शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

काजू, आंबा बाग जळून खाक मडुर्‍यातील घटना : दहा लाखांचे नुकसान; शेतकर्‍याला फटका

By admin | Updated: May 19, 2014 00:33 IST

बांदा : मडुरा-रेडकरवाडी येथील शांताराम विष्णू सावळ यांच्या काजू, आंबा कलम बागेला आग लागून सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले.

बांदा : मडुरा-रेडकरवाडी येथील शांताराम विष्णू सावळ यांच्या काजू, आंबा कलम बागेला आग लागून सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. काल रात्री ही आग लागली. मात्र अद्यापपर्यंत महसूलकडून पंचनामा करण्यात न आल्याने नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मडुरा- रेडकरवाडी येथे सावळ यांच्या मालकीचे मोठे बागायती क्षेत्र आहे. याठिकाणी काल रात्री उशिरा शॉर्टसर्किट होऊन आग लागली. रात्र असल्याने तसेच बागायतीत गवत असल्याने आग मोठ्या प्रमाणात भडकली. मडुरा येथील शेतकरी सावळ यांची या आगीत ५०० काजू कलमे, ५० हापूस आंबा कलम, ३०० सागाची झाडे तसेच जंगली झाडे व गवत गंजी जळून खाक झाली. आग लागल्याचे उशिरा लक्षात आले. रात्री उशिरा साई पावसकर, सूर्यकांत परब, रामा सावळ, लक्ष्मण सावळ, प्रजया सावळ यांनी पाणी व मातीच्या सहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, बागायतीतील गवत गंजी तसेच गवताने पेट घेतल्याने आगीने रौद्ररुप धारण केले. यात संपूर्ण बागायती आगीच्या भक्षस्थानी पडली. मध्यरात्री उशिरापर्यंत आग विझविण्यात यश आले. आज सायंकाळी उशिरापर्यंत पंचनामा करण्यात आला नव्हता. या आगीत सुमारे दहा लाख रुपये नुकसान झाल्याचा अंदाज सावळ यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)