शहरं
Join us  
Trending Stories
1
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
2
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
3
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
4
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
5
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
6
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
7
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
8
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
9
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
10
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
11
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
12
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
13
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
14
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
15
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
16
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
17
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
18
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
19
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
20
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला

बांबवडेत वाहतुकीच्या कोंडीची ‘कोंडी’ फुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2016 00:45 IST

नियोजनच नाही : शिस्त लावण्याची गरज; वाहनचालक त्रस्त

रामचंद्र पाटील-- बांबवडे (ता. शाहूवाडी) या तालुक्यातील सर्वात मोठ्या बाजारपेठेला नियोजनाअभावी वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावे लागत असून, सर्व स्थरावर प्रयत्न करून बाजाराचे योग्य नियोजन लावणे गरजेचे आहे.बांबवडे हे कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर वसलेले असून, येथील आठवडी बाजार गुरुवारीच भरतो. या मार्गालगतच मुख्य बाजारपेठ आहे. या आठवडी बाजारामध्ये शाहूवाडीसह पन्हाळा व शिराळा तालुक्यांतील व्यापारी लोक येतात. तसेच महामार्गावर प्रवास करणारे प्रवासीही खरेदीसाठी थांबत असल्याने बाजारपेठेत गर्दी झालेली असते.मुख्य बाजार हा बसस्थानक परिसरात भरतो. येथूनच महामार्गावर जाता येते. महामार्गाच्या दोन्ही बाजूला लहान-मोठी वाहने उभी असतात. दर पाच मिनिटाला एक ते दोन बस येथे थांबलेल्या असतात. त्यांच्या थांबण्याचे योग्य नियोजन नसते. दोन्ही बाजूला एक-दोन एस.टी. बसेस जरी थांबल्या तरीही वाहतुकीची कोंडी होते. यासाठी जाणाऱ्या गाड्या बसस्थानकाच्या बाजूला, तर कोल्हापूरकडे जाणाऱ्या गाड्या विरुद्ध बाजूला उभ्या राहण्यासाठी मलकापूर आगाराच्या स्वतंत्र कर्मचाऱ्याने पोलिसांच्या मदतीने नियोजन लावणे गरजेचे आहे.खासगी वाहतूक करणारी शेकडो वाहने याच परिसरात उभी राहिलेली असतात. यामुळे वाहतुकीची खरी कोंडी होते. आठवडी बाजारादिवशी ही वाहने या परिसरापासून दूर उभी राहण्याची व्यवस्था केली तर कोंडी सुटण्याची शक्यता आहे. परंतु, हे नियोजन लावण्याचे धारिष्ट बांबवडे पोलिसांत नसल्याचे स्पष्ट दिसून येते. येथेच भरणारा भाजीपाला मार्केट या परिसरातून वेगळ्या ठिकाणी भरविणे गरजेचे आहे. भाजीपाला मार्केट थोडेसे एका बाजूस तरी भरते; परंतु फळविक्रेते अगदी रस्त्यावरच फळांचे गाडे व ठेले मांडून बिनधास्त बसलेले असतात. अशीच परिस्थिती पिशवी येथील रोडवरही होते. तेथेही नेहमी वाहतुकीची कोंडी होते. तरी जनावरांच्या बाजाराशेजारी जे मार्केटचे गाळे आहेत तेथे बाजार भरणे गरजेचे आहे. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास नोकरदार वर्ग कामावरून आल्यावर प्रत्येकाचे वाहन जागा मिळेल तेथे पार्किंग होते. या वेळेत वाहतुकीची कोंडी जास्त होते. सध्या ऊस वाहतुकीची कोंडी जास्त होते. सध्या ऊस वाहतूक व बॉक्साईट वाहतूकही जोरात सुरू असल्यानेही वाहतुकीची कोंडी होते.ऊस, बॉक्साईट वाहतूकसध्या ऊस आणि बॉक्साईट वाहतूकही जोरात सुरू असल्यानेही कोंडीत भर पडत आहे.आठवडा बाजारादिवशी तर येथे चालणेही मुश्कील होते.