन्न कमावण्याची संधीही उपलब्ध झाली आहे. कोकणातील लाल मातीतला हा खेळ असल्याने या स्पर्धा कोकणामध्ये झाल्या पाहिजेत, असा आग्रह कंपनीचा असल्याचे संचालक शशांक कदम यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्ह्याचा संघ अद्याप पुरस्कृत करण्यात आला नव्हता़ पशुपतीनाथ कंपनीनी हा संघ पुरस्कृत केला आहे.विशेष म्हणजे या स्पर्धेतील प्रथम विजेत्यांस ७ लाख रूपयांचे पारितोषिक आणि सुवर्णचषक तसेच उपविजेत्यास ५ लाख रूपये आणि सुवर्णचषक देऊन गौरविण्यात येणार आहे. याबाबत खेड येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली असून लवकरच हा संघ पुरस्कृत करण्याबाबत पावले उचलली जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या बैठकीत पशुपतीनाथ कंपनीचे संचालक शशांक कदम, सचिन चव्हाण यांच्यासह सिध्दार्थ मेहता, साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष सदानंद भोसले, खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश चिकणे उपस्थित होते. (प्रतिनिधी)महिला संघाकडे साऱ्यांचीच पाठरत्नागिरी जिल्ह्याचा पुरूषांचा संघ पुरूस्कृत करण्यात आला असला, तरी आजपर्यंत महिला संघाकडे मात्र साऱ्यांनीच पाठ फिरवली आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा महिलांचा सघ अद्याप पुरस्कृत करण्यात आला नाही. मात्र, हा संघ पुरस्कृत करण्याच्या प्रतीक्षेत येथील काही उद्योजक आहेत.