शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सी-वर्ल्डला ग्रामस्थांचा विरोध कायम

By admin | Updated: July 5, 2016 00:08 IST

वायंगणीतील ग्रामसभेत वादळी चर्चा : शुभारंभाचा नारळ फोडणारे ‘लक्ष्य’

आचरा : मालवण तालुक्यातील वायंगणी-तोंडवळी येथील प्रस्तावित सी-वर्ल्ड प्रकल्पाबाबत वायंगणी ग्रामपंचायतीच्यावतीने बोलावण्यात आलेल्या विशेष सभेत वादळी चर्चा रंगली. आता प्रकल्पाला विरोध दर्शविणाऱ्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी यापूर्वी सी-वर्ल्ड मोजणीच्या शुभारंभाचा नारळ फोडलाच कसा? असा सवाल करत विरोध दर्शविणाऱ्या लोकप्रतिनिधींवरच निशाणा साधला. तर काही ग्रामस्थांनी प्रकल्पाची सकारात्मक बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी उपस्थित ग्रामस्थ आक्रमक बनले. प्रकल्पाला आपला विरोध होता आणि यापुढेही राहील, असे सांगत उपस्थित शंभर ते दीडशे ग्रामस्थांनी पुन्हा एकदा सी-वर्ल्ड विरोधाचा ठराव घेतला.सी-वर्ल्ड प्रकल्पाचा आराखडा ४०० एकरचा केल्यानंतर संस्थेने नव्या आराखड्यानुसार गावातील हद्द निश्चितीसाठी चिन्हांकन प्रक्रिया हाती घेतली होती. या प्रक्रियेस विरोध दर्शविताना वायंगणी गावाच्यावतीने सोमवारी विशेष ग्रामसभेचे आयोजन सरपंच प्रज्ञा धुळे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य उदय दुखंडे, उपसरपंच हनुमंत प्रभू, सदस्य मालती जोशी, राजन आचरेकर, अमित खोत, प्रफुल्ल माळकर यांच्यासह वायंगणी ग्रामस्थ उपस्थित होते.१३९० एकर क्षेत्रात सी-वर्ल्ड निश्चित झाला, त्यापूर्वी या प्रकल्पाच्या मोजणी कामाचा शुभारंभ स्थानिक पंचायत समिती सदस्य व ग्रामपंचायत सरपंचांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी या प्रकल्पाला विरोध करून शुभारंभाचा नारळ फुटला नसता तर आता विरोध-विरोध करून ग्रामसभा घेण्याची वेळ वायंगणी ग्रामस्थांवर आली नसती असे काही ग्रामस्थांनी सांगितले. तर ग्रामस्थ अमित खोत यांनी प्रकल्पाला विरोध असेल तर त्याची कारणे दिली जावीत. कोणाच्या सर्व्हे नंबरमध्ये प्रकल्प निश्चित झाला आहे. याची माहिती नसताना विरोध का? प्रकल्पात कोणाची घरे, जमिनी जाऊ नयेत, अशी आपली भूमिका आहे. स्थानिकांना उद्ध्वस्त करून होणारा प्रकल्प नकोच. मात्र विरोध करायचा असेल तर तो दिशाभूल करणारा असू नये, असे स्पष्ट केले. मात्र यावेळी काही ग्रामस्थांनी आपला या प्रकल्पाला विरोध आहे असे सांगत खोत यांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांनी वादावर नियंत्रण मिळवताना खोत यांना व्यासपीठाजवळ आणले. सकाळी १० वाजता सुरू होणारी सभा १०० सभासद ग्रामस्थांचा कोरम ११ वाजेपर्यंत न भरल्याने सुरू झाली नव्हती. अखेर ११ वाजल्यानंतर ही विशेष ग्रामसभा सुरू झाली. (वार्ताहर)उदय दुखंडे : धनदांडग्यांच्या जागा वळविल्यापूर्वी हा प्रकल्प होत असताना जो १३९० एकरचा आराखडा होता. त्यात बदल करून मुख्यमंत्र्यांनी ४०० एकरवर आणला. याचा आराखडाही तयार झाला. मात्र, या आराखड्यात धनदांडग्यांनी खरेदी केलेली जमीन वगळण्यात आली आहे, असा आरोप काही ग्रामस्थांनी केला. तर केवळ स्थानिक शेतकरी व कसणाऱ्यांच्या जमिनी घेण्याचा डाव शासनाचा आहे. याबाबत मुंबईतील आमची समिती माहितीच्या अधिकारात माहिती मिळवत असल्याचेही उदय दुखंडे यांनी यावेळी बोलताना सांगितले. दीडशे ग्रामस्थांची उपस्थितीसभा संपेपर्यंत गावातील १६०० हून अधिक मतदारांपैकी दीडशे ग्रामस्थही उपस्थित नव्हते. अखेर वायंगणी गावाचा या प्रकल्पाला विरोध आहे, असा एकमुखी ठराव घेण्यात आला. यावेळी ग्रामसेवकांनी प्रकल्पाबाबत ग्रामस्थांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे मत मांडले. हा ठराव शासन स्तरावर पाठविण्यात यावा, असे ठरविण्यात आले.