शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
2
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
3
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे दिसले संशयित ड्रोन; भारतीय सैन्याकडून कारवाई सुरू
4
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
5
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
6
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
7
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
8
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
9
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
10
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
11
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
12
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
14
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
15
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
16
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
17
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
18
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
19
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
20
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य

२७ हजार ग्रामस्थांच्या श्रमदानातून बंधारे

By admin | Updated: January 9, 2016 00:47 IST

गुहागर पंचायत समिती : शासनाचा खर्च न करता २० लाख रूपयांचे काम; पाण्याच्या पातळीत वाढ

गुहागर : पंचायत समिती, गुहागरचे मिशन बंधारे २०१५ ‘पाण्यासाठी श्रमदान - एक चळवळ’ हे अभियान यशस्वी झाले आहे. गुहागर तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतीमध्ये ४६५ बंधारे बांधण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, अभियानाच्या समाप्तीअखेर ४६९ बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. ‘नरेगा’मधून २०११ साली १७ लाख रुपये खर्च करुन २७० वनराई बंधारे बांधण्यात आले होते. आता शासनाचा कोणताही खर्च न होता केवळ श्रमदानातून ४६९ बंधारे उभारण्यात आले आहे. त्यामध्ये ९१ वनराई, २२२ विजय व १५६ कच्च्या बंधाऱ्यांचा समावेश असून, या बंधाऱ्यामुळे सुमारे ३९ कोटी लीटर पाणी अडवण्यात आले आहे. या बंधाऱ्यांसाठी २० लाख रुपयांचे काम झाले असून, यासाठी २७ हजार लोकांनी श्रमदान केले आहे. बंधाऱ्यांमुळे ७९ नळपाणी पुरवठा योजनांतील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने पाणीटंचाईवर मात करणे शक्य होणार असून, या बंधाऱ्यांतील पाण्याचा ५३ हेक्टर क्षेत्रावरील सिंचनासाठीही फायदा होणार आहे.पंचायत समिती, गुहागर तसेच कृ षी विभागाच्या वतीने २ आॅक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त जानवळे येथे माजी सभापती राजेश बेंडल व तत्कालीन उपसभापती व विद्यमान सभापती सुरेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला होता. गेले दोन महिने पंचायत समितीचे पदाधिकारी, गटविकास अधिकारी यांच्या पाठपुराव्याने या अभियानाला गती मिळाली. सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक, पंचायत समितीचे व कृ षी विभागाचे अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी, कृ षी पर्यवेक्षक, कृ षी सहाय्यक यांच्यासह बचत गट, महिला मंडळ व ग्रामस्थांनी या अभियानात उत्स्फूर्त सहभाग घेतला. दोन महिन्याच्या कालावधीत ४६९ बंधारे बांधून पूर्ण झाल्याने श्रमदानाची ही चळवळ यशस्वी ठरली आहे.वनराई बंधारे बांधण्यासाठी ४,०७,६८० रुपये मजुरी व १,०१,९२० रुपयांचे साहित्य असे एकूण ५,०९,६०० रुपयांचे काम झाले आहे, तर विजय बंधाऱ्यासाठी ८,३९,१६० रुपये मजुरी व २,४८,६४० रुपयांचे साहित्य असे एकूण १०,८७,८०० रुपयांचे काम आणि कच्चे बंधाऱ्यासाठी केवळ मजुरी रक्कम ३,९३,१२० रुपये रक्कम खर्च झाली आहे. गुहागर तालुक्यात बांधण्यात आलेल्या ४६९ बंधाऱ्यासाठी १६,३९,९६० रुपये मजुरीसाठी व ३,५०,५६० रुपये साहित्यासाठी असे एकूण १९,९०,५२० रुपयांच्या मुल्यांकनाचे काम या मिशन बंधारेमधून झाले आहे.सन २०११-१२ व २०१२-१३ या वर्षांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वनराई बंधारा बांधण्याचा निर्णय तत्कालीन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतला होता. त्यावेळी या योजनेतून गुहागर तालुक्यात केवळ २७० वनराई बंधारे बांधण्यात आले होते. त्यासाठी मजुरीचा खर्च १०,१४,४६७ रुपये व साहित्याचा खर्च ६,८०,७१५ रुपये असे एकूण १६,९५,१८२ रुपये खर्च करण्यात आले होते. म्हणजेच ‘नरेगा’तून शासनाचे पैसे खर्च करुन जेवढा परिणाम झाला त्यापेक्षाही शासनाचा पैसा खर्च न करता श्रमदानाचे महात्मा फुले जलभूमी संधारण अभियान प्रभावी आणि यशस्वीही झाले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी हे अभियान राबविण्यासाठी पुढाकार घेतला होता. (प्रतिनिधी)तालुक्यात ६५ ग्रामपंचायती : बागांच्या सिंचनासाठी लाभदायकगुहागर तालुक्यात ६५ ग्रामपंचायती असून, प्रती ग्रामपंचायत सरासरी ७ बंधारे बांधण्यात आले आहेत. तालुक्यात बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांचा उपयोग ४६ नळपाणी पुरवठा योजनेच्या विहिरीसाठी, १ पिण्याच्या पाण्याच्या तळीसाठी व ३२ पिण्याच्या पाण्याच्या विहिरींसाठी असा एकूण ७९ पिण्याच्या पाण्याचा स्त्रोतांवर याचा चांगला परिणाम झाला आहे. या व्यतिरिक्त सुमारे १६० ते १७० खासगी विहिरींनासुद्धा या बंधाऱ्यांचा उपयोग झाला आहे. सुमारे ५३ हेक्टर क्षेत्रावरील भाजीपाला, कडधान्य, नारळ, सुपारीच्या बागांच्या सिंचनासाठी हे बंधारे लाभदायक ठरले आहेत.