शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

किनारा स्वच्छता अभियान

By admin | Updated: January 20, 2017 23:02 IST

उदय चौधरींची माहिती : २४ जानेवारीला जिल्ह्यातील ३४ समुद्र ठिकाणांची निवड

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा प्रशासन, स्वयंसेवी संस्था, नागरिक, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून २४ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते ११ पर्यंत जिल्ह्यातील ३४ समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. फेब्रुवारीपासून पुढील प्रत्येक महिन्याला या समुद्र किनाऱ्यावर प्रशासनाच्यावतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. यावेळी कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस श्रमदानासाठी सुट्टी दिली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.जिल्हा पाणी व स्वच्छता कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ३४ समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या संदर्भातील माहिती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल बागल, माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर आदी उपस्थित होते. प्रशासनाच्यावतीने ही स्वच्छता मोहीम म्हणजे एक सुरूवात असून संबंधित ग्रामपंचायती, माध्यमिक व प्राथमिक शाळांचे विद्यार्थी, नागरिक व स्वयंसेवी संस्था यांच्यामार्फत या सागर किनाऱ्यांची उत्स्फूर्तपणे वारंवार स्वच्छता होणे अपेक्षीत आहे. मागच्यावर्षी झालेल्या किनारा स्वच्छतेच्या दोन अभियानांमध्ये सुमारे १५०० अधिकारी, कर्मचाऱ्यांनी व नागरिकांनी सहभाग घेतला होता. यावर्षीही अशा मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या सहभागासह अभियान राबविण्याची अपेक्षा आहे.मेरी टाईम बोर्डाने निर्मल सागर तट अभियानांतर्गत २२ सागर किनारा असलेल्या ग्रामपंचायतींना निधीही दिला आहे. या अभियानात ‘सर्वात स्वच्छ किनारा स्पर्धा’ समाविष्ट आहे. संपूर्ण जिल्हा स्वच्छतेचा मान सिंधुदुर्गने मिळविलेला असतानाच या सर्वात स्वच्छ किनारा स्पर्धेतही सिंधुदुर्ग अव्वल राहील यादृष्टीने हे स्वच्छता अभियान राबवायचे आहे.जिल्ह्यात स्वच्छता अभियान राबविण्यासाठी प्रत्येक महिन्याला एक दिवसातील तीन तास स्वच्छतेसाठी द्यावेत. यासाठी त्या कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस कामकाजातून सूट देण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली. २४ जानेवारी होणाऱ्या या स्वच्छता अभियानात जिल्हावासीयांनी सहभागी व्हावे असे आवाहनही जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केले. (प्रतिनिधी)गतवर्षी मिळालेला उत्तम प्रतिसादसंपूर्ण भारतात प्रथम पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारा स्वच्छता हा पर्यटनाच्यादृष्टीने महत्त्वाचा विषय होता. याच अनुषंगाने मागील वर्षापासून सागरी किनारा स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरूवात करण्यात आली आहे असे सांगून चौधरी म्हणाले की, मागील वर्षी ओला कचरा, सुका कचरा, प्लास्टीक, रबरी वस्तू असा मिळून १६०० गोणी कचरा हा जैविक विघटन होणारा होता तर १ हजार गोण्या यात प्लास्टीक, रबरी वस्तू, काचा यांचा समावेश होता. हा सर्व कचरा वेंगुर्ले नगरपरिषदेच्या प्रक्रिया केंद्रात पाठविण्यात आला होता. यावर्षी मात्र केवळ ओला व सुका कचरा सोडून उर्वरित जसे प्लास्टीक, काचा, धातूच्या वस्तू हाच कचरा गोळा करण्यात येणार आहे.