शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
3
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
4
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
5
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
6
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
7
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
8
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
9
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
10
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
11
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
12
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
13
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
14
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
15
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
16
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
17
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
18
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
19
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
20
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!

काजू, आंबा बाग जळून खाक मडुर्‍यातील घटना : दहा लाखांचे नुकसान; शेतकर्‍याला फटका

By admin | Updated: May 19, 2014 00:33 IST

बांदा : मडुरा-रेडकरवाडी येथील शांताराम विष्णू सावळ यांच्या काजू, आंबा कलम बागेला आग लागून सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले.

बांदा : मडुरा-रेडकरवाडी येथील शांताराम विष्णू सावळ यांच्या काजू, आंबा कलम बागेला आग लागून सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. काल रात्री ही आग लागली. मात्र अद्यापपर्यंत महसूलकडून पंचनामा करण्यात न आल्याने नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मडुरा- रेडकरवाडी येथे सावळ यांच्या मालकीचे मोठे बागायती क्षेत्र आहे. याठिकाणी काल रात्री उशिरा शॉर्टसर्किट होऊन आग लागली. रात्र असल्याने तसेच बागायतीत गवत असल्याने आग मोठ्या प्रमाणात भडकली. मडुरा येथील शेतकरी सावळ यांची या आगीत ५०० काजू कलमे, ५० हापूस आंबा कलम, ३०० सागाची झाडे तसेच जंगली झाडे व गवत गंजी जळून खाक झाली. आग लागल्याचे उशिरा लक्षात आले. रात्री उशिरा साई पावसकर, सूर्यकांत परब, रामा सावळ, लक्ष्मण सावळ, प्रजया सावळ यांनी पाणी व मातीच्या सहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, बागायतीतील गवत गंजी तसेच गवताने पेट घेतल्याने आगीने रौद्ररुप धारण केले. यात संपूर्ण बागायती आगीच्या भक्षस्थानी पडली. मध्यरात्री उशिरापर्यंत आग विझविण्यात यश आले. आज सायंकाळी उशिरापर्यंत पंचनामा करण्यात आला नव्हता. या आगीत सुमारे दहा लाख रुपये नुकसान झाल्याचा अंदाज सावळ यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)