शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

व्यापाºयांचा आक्षेप धुडकावत बांदा येथे खव्याची पोती नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 23:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबांदा : बांदा येथील दोन बेकरींमधून शनिवारी (२६ आॅगस्टला) मोठ्या प्रमाणात खवा जप्त करण्यात आला होता. मंगळवारी अन्नभेसळ प्रशासनाने या खव्याचे नमुने तपासणीसाठी पाठविल्यानंतर जप्त केलेली पोती बुधवारी पोलीस ठाण्याच्या आवारात जमिनीत पुरण्यात आली. तसेच तो खवा नष्ट करण्यात आला. मात्र, याला त्या बेकरी मालकांबरोबरच बांदा व्यापारी संघाने ...

लोकमत न्यूज नेटवर्कबांदा : बांदा येथील दोन बेकरींमधून शनिवारी (२६ आॅगस्टला) मोठ्या प्रमाणात खवा जप्त करण्यात आला होता. मंगळवारी अन्नभेसळ प्रशासनाने या खव्याचे नमुने तपासणीसाठी पाठविल्यानंतर जप्त केलेली पोती बुधवारी पोलीस ठाण्याच्या आवारात जमिनीत पुरण्यात आली. तसेच तो खवा नष्ट करण्यात आला. मात्र, याला त्या बेकरी मालकांबरोबरच बांदा व्यापारी संघाने आक्षेप घेतला. यावेळी अधिकाºयांनी व्यापारी संघाच्या पदाधिकाºयांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देत आपली कार्यवाही पूर्ण केली.पेढ्यामध्ये वापरण्यात येणाºया खव्यामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याचे दिसून आल्याने सर्व ठिकाणी मिठाईच्या दुकानात झाडाझडती सुरू आहे. तर जिल्ह्यात आठवडाभरापूर्वी दोन कारमधून बनावट खवा पकडला होता. शनिवारी बांदा येथे पोलिसांच्या पथकाने सोळंकी आणि पटेल यांच्याकडून ७२ हजार रुपये किमतीचा ४५० किलो खवा जप्त केला होता. त्यामुळे बांदा येथे एकच खळबळ उडाली होती.दरम्यान, मंगळवारी अन्न भेसळ व औषध प्रशासनाच्या अधिकाºयांनी या जप्त खव्याचे नमुने घेत पडताळणीसाठी पाठविले. या जप्त खव्याची विल्हेवाट लावण्यासाठी या विभागाचे अधिकारी व्यंकटेश वेदपाठक व वर्षा खरात हे बुधवारी दुपारी बांदा पोलीस ठाण्यात दाखल झाले.दरम्यान, हा जप्त खवा जमिनीत पुरण्यासाठी जेसीबीच्या सहायाने खड्डा मारण्यात आला होता. आपला जप्त खवा जमिनीत पुरला जाणार आहे, हे लक्षात येताच या बेकरी मालकांनी बांदा व्यापारी संघाकडे धाव घेत आपले नुकसान होत असल्याची कैफियत मांडली. बांदा व्यापारी संघाचे उपाध्यक्ष अभय सातार्डेकर, सचिव सचिन नाटेकर, सिद्धेश महाजन, संदेश पावसकर, आदींनी बांदा पोलीस ठाण्यात जात अधिकाºयांशी चर्चा करीत या बेकरी मालकांचे नुकसान होत असल्याचे सांगितले.व्यापारी संघाचा आक्षेप आणि माघारयावेळी वेदपाठक यांनी प्रथमदर्शनी हा खवा नसून, बर्फीसदृश गोड पदार्थ असल्याचे दिसून येत आहे. हा पदार्थ बनविला कुठे? कधी बनविला? हा किती महिने वापरण्यासाठी योग्य आहे? हे प्रश्न अनुत्तरित असून, या पिशव्यांवर बॅच नंबरही नसल्याचे व्यापारी संघाच्या निदर्शनास आणून दिले. असे हे पदार्थ लोकांच्या जीविताला अपायकारक असल्याने ते आम्ही परत देऊ शकत नाही. त्यामुळे त्याचे दफन करणेच आमच्या नियमात बसत असून, तुम्ही हवी तर या पिशव्यांची खात्री करू शकता, अशी सूचना व्यापारी संघाला केली होती. या पिशव्यांची खात्री करण्यात आली असता त्यावर कोणत्याही प्रकारचे बॅच अथवा हवी असलेली माहिती दिसून आली नाही. त्यामुळे अखेर व्यापारी संघाने माघार घेतली.