शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

अखेर तेरा दिवसांनी मृतदेह अन्यत्र दफन

By admin | Updated: April 24, 2017 23:34 IST

वादावर पडदा : धर्मगुरूंच्या पत्रानंतर पालिकेची कार्यवाही

सावंतवाडी : नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिलेला आत्मक्लेश आंदोलनाचा इशारा तसेच स्वराज्य संघटना, भाजपने घेतलेली आक्रमक भूमिका यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा उद्भवणारा प्रश्न लक्षात घेऊन अखेर ख्रिश्चन धर्मगुरूंनी नगरपालिकेला दिलेल्या पत्रानंतर सोमवारी दफन करण्यात आलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला व तो अन्यत्र दफन करण्यात आला. त्यानंतर मृतदेह दफन प्रकरणावर पडदा पडला असल्याचे सर्वांनीच जाहीर केले.दरम्यान, नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी प्रशासनाच्या एकतर्फी निर्णयाविरोधात पुकारलेल्या आत्मक्लेश आंदोलनाला सर्वच स्तरातून पाठिंबा लाभला. निरवडे येथील जीवनसंध्या आश्रमात आश्रित असलेल्या मरसियाना सबिना फ्रान्सिस्को आल्मेडा या महिलेचा मृत्यू झाला होता. हा मृतदेह १२ एप्रिलला श्रमविहार कॉलनीतील घराच्या शेजारी असलेल्या जागेत दफन करण्यात आला होता. गेले तेरा दिवस विविध पातळीवर स्थानिक रहिवाशांचे आंदोलन सुरू होते.घटनेच्या सहाव्या दिवशी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी ख्रिश्चन समाज व श्रमविहार कॉलनीतील नागरिकांशी वेगवेगळी चर्चा केली; पण ही चर्चा करताना मंत्री केसरकर यांनी प्रथम ख्रिश्चन समाजाशी चर्चा करून जो निर्णय घेतला, तो नगरपालिका सभागृहात उपस्थित असलेल्या श्रमविहार कॉलनीतील नागरिकांवर लादण्यात आला होता. यावेळी प्रशासनानेही पालकमंत्र्यांचीच री ओढली होती.पालकमंत्र्यांच्या निर्णयाने स्थानिक नागरिक तसेच नगराध्यक्ष बबन साळगावकर हे चांगलेच नाराज झाले होते. पालिकेने ख्रिश्चन समाजाशी केलेल्या करारावरही नगराध्यक्षांनी सही केली नव्हती. तसेच श्रमविहार कॉलनीतील नागरिकांनीही हा करार बेकायदेशीर असल्याचे सांगितले होते. स्वराज्य संघटना तसेच विश्व हिंदू परिषद यांनी मृतदेह दफनप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली होती. हा वाद वाढत जात असताना रविवारी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पालकमंत्र्यांच्या एकतर्फी निर्णयामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडत असल्याचे सांगून थेट पालकमंत्र्यांवरच शाब्दिक हल्ला चढविला व सोमवारी आपण या निर्णयाविरोधात आत्मक्लेश करणार असल्याचे जाहीर केले होते.त्यानंतर पोलिस प्रशासन चांगलेच हादरले होते. त्यांनी रात्रीच सूत्रे हलविली. ख्रिश्चन समाजाच्या तसेच पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांशी चर्चाही केली. त्यानंतर रात्री उशिरा ख्रिश्चन समाजाच्यावतीने धर्मगुरू इलियास रॉड्रिक्स यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे यासाठी नगरपालिकेला मृतदेह बाहेर काढण्यासाठी पत्र दिले. या पत्रात त्यांनी मृतदेह काढताना एकही ख्रिश्चन बांधव उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले होते.या पत्रानंतर सोमवारी सकाळी मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे तसेच तहसीलदार बी. बी. जाधव, पोलिस उपअधीक्षक दयानंद गवस व पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांची संंयुक्त बैठक झाली आणि मृतदेह काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे सकाळी ९.३० वाजता पालिका कर्मचाऱ्यांनी दफन केलेला मृतदेह बाहेर काढण्यास सुरुवात केली. यावेळी प्रशासनाच्यावतीने पंचही नेमण्यात आले. तसेच व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आले. हा मृतदेह बाहेर काढण्यात आला व तो अन्यत्र दफन करण्यात आला. ही कारवाई दुपारी १२ वाजेपर्यंत पोलिस, महसूल विभाग व नगरपालिका यांच्यावतीने पूर्ण करण्यात आली.यावेळी पोलिस उपअधीक्षक दयानंद गवस, पोलिस निरीक्षक शंकर पाटील, प्रभारी तहसीलदार भास्कर जाधव, मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे, दीपक म्हापसेकर, तानाजी पालव, आसावरी शिरोडकर, आदी उपस्थित होते. मृतदेह काढताना कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पोलिसांच्यावतीने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (प्रतिनिधी)ख्रिश्चन धर्मगुरूंच्या पत्रानंतर कार्यवाही शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे. सतत होणारी आंदोलने, मोर्चा यामुळे पोलिस प्रशासनही हैराण झाले होते. त्यातच जो करार करण्यात आला होता, तोही बेकायदा असल्याचा दावा करण्यात आल्याने अखेर पोलिसांनी ख्रिश्चन धर्मगुरूंशी चर्चा केली. त्याचवेळी धर्मगुरूंनी आमचे कायदा सुव्यस्थेला पहिले प्राधान्य राहणार असल्याचे सांगत मृतदेह तुम्ही बाहेर काढा, ख्रिश्चन बांधव कोणीही तेथे येणार नाही, असे सांगत तसे पत्र दिले.पालकमंत्र्यांचा निर्णय अधिकाऱ्यांनाच अमान्यपालकमंत्री दीपक केसरकर यांनी घेतलेला निर्णय खुद्द जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच अमान्य असल्याचे दिसून आले. अनेक अधिकारी पालकमंत्र्यांच्या निर्णयानंतर आपल्यावर टांगती तलवार येऊ नये, यासाठी दीर्घकालीन सुटीवर गेले आहेत. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक हेही सुटीवर आहेत, तर सावंतवाडी तहसीलदार यांनीही सुटी वाढवून घेतल्याची चर्चा आहे.