शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

कालव्याचे काम सुरू मात्र, ५२ कुटुंबे वाऱ्यावर

By admin | Updated: February 4, 2015 23:54 IST

ओटवणेतील स्थिती : तीन वर्षानंतरही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत

सावंतवाडी : ओटवणे मांडवफातरवाडी येथे तीन वर्षांपूर्वी ओटवणे कालव्याचे काम सुरू असताना केलेल्या सुरूंग स्फोटामुळे ५२ घरांना तडे गेले होते. या घराचे पंचनामे होऊनसुद्धा अद्यापपर्यंत कुटंबांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. मात्र, कालव्याचे काम सुरू असून ही कुटुंबे प्रशासनाने वाऱ्यावर सोडली आहेत. बांधकाम विभागाने पंचनामे केल्यानंतरही मदत केव्हा मिळणार या प्रतीक्षेत येथील कुटुंबे आहेत.ओटवणे येथील इन्सुली ते ओटवणे या कालव्याचे काम गेली तीन वर्षे सुरू आहे. या कालव्यासाठी संबंधित ठेकेदार सुरुंग स्फोट करत होता. या स्फोटामुळे परिसरातील घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये मांडवफातरवाडीतील तब्बल ५२ घरांचा समावेश आहे. या घरांना मोठ्या प्रमाणात भेगा गेल्या आहेत. या भेगा एवढ्या आहेत की, ही घरे कधीही कोसळू शकतात अशी अवस्था आहे. स्थानिक ग्रामस्थांनी वेळोवेळी नुकसान भरपाई मिळावी यासाठी उपोषणे तसेच आंदोलने केली. मात्र, या नुकसानग्रस्त कुटूंबांना अद्यापपर्यंत भरपाई मिळाली नाही.या ५२ कुटुंबांनी एक वर्षापूर्वी उपोषण केले तेव्हा प्रशासनाने महसूल व बांधकाम विभाग या घराचे पंचनामे करतील असे सांगितले होते. त्याप्रमाणे बांधकाम विभागाने या परिसरात जाऊन पंचनामे केले. या पंचनाम्याचा अहवालही पाटबंधारे विभागाला दिला. पण तिलारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी अद्यापपर्यंत यावर निर्णय घेतेलेला नाही. ओटवणे येथील ग्रामस्थ अविनाश पनासे यांनी वेळोवेळी याबाबत प्रशासकीय पातळीवर ही मदत मिळावी, यासाठी प्रयत्न केले. पण त्यावर कारवाई झाली नाही. पनासे यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना माहिती देण्यात आली नाही. याबाबत ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीनंतर त्यांनी तिलारीच्या अधिकाऱ्यांना तातडीने माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. सध्या ही ५२ कुटुंबे मोठ्या अडचणीत असून काही घरांना तर मोठ्या प्रमाणात भेगा गेल्याने आतमध्ये राहणारी कुटूंबे जीव मुठीत घेऊन राहत आहेत. (प्रतिनिधी)बांधकाम विभागाने पंचनामा करून नुकसानीचा अहवाल दिला आहे. हा अहवाल आम्हाला नियामक मंडळाकडे ठेवावा लागेल. त्यानंतर या नुकसान भरपाईचे वाटप करावे लागणार आहे. आम्ही माहितीच्या अधिकारात माहिती दिली.- धीरज साळे,कार्यकारी अभियंता, तिलारी विभाग