शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

बांबवडेत वाहतुकीच्या कोंडीची ‘कोंडी’ फुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2016 00:45 IST

नियोजनच नाही : शिस्त लावण्याची गरज; वाहनचालक त्रस्त

रामचंद्र पाटील-- बांबवडे (ता. शाहूवाडी) या तालुक्यातील सर्वात मोठ्या बाजारपेठेला नियोजनाअभावी वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावे लागत असून, सर्व स्थरावर प्रयत्न करून बाजाराचे योग्य नियोजन लावणे गरजेचे आहे.बांबवडे हे कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर वसलेले असून, येथील आठवडी बाजार गुरुवारीच भरतो. या मार्गालगतच मुख्य बाजारपेठ आहे. या आठवडी बाजारामध्ये शाहूवाडीसह पन्हाळा व शिराळा तालुक्यांतील व्यापारी लोक येतात. तसेच महामार्गावर प्रवास करणारे प्रवासीही खरेदीसाठी थांबत असल्याने बाजारपेठेत गर्दी झालेली असते.मुख्य बाजार हा बसस्थानक परिसरात भरतो. येथूनच महामार्गावर जाता येते. महामार्गाच्या दोन्ही बाजूला लहान-मोठी वाहने उभी असतात. दर पाच मिनिटाला एक ते दोन बस येथे थांबलेल्या असतात. त्यांच्या थांबण्याचे योग्य नियोजन नसते. दोन्ही बाजूला एक-दोन एस.टी. बसेस जरी थांबल्या तरीही वाहतुकीची कोंडी होते. यासाठी जाणाऱ्या गाड्या बसस्थानकाच्या बाजूला, तर कोल्हापूरकडे जाणाऱ्या गाड्या विरुद्ध बाजूला उभ्या राहण्यासाठी मलकापूर आगाराच्या स्वतंत्र कर्मचाऱ्याने पोलिसांच्या मदतीने नियोजन लावणे गरजेचे आहे.खासगी वाहतूक करणारी शेकडो वाहने याच परिसरात उभी राहिलेली असतात. यामुळे वाहतुकीची खरी कोंडी होते. आठवडी बाजारादिवशी ही वाहने या परिसरापासून दूर उभी राहण्याची व्यवस्था केली तर कोंडी सुटण्याची शक्यता आहे. परंतु, हे नियोजन लावण्याचे धारिष्ट बांबवडे पोलिसांत नसल्याचे स्पष्ट दिसून येते. येथेच भरणारा भाजीपाला मार्केट या परिसरातून वेगळ्या ठिकाणी भरविणे गरजेचे आहे. भाजीपाला मार्केट थोडेसे एका बाजूस तरी भरते; परंतु फळविक्रेते अगदी रस्त्यावरच फळांचे गाडे व ठेले मांडून बिनधास्त बसलेले असतात. अशीच परिस्थिती पिशवी येथील रोडवरही होते. तेथेही नेहमी वाहतुकीची कोंडी होते. तरी जनावरांच्या बाजाराशेजारी जे मार्केटचे गाळे आहेत तेथे बाजार भरणे गरजेचे आहे. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास नोकरदार वर्ग कामावरून आल्यावर प्रत्येकाचे वाहन जागा मिळेल तेथे पार्किंग होते. या वेळेत वाहतुकीची कोंडी जास्त होते. सध्या ऊस वाहतुकीची कोंडी जास्त होते. सध्या ऊस वाहतूक व बॉक्साईट वाहतूकही जोरात सुरू असल्यानेही वाहतुकीची कोंडी होते.ऊस, बॉक्साईट वाहतूकसध्या ऊस आणि बॉक्साईट वाहतूकही जोरात सुरू असल्यानेही कोंडीत भर पडत आहे.आठवडा बाजारादिवशी तर येथे चालणेही मुश्कील होते.