शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

काजू बीचा बाजारभाव ११६ रूपये निश्चित

By admin | Updated: March 27, 2016 00:58 IST

कृषी बाजार समितीतर्फे माहिती

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीने काजू बी विक्रीचा दर निश्चित केला आहे. ११६ रुपये किलो असा दर करण्यात आला आहे. या दरापेक्षा कमी दराने काजू निश्चित करण्यात आला असून या दरापेक्षा कमी दराने काजू बी व्यापाऱ्यांनी खरेदी करू नये तयेच शेतकऱ्यांची विक्री करू नये असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असते. या जिल्ह्यातील बहुसंख्य नागरिकांना काजूच्या बागा केल्या आहेत. यातून मिळाणाऱ्या उत्पन्नांतून ग्रामीण भागातील असंख्य नागरिक पावसाळ््यात लागणारे धान्य घरामध्ये भरत असतात. मात्र, काजू दर निश्चित नसल्याने मिळेल त्या दराने व्यापाऱ्याकडून काजूची खरेदी केली जाते. परिणामी शेतकऱ्यांला त्याचा आर्थिक फटका बसत असतो. त्यामुळे काजूचा बाजार भाव निश्चित करावा अशी मागणी कृषी समिती सभेत वारंवार केली जात होती. त्यानुसार सिंधुदुर्ग कृषि उत्पन्न बाजार समितीने प्रति किलोमागे ११६ रुपये एकढा काजू बीचा बाजारभाव निश्चित केला आहे. याच भावाने व्यापाऱ्यांनी काजू बी खरेदी करावी, तसेच शेतकऱ्यांनी विक्री दरही निश्चित करण्यात येणार असून याचा दर मागाहून जाहीर करण्यात येणार आहे. याबाबत शेतकऱ्यांनी कोणत्या अडचणी किंवा तक्रारी असल्यास ०२३६२-२२८४१३ या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन बाजार समिती सभापती तुळशीदास रावराणे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)