शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
3
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
4
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
5
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
6
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
7
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
8
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
9
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
10
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
11
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
12
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
13
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
14
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
15
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
16
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
17
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
18
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
19
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?

कारची दुचाकीला धडक; एक ठार

By admin | Updated: June 15, 2014 00:30 IST

बायपासवर मळगाव येथे अपघात

सावंतवाडी : स्विफ्ट कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत विनायक दत्ताराम जोशी (वय ६७, रा. मळगाव-मांजरेकरवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात विजय गोपाळ नार्वेकर (६२, मळगाव-रस्तावाडा) हे गंभीर जखमी झाले. हा अपघात झाराप-पत्रादेवी महामार्गावरील मळगाव-आजगावकरवाडी येथे आज, शनिवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास झाला. जखमी नार्वेकर यांना अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आले आहे. झाराप-पत्रादेवी महामार्गावरील आजगावकरवाडी येथून विनायक दत्ताराम जोशी व विजय गोपाळ नार्वेकर हे दोघे आज सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास मांजरेकर-वाडीतील जोशी यांच्या घरी अ‍ॅक्टिव्हा या दुचाकीने चालले होते. त्यांची दुचाकी आजगावकरवाडीतील झाराप-पत्रादेवी महामार्गावर आली असता गोव्याहून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या कारचा अंदाज विजय नार्वेकर यांना आला नाही. त्यांनी दुचाकी रस्त्यातच उभी केली. कारचालक अशोक लक्षे यांनी दुचाकीस पाहिले होते; परंतु कारचा वेग आवरता न आल्याने भरधाव वेगातील कारने (एमएच४३ जे ४२२७) दुचाकीला धडक दिली. अपघातानंतर दुचाकी सुमारे शंभर ते दीडशे फूट फरफटत गेली, तर विनायक जोशी हे ५० फूट लांब फेकले गेले. यात जोशी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले. दुचाकीचालक विजय यांच्या हात, पाय व डोक्याला दुखापत झाल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले व नंतर अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आले आहे.या अपघातानंतर झाराप पत्रादेवी महामार्ग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या महामार्गामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या रस्त्यावर गाड्यांच्या वेगाचा अंदाज येत नसल्याने अपघात होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.मृत विनायक जोशी हे मुंबई येथे दूरसंचारमध्ये कामाला होते. अलीकडेच ते गावी आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, तीन मुले असा परिवार आहे.