शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

अखेर तेरा दिवसांनी मृतदेह अन्यत्र दफन

By admin | Updated: April 24, 2017 23:34 IST

वादावर पडदा : धर्मगुरूंच्या पत्रानंतर पालिकेची कार्यवाही

सावंतवाडी : नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिलेला आत्मक्लेश आंदोलनाचा इशारा तसेच स्वराज्य संघटना, भाजपने घेतलेली आक्रमक भूमिका यामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा उद्भवणारा प्रश्न लक्षात घेऊन अखेर ख्रिश्चन धर्मगुरूंनी नगरपालिकेला दिलेल्या पत्रानंतर सोमवारी दफन करण्यात आलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला व तो अन्यत्र दफन करण्यात आला. त्यानंतर मृतदेह दफन प्रकरणावर पडदा पडला असल्याचे सर्वांनीच जाहीर केले.दरम्यान, नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी प्रशासनाच्या एकतर्फी निर्णयाविरोधात पुकारलेल्या आत्मक्लेश आंदोलनाला सर्वच स्तरातून पाठिंबा लाभला. निरवडे येथील जीवनसंध्या आश्रमात आश्रित असलेल्या मरसियाना सबिना फ्रान्सिस्को आल्मेडा या महिलेचा मृत्यू झाला होता. हा मृतदेह १२ एप्रिलला श्रमविहार कॉलनीतील घराच्या शेजारी असलेल्या जागेत दफन करण्यात आला होता. गेले तेरा दिवस विविध पातळीवर स्थानिक रहिवाशांचे आंदोलन सुरू होते.घटनेच्या सहाव्या दिवशी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी ख्रिश्चन समाज व श्रमविहार कॉलनीतील नागरिकांशी वेगवेगळी चर्चा केली; पण ही चर्चा करताना मंत्री केसरकर यांनी प्रथम ख्रिश्चन समाजाशी चर्चा करून जो निर्णय घेतला, तो नगरपालिका सभागृहात उपस्थित असलेल्या श्रमविहार कॉलनीतील नागरिकांवर लादण्यात आला होता. यावेळी प्रशासनानेही पालकमंत्र्यांचीच री ओढली होती.पालकमंत्र्यांच्या निर्णयाने स्थानिक नागरिक तसेच नगराध्यक्ष बबन साळगावकर हे चांगलेच नाराज झाले होते. पालिकेने ख्रिश्चन समाजाशी केलेल्या करारावरही नगराध्यक्षांनी सही केली नव्हती. तसेच श्रमविहार कॉलनीतील नागरिकांनीही हा करार बेकायदेशीर असल्याचे सांगितले होते. स्वराज्य संघटना तसेच विश्व हिंदू परिषद यांनी मृतदेह दफनप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली होती. हा वाद वाढत जात असताना रविवारी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पालकमंत्र्यांच्या एकतर्फी निर्णयामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडत असल्याचे सांगून थेट पालकमंत्र्यांवरच शाब्दिक हल्ला चढविला व सोमवारी आपण या निर्णयाविरोधात आत्मक्लेश करणार असल्याचे जाहीर केले होते.त्यानंतर पोलिस प्रशासन चांगलेच हादरले होते. त्यांनी रात्रीच सूत्रे हलविली. ख्रिश्चन समाजाच्या तसेच पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांशी चर्चाही केली. त्यानंतर रात्री उशिरा ख्रिश्चन समाजाच्यावतीने धर्मगुरू इलियास रॉड्रिक्स यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे यासाठी नगरपालिकेला मृतदेह बाहेर काढण्यासाठी पत्र दिले. या पत्रात त्यांनी मृतदेह काढताना एकही ख्रिश्चन बांधव उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले होते.या पत्रानंतर सोमवारी सकाळी मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे तसेच तहसीलदार बी. बी. जाधव, पोलिस उपअधीक्षक दयानंद गवस व पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांची संंयुक्त बैठक झाली आणि मृतदेह काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे सकाळी ९.३० वाजता पालिका कर्मचाऱ्यांनी दफन केलेला मृतदेह बाहेर काढण्यास सुरुवात केली. यावेळी प्रशासनाच्यावतीने पंचही नेमण्यात आले. तसेच व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आले. हा मृतदेह बाहेर काढण्यात आला व तो अन्यत्र दफन करण्यात आला. ही कारवाई दुपारी १२ वाजेपर्यंत पोलिस, महसूल विभाग व नगरपालिका यांच्यावतीने पूर्ण करण्यात आली.यावेळी पोलिस उपअधीक्षक दयानंद गवस, पोलिस निरीक्षक शंकर पाटील, प्रभारी तहसीलदार भास्कर जाधव, मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे, दीपक म्हापसेकर, तानाजी पालव, आसावरी शिरोडकर, आदी उपस्थित होते. मृतदेह काढताना कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पोलिसांच्यावतीने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (प्रतिनिधी)ख्रिश्चन धर्मगुरूंच्या पत्रानंतर कार्यवाही शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे. सतत होणारी आंदोलने, मोर्चा यामुळे पोलिस प्रशासनही हैराण झाले होते. त्यातच जो करार करण्यात आला होता, तोही बेकायदा असल्याचा दावा करण्यात आल्याने अखेर पोलिसांनी ख्रिश्चन धर्मगुरूंशी चर्चा केली. त्याचवेळी धर्मगुरूंनी आमचे कायदा सुव्यस्थेला पहिले प्राधान्य राहणार असल्याचे सांगत मृतदेह तुम्ही बाहेर काढा, ख्रिश्चन बांधव कोणीही तेथे येणार नाही, असे सांगत तसे पत्र दिले.पालकमंत्र्यांचा निर्णय अधिकाऱ्यांनाच अमान्यपालकमंत्री दीपक केसरकर यांनी घेतलेला निर्णय खुद्द जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच अमान्य असल्याचे दिसून आले. अनेक अधिकारी पालकमंत्र्यांच्या निर्णयानंतर आपल्यावर टांगती तलवार येऊ नये, यासाठी दीर्घकालीन सुटीवर गेले आहेत. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक हेही सुटीवर आहेत, तर सावंतवाडी तहसीलदार यांनीही सुटी वाढवून घेतल्याची चर्चा आहे.